शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: कवटीतल्या वह्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 02:53 IST

अभद्र विचारांची पाने खोडरबराने पुसून टाकून त्यावर पक्क्या शाईने आपले विचार आत्मविश्वासाने लिहितात आणि या जगात जिंकण्याचा नवा विक्रम निर्माण करीत राहतात.

विजयराज बोधनकर

निसर्गाने प्रत्येक माणसाला कवटी नावाचं कपाट दिलंय. त्या कवटी नावाच्या कपाटात न संपणाऱ्या कोºया वह्या नियतीने जन्मासोबतच पाठवून दिल्यात. त्या कपाटातल्या कोºया वह्यांवर ज्ञानाने, कर्माने, अनुभवाने ज्याने ज्याने उत्तम लिहून काढलं आणि त्याचा आयुष्यात वापर केला, त्या अनुभवी ज्ञानाचा उपयोग करून नाव मिळवलं, संपत्ती मिळविली आणि जगालाच पुन्हा ज्ञानरूपाने परतही केलं, त्या त्या माणसांचं जगणं सफल झालं आणि त्याच कपाटातल्या अनेक कोºया वह्यांना आपण मेंदू म्हणतो. याउलट ज्यांनी जन्माला येऊन कपाटातल्या मेंदू नामक वह्या कोºयाच ठेवल्यात ते केवळ आणि केवळ दुर्दैवीच ठरलेत. या कवटी नामक कपाटाला साफसूफ केलं नाही तर दारिद्र्याचे जाळे, जळमटे लागतात, त्यातून उग्रता प्रकटू लागते, वह्यांना वाळवी लागते. मग वाळवी लागलेल्या मेंदूनामक वह्या क्षीण होत जातात, अपयशाला कवटाळून बसतात. दुर्दैवी जगण्याच्या चिखलात हळूहळू रूतत जातात. असे होऊ नये म्हणून अनेक जागृत माणसे त्या कपाटातल्या वह्यांची साफसफाई करतात. अभद्र विचारांची पाने खोडरबराने पुसून टाकून त्यावर पक्क्या शाईने आपले विचार आत्मविश्वासाने लिहितात आणि या जगात जिंकण्याचा नवा विक्रम निर्माण करीत राहतात. कपाटातली प्रत्येक वही कोरीच असते, त्यावर आपण जे लिहू त्याला नियती तथास्तू म्हणत असते. मग उत्तम असेल तर उत्तम घडत जातं. अशुभ असेल तर अशुभच घडत जातं. प्रत्येकाने मात्र हेच ठरवायचं की नेमकं आपण लिहायचं तरी काय? कवटीतल्या वह्यांवर दुर्योधनाने क्रोधाच्या, मत्सराच्या, लोभाच्या कविता लिहिल्यात, रावणाने अहंकाराच्या, कामवासनेच्या कविता लिहिल्यात, कंसाने सिंहासनासाठी हत्येच्या कविता लिहिल्यात, नियतीने त्यांना अडवलं नाही. त्यांचा शेवट तसाच होऊ दिला. आपलाही शेवट कसा असावा हे फक्त आपणच ठरवू शकतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक