शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

संवादाने नात्याचा सेतू बांधा.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 20:12 IST

जीवन आनंदी जगण्यासाठी जीवनाच्या सर्व अंगाना महत्त्व द्या व कुठलाही अतिरेक न करता , मध्यम मार्गाचा अवलंब करा...

डॉ. दत्ता कोहिनकर- आमच्याच सोसायटीत राहणारा अमित माझा सहकारी मित्र , त्याच्या तरूण मुलाबद्दल चिंतित होता . त्याच्या मुलाला अध्यात्माची खूपच आवड लागली होती . तो घरात मिसळत नव्हता . कुठल्याही समारंभाला येत नव्हता. खाण्याची खूपच पथ्ये पाळत होता . त्याला रात्री नीट झोप येत नव्हती . स्त्रीयांशी बोलताना तो मान खाली घालायचा किंवा स्त्रीयांना टाळायचा . एकटाच शुन्यात बसून रहायचा . त्याच्या चेहऱ्यावर भयंकर ताण व औदासिन्य दिसत होते . लग्नाचा विषय काढला कि तो नाराज व्हायचा . लग्न करायच नाही म्हणायचा .सन्यास घेण्याचीभाषा करायचा . सारखाच आश्रमात जायचा . घरात लाडाने त्याला ढेबू म्हणायचे . एके दिवशी मी ढेबूला माझ्याकडे अर्जितसिंग च्या कार्यक्रमाचे पास आहेत , तू पण चल असे म्हटले . त्याक्षणी ढेबू मला म्हणाला , मी येणार नाही . कारण गुरुजीनी सांगितलेय , नाच गाण्यापासून दूर रहा . नाच व गाण्यांमुळे मन प्रक्षुब्ध होऊन वासना बळावतात व त्यातून शील भंग होऊ शकतो . त्यामुळे मी येऊ शकत नाही असे उत्तर त्याने दिले . यासारख्या समजुतींनी ढेबूने त्याच्या आयुष्यातील मनोरंजनाचा दरवाजा बंद केला होता . त्याक्षणी मला एक गोष्ट आठवली . एका राजाने स्वसंरक्षणासाठी असा राजवाडा बांधला कि साधा किटक पण आत येऊ शकणार नाही . त्याने राजवाड्याला फक्त एकच दरवाजा ठेवून तिथे सशस्त्र पहारेकरी ठेवले . शेजारील राजाने हा राजवाडा पाहून - तसाच राजवाडा स्वत : साठी बांधण्याचे ठरवले . राजवाड्यातून निघताना या दोन्ही राजांच्या गप्पा ऐकून एक फकीर जोरजोरात हसू लागला . फकिराला हसण्याचे कारण विचारले असता फकीर म्हणाला , राजा या एका उघड्या दरवाजातून पण कोणीही येऊ शकेल , तोही बंद कर ना . हे ऐकताच राजा म्हणाला , हा दरवाजा पण बंद केला तर मी आतच मरून जाईन ना . मग हे थडगच होईन . मित्रांनो, ढेबू सारखी अनेक तरूण मुलं नको त्या गुरुजींच्या नादी लागून , मुक्तीऐवजी - बंधनात अडकत आहेत . निसर्गाच्या विरोधात जात आहेत . निसर्गाच्या नियमांविरुद्ध गेल्याने शारीरिक व मानसिक धक्के खात आहेत .डिप्रेशन युक्त व अंबनॉर्मल जीवन जगत आहेत .आनंदी जीवन जगण्याचे अनेक दरवाजे बंद करून भावभावनांचे दमन केल्यामुळे नैराश्यात जात आहेत . जीवन आनंदी जगण्यासाठी जीवनाच्या सर्व अंगाना महत्त्व द्या व कुठलाही अतिरेक न करता , मध्यम मार्गाचा अवलंब करा . स्वत : च स्वत : ला तपासून पहा व आनंदी रहा .  

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक