शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

बदलती मनोवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 09:33 IST

मनाची अवस्था सतत बदलत राहणे हीच त्याची मूळ भूमिका असते. कारण ‘मन’ स्थिर राहूच शकत नाही.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमुलगा वर्षभर अभ्यास करतो. पण परीक्षा जवळ आल्या की मानसिक ताण घेतो. स्वत:चा स्वत:वर विश्वास नसला की, अशी मनोवस्था होते. अभ्यास हा आत्मविश्वासाने केला पाहिजे. मनापासून केला पाहिजे. स्मरणात ठेवला पाहिजे. मनावर घेऊन केलेल्या अभ्यासात आपली प्रगती दिसते. अभ्यासात ‘मन’ लागत नाही, अशा काही मुलांच्या तक्रारी असतात. काही मुले मन लावून अभ्यास करतात. यात ज्याच्या - त्याच्या बुद्धीनुसार, बुद्ध्यांकावरून त्यांची मनोवस्था बदलत जाते. मनावर घेऊन अभ्यास केल्यास बुद्ध्यांक उंचावतो. मनाला प्रसन्न ठेवणे अवघड काम आहे. पण प्रसन्न मनाने केलेला अभ्यास लक्षात राहतो. परीक्षा म्हटले की ताण येतोच! कारण ती परीक्षाच असते. इथे सतत जागृत अवस्थेत राहणे महत्त्वाचे असते. जागृत ‘मन’ आपल्या सवयींना बदलवते. मनाची अवस्था सतत बदलत राहणे हीच त्याची मूळ भूमिका असते. कारण ‘मन’ स्थिर राहूच शकत नाही. कारण त्याचे स्थिरपण फक्त ईशचरण एवढेच असते. म्हणून तर संत तुकाराम महाराजांनी सांगितले. ‘‘आता कोठे धावे मना तुमचे चरण देखलिया’’ ‘मन’ एकदा त्या ईश्वराच्या चरणाशी रत झाले की मग कुठेही धाव घेत नाही. तोेपर्यंत ते मन कुणाच्या आज्ञेत राहत नाही. मनाचे मालक मनच असते. कारण मनाला शक्ती बुद्धी देते. बुद्धीचा आत्मा. आत्म्याचे औदार्य मनावरच अवलंबून असते. मनाचे सुंदरपण त्या आत्मस्थितीवर निर्भर असते.आत्म्याची स्थिती जशी असते, त्यानुसार मनाचे भाव बदलत जातात. परीक्षेला जाणारा मुलगा - सासरला जाणारी नववधू (मुलगी), यांचे भाव जवळपास सारखे असतात. इकडे परीक्षेला जाणाऱ्या मुलांचा पेपर छान गेला की भाव बदलतात. परीक्षेला जाण्यापूर्वीचे मन अन् नंतर पेपर छान गेल्यानंतरचे मन यात फरक आहे. तसेच सासरला जाण्यापूर्वीचे ‘मन’ अन् सासरला गेल्यास सासरच्या लोकांचे प्रेमाने भारावून गेलेले मन यात नक्कीच फरक असतो. मनाला नेहमी चांगले विचार करण्याची सवय लावा. ‘मन’ सुख-दु:खात बदलते. मनाची मनोवस्था ही बदलत जाणारी आहे. म्हणून संतांनीसुद्धा ‘मनालाच’ मोठेपण दिले आहे. मन गुरु, मन शिष्य, सर्वस्व ‘मना’वरच अवलंबून आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक