शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

कोळसा आणि हिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 02:33 IST

जितके जास्त निंदक ज्याच्या नशिबी आलेत समजावे तितकी जास्त प्रगती त्याच्याकडून नियतीला हवी आहे.

- विजयराज बोधनकर

आपली निंदा करणारा किंवा आपल्याला छळणारा जीव आपल्या आयुष्यात येतो हे आपलं सद्भाग्य म्हणावं. तो आपल्या झोपल्या बुद्धीला जागं करतो, जोश निर्माण करतो, मनात खळबळ निर्माण करून देतो. आपली उगाच खालची जागा दाखवून देतो. मग छळवणूक सहन करणारा त्याला दाखवून देतो की, बघ मी कसा आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आपली कुणी चेष्टा करतो तेव्हा आपल्या सन्मानाला ठेच पोहोचते आणि आपली संपूर्ण ऊर्जा पणाला लावून त्याच्या चेष्टेला उत्तरं देताना आपली कार्यक्षमता वाढवून घेत राहतो.

फक्त आपण सकारात्मक वृत्तीने ही बाब स्वत:च्या नजरेत आणून द्यायला हवी. निंदा करणारा, अपमान करणारा आपल्या कुंडलीतील शनी जरी वाटत असला तरी आपल्याला खडबडून जागं करणारी ती एक छुपी प्रेरणाच असते. उगाच का तुकाराम महाराजांनी म्हटलं की, निंदकाचे घर असावे शेजारी. पांडवांच्या कुंडलीत शंभर निंदक होते म्हणून त्यांचा भव्य विजय झाला. त्यांनी युद्ध करायला भाग पाडलं. ज्यांनी ज्यांनी युद्ध स्वीकारलं तेच अजरामर झालेत. निंदा करणारा कधीच प्रगती करू शकत नसला तरी तो इतरांच्या प्रगतीला प्रेरक ठरत जातो.

जितके जास्त निंदक ज्याच्या नशिबी आलेत समजावे तितकी जास्त प्रगती त्याच्याकडून नियतीला हवी आहे. तुमचा मत्सर करणारे तुमच्या प्रगतीवर अस्वस्थ होत असतात. म्हणजे तुम्ही प्रगतिपथावर आहात असं समजावं. फक्त आपण कुणाची निंदा करू नये. कारण आपल्याला प्रगती करण्यासाठी नियतीने आपल्याला जन्माला घातलंय आणि त्या प्रगतीला पोषक बनविण्यासाठी निंदकही नियतीने आपल्याला पदरी पाठविले. निंदकाला कधीही कमी लेखू नये. याचं कारण असं आहे की नियतीने तुम्हावर केलेली ती कृपादृष्टी असते. जो छळला जातो तोच उत्तम मार्गाकडे वळतो. कोळशातच शेवटी हिरे सापडतात. कोळसा आणि निंदा करणारा समान भूमिकेत असतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक