शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इस्लाम धर्मामध्ये देवाच्या एकत्वावर श्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:42 IST

रमजान ईद विशेष...!

इस्लाम धर्मामध्ये देवाच्या एकत्वावर श्रद्धा आहे. या धर्माला कोणीही संस्थापक नाही. कारण या धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानात ईश्वराला खूप महत्त्व आहे. ईश्वराने जगाची निर्मिती केल्यानंतर त्याच्या नियमनाचे तत्त्वज्ञान त्याने अनेक प्रेषितांकरवी मानवी समूहापर्यंत पाठविले. त्या तत्त्वज्ञानाला ईश्वरीय धर्म मानले जाते. ईश्वराने अशा तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अनेक प्रेषितांची मानवी समाजातून निवड केली. त्यापैकी हजरत मुहम्मद (स.) हे एक आहेत.

इस्लामने ईश्वराकडून नियुक्त केलेल्या प्रेषितांची संख्या १ लाख २४ हजार इतकी सांगितली आहे. प्रेषित मोहम्मद (स.) यांच्यापूर्वी ईश्वराने ज्यांना प्रेषित म्हणून निवडले होते, त्यांची नियुक्ती ही त्यांचा देश अथवा समाजापर्यंत मर्यादित होती. ईश्वराने प्रेषित नियुक्त करण्याचा इतिहास पृथ्वीच्या निर्मितीपासून सांगितला जातो. या परंपरेत हजरत आदम (अ.) यांचा प्रथम क्रमांक लागतो तर मोहम्मद (स.) यांचा अखेरचा क्रमांक आहे. ईश्वराने पाठविलेल्या प्रेषितांच्यानंतर त्यांच्या माध्यमातून आलेल्या तत्त्वज्ञानात मानवी समाजाने अनेक बदल करण्यात आले.

कालांतराने काही प्रेषितांच्या समाजातच एकेश्वरवादाला तिलांजली देण्यात आली. त्यामुळे र्ईश्वराने त्याच्याकडून आलेल्या मानवी समाजाच्या हितासाठी असणाºया तत्त्वज्ञानाच्या पुनर्जागरणासाठी प्रेषित मोहम्मद (स.) यांची निवड केली. त्यांनी इ.स. ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात ईश्वरीय धर्म असणाºया इस्लामच्या पुनर्जागरणाची सुरुवात केली. इस्लामच्या अनुयायांना किंवा त्या धर्माचे पालन करणाºया लोकांना मुसलमान म्हटले जाते. प्रत्येक धर्माची काही मूलतत्त्वे असतात. त्याप्रमाणे इस्लामचीदेखील काही मूलतत्त्वे आहेत. इस्लाम धर्माचा अंगीकार करण्यासाठी अल्लाहवर आणि हजरत मोहम्मद (स.) हे अखेरचे प्रेषित असण्यावर श्रध्दा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कलमा धारण केला पाहिजे.

मुसलमान होण्यासाठी त्याने जो कलमा धारण करावयाचा आहे, त्याचे अरबी शब्द असे आहेत ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल-अल्लाह’ (एकच ईश्वर असून, कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. मुहम्मद हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत.) इस्लाम स्वीकारणाºया व्यक्तीने इस्लामी तत्त्वज्ञानाच्या संहितेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. इस्लामी तत्त्वज्ञान कुरआन आणि प्रेषितांच्या वचनातून निर्माण झाले आहे.

हदिस व कुरआन हेच इस्लामी तत्त्वज्ञानाचे मुख्य आणि अंतिम स्त्रोत आहेत. त्यापैकी कुरआन हा ईश्वरी ग्रंथ आहे तर हदिस ही प्रेषितांची वचने आहेत. कुरआनचा लेखक कोणी व्यक्ती नाही तर ते र्ईश्वराकडून अवतरलेले ईश्वरी संदेश आहे. ते अरबी भाषेत अवतरले आहे. कुरआनची रचना इतर ग्रंथांपेक्षा वेगळी आहे. ते काही सूरहमध्ये विभागले आहे. सूरह याचा शब्दश: अर्थ ‘कुंपणाने घेरलेली जागा’असा होतो. कुरआनची रचना एकूण ११४ सूरहमध्ये करण्यात आली आहे. कुरआनच्या सूरहचेदेखील दोन प्रकार आहेत. त्याला मक्की व मदीनी म्हटले जाते. हजरत मोहम्मद (स.) यांच्या मदिनेकडील प्रस्थानाअगोदर अवतीर्ण झालेल्या सूरहना मक्की म्हणजे मक्का येथील वास्तव्यात अवतरलेले सूरह आणि त्यानंतरच्या सूरहना मदीनी असे म्हणतात. कुरआनमधील श्लोकास आयत असे म्हणतात. आयत या शब्दाचा अर्थ चिन्ह असा होतो.- आसिफ इक्बाल

टॅग्स :SolapurसोलापूरRamadanरमजानAdhyatmikआध्यात्मिक