शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अविद्येचा मळ गेल्याशिवाय देहास पावित्र्य प्राप्त होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 18:58 IST

तोपर्यंत कितीही गंगा स्नान केले तरी काय उपयोग?

- हभप भरतबुवा रामदासी, बीड

संतांचे वर्णन करतांना शास्त्रकार म्हणतात, त्यांच्या ठिकाणी शुचित्व आहे, दातृत्व आहे, मातेची ममता आहे. महत्प्रयासाने प्राप्त झालेल्या नरदेहाचे सार्थक व्हावे ही तळमळ आहे. संत अवतीर्ण होतात ते जड जीवाच्या कल्याणासाठी. येथे उपकारासाठी! आले घर ज्या वैकुंठी  !!मनुष्य संसारात जन्माला आला की त्याच्या ठिकाणी देह तादात्म्य निर्माण होते.  मी देह आहे, या स्फुरणामुळेच अपवित्रपणा निर्माण होतो. मी देह आहे, या अविद्येचा नाश होऊन मी ब्रह्म आहे, या स्वरूप स्थितीची जाणीव झाली की देह शुद्ध झाला. संत म्हणतात; देह शुद्ध करोनी ! भजनी भजावे !!आणिकाचे नाठवावे गुण दोष!!संतांच्या संदर्भात संताचा देह पवित्र का. .? तर देह म्हणजेच मी, व मी ब्रह्म आहे, हा त्यांचा अभिमान गळून पडलेला असतो. देहाचा ही अभिमान नाही व ब्रह्मास्मिचा ही अभिमान नाही. फक्त संत निरंजन स्थितीत जगत असतात. म्हणून तर त्यांच्या ठिकाणी शुचित्व येते. विद्या अविद्या या दोन्ही उपाधीचा त्याग करून निरंजन स्थितीला ते प्राप्त झालेले असतात. तुकाराम महाराज म्हणतातउपाधी वेगळे तुम्ही निर्विकार ! काहीच आकार तुम्हा नाही  !!अशा स्थितीला संत प्राप्त झालेले असतात. त्या मुळेच मिथ्या अभिमानी जीवाला शुचित्व देण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते. गंगेलाही पवित्र करण्याची अद्भूत शक्ती संताच्या जवळ असते. संत म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच. अहो....इतकच काय. .तीर्थाचेही तीर्थ म्हणजे संत  होय. माउली म्हणतात; जयाचे नाव तीर्थरावो ! दर्शने प्रशस्तीसी ठावो  !!लौकिक गंगेत स्नान करून देह पवित्र होईलही. ..पण पाप करण्याची बुद्धी नष्ट होईलच, असे नाही. अविद्येचा मळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत कितीही वेळा गंगा स्नान केले तरी काय उपयोग. .? संत दर्शनाने तर विद्या आणि अविद्या या दोन्ही मळाचा नाश होतो.  नुसत्या कृपा आशिर्वादाने संत साधकाला संतच करतात. तुकाराम महाराज म्हणतात;  आपणासारखे करिती तात्काळ! नाही काळ वेळ तयालागी !!आज चंगळवादाच्या बाजारात असे शुचित्व असणारे संत मिळणे अवघड आहे. आज तर अध्यात्म क्षेत्राचाही बाजार भरला जात आहे. समाजाला ही विवेकाची भान राहिले नाही. वरवरच्या भपकेपणाला भुलून आज माणसे नको त्याच्या नादी लागतात. अर्थात आज आत्मज्ञान तरी कुणाला हवे आहे. ..? ज्याला त्याला प्रापंचिक अडचणीतून मुक्त करणारे, जादुटोणा चमत्कार करणारे, नोकरी लाऊन देणारे, लग्न जमविणारे, लॉकेट अंगठ्या हवेतून काढून देणारे व भरपूर पैसा लुटणारे महाराज समाजाला हवे आहेत. समाज अशाच महाराजांच्या शोधात असतो 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्र. 8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक