शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: कवटीतल्या वह्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 02:53 IST

अभद्र विचारांची पाने खोडरबराने पुसून टाकून त्यावर पक्क्या शाईने आपले विचार आत्मविश्वासाने लिहितात आणि या जगात जिंकण्याचा नवा विक्रम निर्माण करीत राहतात.

विजयराज बोधनकर

निसर्गाने प्रत्येक माणसाला कवटी नावाचं कपाट दिलंय. त्या कवटी नावाच्या कपाटात न संपणाऱ्या कोºया वह्या नियतीने जन्मासोबतच पाठवून दिल्यात. त्या कपाटातल्या कोºया वह्यांवर ज्ञानाने, कर्माने, अनुभवाने ज्याने ज्याने उत्तम लिहून काढलं आणि त्याचा आयुष्यात वापर केला, त्या अनुभवी ज्ञानाचा उपयोग करून नाव मिळवलं, संपत्ती मिळविली आणि जगालाच पुन्हा ज्ञानरूपाने परतही केलं, त्या त्या माणसांचं जगणं सफल झालं आणि त्याच कपाटातल्या अनेक कोºया वह्यांना आपण मेंदू म्हणतो. याउलट ज्यांनी जन्माला येऊन कपाटातल्या मेंदू नामक वह्या कोºयाच ठेवल्यात ते केवळ आणि केवळ दुर्दैवीच ठरलेत. या कवटी नामक कपाटाला साफसूफ केलं नाही तर दारिद्र्याचे जाळे, जळमटे लागतात, त्यातून उग्रता प्रकटू लागते, वह्यांना वाळवी लागते. मग वाळवी लागलेल्या मेंदूनामक वह्या क्षीण होत जातात, अपयशाला कवटाळून बसतात. दुर्दैवी जगण्याच्या चिखलात हळूहळू रूतत जातात. असे होऊ नये म्हणून अनेक जागृत माणसे त्या कपाटातल्या वह्यांची साफसफाई करतात. अभद्र विचारांची पाने खोडरबराने पुसून टाकून त्यावर पक्क्या शाईने आपले विचार आत्मविश्वासाने लिहितात आणि या जगात जिंकण्याचा नवा विक्रम निर्माण करीत राहतात. कपाटातली प्रत्येक वही कोरीच असते, त्यावर आपण जे लिहू त्याला नियती तथास्तू म्हणत असते. मग उत्तम असेल तर उत्तम घडत जातं. अशुभ असेल तर अशुभच घडत जातं. प्रत्येकाने मात्र हेच ठरवायचं की नेमकं आपण लिहायचं तरी काय? कवटीतल्या वह्यांवर दुर्योधनाने क्रोधाच्या, मत्सराच्या, लोभाच्या कविता लिहिल्यात, रावणाने अहंकाराच्या, कामवासनेच्या कविता लिहिल्यात, कंसाने सिंहासनासाठी हत्येच्या कविता लिहिल्यात, नियतीने त्यांना अडवलं नाही. त्यांचा शेवट तसाच होऊ दिला. आपलाही शेवट कसा असावा हे फक्त आपणच ठरवू शकतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक