शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक शांततेसाठी श्रद्धा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:31 IST

जीवन संघर्षमय आहे. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती आहे. जिवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या जगात आपल्याला ...

जीवन संघर्षमय आहे. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती आहे. जिवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या जगात आपल्याला कोणीच सहकार्य करणारे नाही, आपण सर्वस्वी निराधार आहो, कसे होईल आपले. या विचारातून आलेली मानसिकता, आर्थिक दारिद्र्य आणि कौटुंबिक कलह, गैरसमज, शारिरीक आणि मानसिक व्याधी या सर्व बाबींमुळे माणुस खचून जातो. यातून आधार सापडतो त्याला आध्यात्मिक विचारधारेचा. कोणती तरी चित्शक्ती ज्याला देव संकल्पना म्हणता येईल, त्याकडे तो वळतो. एका जागतिक सर्वेक्षणानुसार असे प्रत्ययास आले आहे की, जगातील ७५0 कोटी लोकांपैकी ७00 कोटी लोक आस्तिकवादी श्रद्धा जोपासतात. श्रद्धा, भक्तीमुळे जर मानवाला सुखद अनुभव येत असेल, तर त्याला अंधश्रद्धा म्हणून टीका टिपणी का व्हावी? यावर अभ्यासकांनी विचारमंथन करुन प्रबोधन केले पाहिजे, असे मनोमन वाटते. केवळ हा प्रकार अंधश्रद्ध आहे, असे म्हणणाऱ्यांनी यावर मार्गदर्शन तरी केले पाहिजे. शासनानेसुद्धा या दृष्टीने उपाय सुचवावेत, जेणेकरुन मानसिकता आणि विचार स्थिरता येऊ शकेल.धार्मिक आणि भक्ती संपदेला श्रेष्ठत्व देणाºया विधायकतेवर फक्त टिका टिपणी करुन भागणार नाही. ‘कर्मे ईशू भजावा’ ही विचारधारा जनमानसात रुजविल्या गेली पाहिजे. मानवतावादी कार्य करणारी भारतवर्षात जी काही संस्थाने आहेत, त्यात शेगाव (बुलडाणा) येथील श्री गजानन महाराज संस्थानचा लौकिक आहे. भक्ती आणि सद्कार्याचा सुंदर समन्वय येथे आहे. म्हणूनच दरवर्षी कोट्यवधी भक्तगणांची मांदियाळी येथे येत असते. मानसिक अनुभूती या ठायी श्रद्धावानांना प्राप्त होते, म्हणूनच असे म्हणावेसे वाटते, श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा प्रश्न कळल्या पाहिजेत.आवश्यक आहे. महाराष्ट्रातील मराठी मायबोली असणाºया संतांनी कल्याणकारी समाज या स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न केले.आजच्या स्पर्धेच्या, गतिमान युगात चंगळवादी जीवनशैलीचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे सुख आनंदाऐवजी दु:ख निर्माण होत आहे. भौतिक सुखवादासाठी आम्ही नको त्या तडजोडी जीवनात स्वीकारत आहो, त्यामुळे नीती जीवनाला तिलांजली दिल्या जात आहे. सध्याच्या २१ व्या शतकात मंदिरे, प्रार्थना स्थळे भरमसाठ वाढली, भाविक जनाची प्रचंड गर्दीही दिसून येत आहे, परंतु भक्ती भावनेचा ओलावा त्यात किती? हा प्रश्न दिसून येतो. संत म्हणतात की, कर्मयोग आणि भक्ती योगाचा आचार धर्म पालन न करता केवळ कर्मकांडाने आनंदाभूती कशी येणार? आनंदाचे डोही आनंद तरंग हा संत तुकोबारायांचा विचार समजण्यासाठी आपल्याला विचार अवस्थेकडे वाटचाल करणे आवश्यक आहे.

- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे (शेगाव)शेगाव (जि. बुलडाणा)

 

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक