शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

झाली बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 5:47 AM

कोकणातील/ गोव्यातील गणपती दीड-तीन-पाच-सात जसा मानून घेतलाय त्याप्रमाणे पूजला जातो. घराजवळच्या तळीवर विसर्जन होते.

- डॉ. गोविंद काळेगणपती बाप्पा मोरयापुढच्या वर्षी लवकर याया आबालवृद्धांच्या घोषणेने घाटावरची अनंत चतुर्दशी दुमदुमून जाते. कोकणातील/ गोव्यातील गणपती दीड-तीन-पाच-सात जसा मानून घेतलाय त्याप्रमाणे पूजला जातो. घराजवळच्या तळीवर विसर्जन होते. तळीवर जायचे तर वाट खाचखळग्याची, हातात विजेरी हवी आणि मुखी शब्द असतात ‘मार्गे हळूहळू चाला, मुखाने श्रीगजानन बोला’ असे म्हणत म्हणत गणेश विसर्जनासाठी वाड्यावरील मंडळी निघतात. गणेशाचे आगमन आणि बोळवण सर्वत्र अतीव उत्साहानेच होते. ‘बोळवण’ हा शब्द अनंत चतुर्दशीनंतर भेटतच नाही. तो दैनंदिन व्यवहारातून वर्षभरासाठी जणू हद्दपार झालेला असतो. बोळवण म्हणजे रवानगी, पाठवणी, विसर्जन.संसारातही केव्हा केव्हा बोळवण करण्याची पाळी येते. एखादा दूरस्थ पाहुणा मुक्कामाला येतो, परत जाण्याचे नाव घेत नाही. घरात कुजबूज सुरू होते की, आणखी किती दिवस राहणार? आम्ही तातडीच्या कामासाठी परगावी जाणार आहोत, असा सूर गृहलक्ष्मी लावते. पाहुण्याला जाणीव होते. तो आपला गाशा गुंडाळतो. घरातील सगळेच सुस्कारा सोडतात. शेजारचे नाना खोचकपणे विचारतात, पाहुणे गेले वाटते? बाबुराव उत्तरतात, शेवटी बोळवण करावी लागली. म्हणजे गोडीगुलाबीने, मोठ्या प्रेमाने रवानगी केली. येतात असे प्रसंग आयुष्यात.घरी आलेल्या पाहुण्यांची बोळवण करता येते. मंगलमूर्तीची बोळवण मोठ्या थाटामाटाने केली जाते. ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’ हे आपले उगी उगी. ही सारी व्यावाहरिक गणिते. संत म्हणतात ‘बोळवण’ मी तू पणाची झाली पाहिजे.‘मी तू पणाची झाली बोळवणएका जनार्दनी श्री दत्त ध्यान’असे ध्यान लागते का? द्वैताची बोळवण झाली पाहिजे. अहंकाराची बोळवण केली पाहिजे. ही बोळवण आरतीमध्ये सुरेख म्हणता येते. प्रत्यक्षात काय? गणित अवघड आहे. अशी गणिते सुटता सुटत नाहीत. ‘हरपले मन, झाले उन्मन’ मनरहित अवस्थेत जगता येणे शक्य होईल का? आहे ना अध्यात्म अवघड? जे अवघड आहे ते आपणच सोपे करायचे असते. त्याला शॉर्टकट नाही. तुकोबांच्या भाषेत सांगायचे तर।। कागदी लिहिली नावाची साखर, चाटिता मधुर केवी लागे।।भगवान श्री रमण महर्षींच्याकडे दर्शनासाठी आलेल्या पाश्चात्य विद्वान भक्ताने ‘माझे मन ध्यानात न लागता सदैव भटकत राहते’ असा प्रश्न केला तेव्हा महर्षी उत्तरले, जीवनातील नानात्व हे निश्चय करायला देत नाही. हे सरळ आहे. म्हणून अवघडही आहे. मी तू पणाची बोळवण हाच उतारा त्यावर आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक