शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

इस्लाम धर्मामध्ये देवाच्या एकत्वावर श्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:42 IST

रमजान ईद विशेष...!

इस्लाम धर्मामध्ये देवाच्या एकत्वावर श्रद्धा आहे. या धर्माला कोणीही संस्थापक नाही. कारण या धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानात ईश्वराला खूप महत्त्व आहे. ईश्वराने जगाची निर्मिती केल्यानंतर त्याच्या नियमनाचे तत्त्वज्ञान त्याने अनेक प्रेषितांकरवी मानवी समूहापर्यंत पाठविले. त्या तत्त्वज्ञानाला ईश्वरीय धर्म मानले जाते. ईश्वराने अशा तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अनेक प्रेषितांची मानवी समाजातून निवड केली. त्यापैकी हजरत मुहम्मद (स.) हे एक आहेत.

इस्लामने ईश्वराकडून नियुक्त केलेल्या प्रेषितांची संख्या १ लाख २४ हजार इतकी सांगितली आहे. प्रेषित मोहम्मद (स.) यांच्यापूर्वी ईश्वराने ज्यांना प्रेषित म्हणून निवडले होते, त्यांची नियुक्ती ही त्यांचा देश अथवा समाजापर्यंत मर्यादित होती. ईश्वराने प्रेषित नियुक्त करण्याचा इतिहास पृथ्वीच्या निर्मितीपासून सांगितला जातो. या परंपरेत हजरत आदम (अ.) यांचा प्रथम क्रमांक लागतो तर मोहम्मद (स.) यांचा अखेरचा क्रमांक आहे. ईश्वराने पाठविलेल्या प्रेषितांच्यानंतर त्यांच्या माध्यमातून आलेल्या तत्त्वज्ञानात मानवी समाजाने अनेक बदल करण्यात आले.

कालांतराने काही प्रेषितांच्या समाजातच एकेश्वरवादाला तिलांजली देण्यात आली. त्यामुळे र्ईश्वराने त्याच्याकडून आलेल्या मानवी समाजाच्या हितासाठी असणाºया तत्त्वज्ञानाच्या पुनर्जागरणासाठी प्रेषित मोहम्मद (स.) यांची निवड केली. त्यांनी इ.स. ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात ईश्वरीय धर्म असणाºया इस्लामच्या पुनर्जागरणाची सुरुवात केली. इस्लामच्या अनुयायांना किंवा त्या धर्माचे पालन करणाºया लोकांना मुसलमान म्हटले जाते. प्रत्येक धर्माची काही मूलतत्त्वे असतात. त्याप्रमाणे इस्लामचीदेखील काही मूलतत्त्वे आहेत. इस्लाम धर्माचा अंगीकार करण्यासाठी अल्लाहवर आणि हजरत मोहम्मद (स.) हे अखेरचे प्रेषित असण्यावर श्रध्दा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कलमा धारण केला पाहिजे.

मुसलमान होण्यासाठी त्याने जो कलमा धारण करावयाचा आहे, त्याचे अरबी शब्द असे आहेत ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल-अल्लाह’ (एकच ईश्वर असून, कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. मुहम्मद हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत.) इस्लाम स्वीकारणाºया व्यक्तीने इस्लामी तत्त्वज्ञानाच्या संहितेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. इस्लामी तत्त्वज्ञान कुरआन आणि प्रेषितांच्या वचनातून निर्माण झाले आहे.

हदिस व कुरआन हेच इस्लामी तत्त्वज्ञानाचे मुख्य आणि अंतिम स्त्रोत आहेत. त्यापैकी कुरआन हा ईश्वरी ग्रंथ आहे तर हदिस ही प्रेषितांची वचने आहेत. कुरआनचा लेखक कोणी व्यक्ती नाही तर ते र्ईश्वराकडून अवतरलेले ईश्वरी संदेश आहे. ते अरबी भाषेत अवतरले आहे. कुरआनची रचना इतर ग्रंथांपेक्षा वेगळी आहे. ते काही सूरहमध्ये विभागले आहे. सूरह याचा शब्दश: अर्थ ‘कुंपणाने घेरलेली जागा’असा होतो. कुरआनची रचना एकूण ११४ सूरहमध्ये करण्यात आली आहे. कुरआनच्या सूरहचेदेखील दोन प्रकार आहेत. त्याला मक्की व मदीनी म्हटले जाते. हजरत मोहम्मद (स.) यांच्या मदिनेकडील प्रस्थानाअगोदर अवतीर्ण झालेल्या सूरहना मक्की म्हणजे मक्का येथील वास्तव्यात अवतरलेले सूरह आणि त्यानंतरच्या सूरहना मदीनी असे म्हणतात. कुरआनमधील श्लोकास आयत असे म्हणतात. आयत या शब्दाचा अर्थ चिन्ह असा होतो.- आसिफ इक्बाल

टॅग्स :SolapurसोलापूरRamadanरमजानAdhyatmikआध्यात्मिक