शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बदलती मनोवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 09:33 IST

मनाची अवस्था सतत बदलत राहणे हीच त्याची मूळ भूमिका असते. कारण ‘मन’ स्थिर राहूच शकत नाही.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमुलगा वर्षभर अभ्यास करतो. पण परीक्षा जवळ आल्या की मानसिक ताण घेतो. स्वत:चा स्वत:वर विश्वास नसला की, अशी मनोवस्था होते. अभ्यास हा आत्मविश्वासाने केला पाहिजे. मनापासून केला पाहिजे. स्मरणात ठेवला पाहिजे. मनावर घेऊन केलेल्या अभ्यासात आपली प्रगती दिसते. अभ्यासात ‘मन’ लागत नाही, अशा काही मुलांच्या तक्रारी असतात. काही मुले मन लावून अभ्यास करतात. यात ज्याच्या - त्याच्या बुद्धीनुसार, बुद्ध्यांकावरून त्यांची मनोवस्था बदलत जाते. मनावर घेऊन अभ्यास केल्यास बुद्ध्यांक उंचावतो. मनाला प्रसन्न ठेवणे अवघड काम आहे. पण प्रसन्न मनाने केलेला अभ्यास लक्षात राहतो. परीक्षा म्हटले की ताण येतोच! कारण ती परीक्षाच असते. इथे सतत जागृत अवस्थेत राहणे महत्त्वाचे असते. जागृत ‘मन’ आपल्या सवयींना बदलवते. मनाची अवस्था सतत बदलत राहणे हीच त्याची मूळ भूमिका असते. कारण ‘मन’ स्थिर राहूच शकत नाही. कारण त्याचे स्थिरपण फक्त ईशचरण एवढेच असते. म्हणून तर संत तुकाराम महाराजांनी सांगितले. ‘‘आता कोठे धावे मना तुमचे चरण देखलिया’’ ‘मन’ एकदा त्या ईश्वराच्या चरणाशी रत झाले की मग कुठेही धाव घेत नाही. तोेपर्यंत ते मन कुणाच्या आज्ञेत राहत नाही. मनाचे मालक मनच असते. कारण मनाला शक्ती बुद्धी देते. बुद्धीचा आत्मा. आत्म्याचे औदार्य मनावरच अवलंबून असते. मनाचे सुंदरपण त्या आत्मस्थितीवर निर्भर असते.आत्म्याची स्थिती जशी असते, त्यानुसार मनाचे भाव बदलत जातात. परीक्षेला जाणारा मुलगा - सासरला जाणारी नववधू (मुलगी), यांचे भाव जवळपास सारखे असतात. इकडे परीक्षेला जाणाऱ्या मुलांचा पेपर छान गेला की भाव बदलतात. परीक्षेला जाण्यापूर्वीचे मन अन् नंतर पेपर छान गेल्यानंतरचे मन यात फरक आहे. तसेच सासरला जाण्यापूर्वीचे ‘मन’ अन् सासरला गेल्यास सासरच्या लोकांचे प्रेमाने भारावून गेलेले मन यात नक्कीच फरक असतो. मनाला नेहमी चांगले विचार करण्याची सवय लावा. ‘मन’ सुख-दु:खात बदलते. मनाची मनोवस्था ही बदलत जाणारी आहे. म्हणून संतांनीसुद्धा ‘मनालाच’ मोठेपण दिले आहे. मन गुरु, मन शिष्य, सर्वस्व ‘मना’वरच अवलंबून आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक