शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

मानसिक शांततेसाठी श्रद्धा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:31 IST

जीवन संघर्षमय आहे. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती आहे. जिवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या जगात आपल्याला ...

जीवन संघर्षमय आहे. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती आहे. जिवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या जगात आपल्याला कोणीच सहकार्य करणारे नाही, आपण सर्वस्वी निराधार आहो, कसे होईल आपले. या विचारातून आलेली मानसिकता, आर्थिक दारिद्र्य आणि कौटुंबिक कलह, गैरसमज, शारिरीक आणि मानसिक व्याधी या सर्व बाबींमुळे माणुस खचून जातो. यातून आधार सापडतो त्याला आध्यात्मिक विचारधारेचा. कोणती तरी चित्शक्ती ज्याला देव संकल्पना म्हणता येईल, त्याकडे तो वळतो. एका जागतिक सर्वेक्षणानुसार असे प्रत्ययास आले आहे की, जगातील ७५0 कोटी लोकांपैकी ७00 कोटी लोक आस्तिकवादी श्रद्धा जोपासतात. श्रद्धा, भक्तीमुळे जर मानवाला सुखद अनुभव येत असेल, तर त्याला अंधश्रद्धा म्हणून टीका टिपणी का व्हावी? यावर अभ्यासकांनी विचारमंथन करुन प्रबोधन केले पाहिजे, असे मनोमन वाटते. केवळ हा प्रकार अंधश्रद्ध आहे, असे म्हणणाऱ्यांनी यावर मार्गदर्शन तरी केले पाहिजे. शासनानेसुद्धा या दृष्टीने उपाय सुचवावेत, जेणेकरुन मानसिकता आणि विचार स्थिरता येऊ शकेल.धार्मिक आणि भक्ती संपदेला श्रेष्ठत्व देणाºया विधायकतेवर फक्त टिका टिपणी करुन भागणार नाही. ‘कर्मे ईशू भजावा’ ही विचारधारा जनमानसात रुजविल्या गेली पाहिजे. मानवतावादी कार्य करणारी भारतवर्षात जी काही संस्थाने आहेत, त्यात शेगाव (बुलडाणा) येथील श्री गजानन महाराज संस्थानचा लौकिक आहे. भक्ती आणि सद्कार्याचा सुंदर समन्वय येथे आहे. म्हणूनच दरवर्षी कोट्यवधी भक्तगणांची मांदियाळी येथे येत असते. मानसिक अनुभूती या ठायी श्रद्धावानांना प्राप्त होते, म्हणूनच असे म्हणावेसे वाटते, श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा प्रश्न कळल्या पाहिजेत.आवश्यक आहे. महाराष्ट्रातील मराठी मायबोली असणाºया संतांनी कल्याणकारी समाज या स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न केले.आजच्या स्पर्धेच्या, गतिमान युगात चंगळवादी जीवनशैलीचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे सुख आनंदाऐवजी दु:ख निर्माण होत आहे. भौतिक सुखवादासाठी आम्ही नको त्या तडजोडी जीवनात स्वीकारत आहो, त्यामुळे नीती जीवनाला तिलांजली दिल्या जात आहे. सध्याच्या २१ व्या शतकात मंदिरे, प्रार्थना स्थळे भरमसाठ वाढली, भाविक जनाची प्रचंड गर्दीही दिसून येत आहे, परंतु भक्ती भावनेचा ओलावा त्यात किती? हा प्रश्न दिसून येतो. संत म्हणतात की, कर्मयोग आणि भक्ती योगाचा आचार धर्म पालन न करता केवळ कर्मकांडाने आनंदाभूती कशी येणार? आनंदाचे डोही आनंद तरंग हा संत तुकोबारायांचा विचार समजण्यासाठी आपल्याला विचार अवस्थेकडे वाटचाल करणे आवश्यक आहे.

- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे (शेगाव)शेगाव (जि. बुलडाणा)

 

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक