शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
2
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
3
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
4
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
5
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
6
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
7
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
8
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
9
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
10
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
11
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
12
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
13
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
14
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
15
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
16
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
17
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
18
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
19
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
20
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: माणूस घडवणारा धर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 23:40 IST

व्यक्तिगत जीवन चिमण्या- कावळेही जगतात; पण व्यक्तिगत जीवन जगून ते दुसऱ्याच्या परोपकारार्थ झिजविता आले पाहिजे.

मोहनबुवा रामदासीराष्ट्रनिर्मिती ही केवळ पाच- १0 वर्षांसाठी नसते, तर माणसातला माणूसधर्म जागवणारा आणि जगणारा माणूसही धर्मस्थापना करीत असतो.समर्थ म्हणतात :धर्मसंस्थापनेचे नर। ते ईश्वराचे अवतार।झाले बहू पुढे होणार। देणे ईश्वराचे।।राष्ट्रधर्म ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ती दीर्घ काळापासून चालत आलेली आहे. आजपर्यंत अनेक साधू, संत, क्र ांतिकारक, स्वातंत्र्यवीरांनी ही धर्मसंस्थापना केली व ती दीर्घकाळ सांभाळली. यातील दोन महान राष्ट्रपुरुष व राष्ट्रसंत या भारतमातेच्या कुशीत जन्मले आहेत. यातील एक योद्धा संन्यासी श्री समर्थ रामदास स्वामी आणि एक संन्यस्त योद्धा स्वामी विवेकानंद. हे श्री समर्थ आणि स्वामी विवेकानंद या भारतमातेच्या पोटी जन्माला आले आणि या राष्ट्रसंतांनी माणसातला माणूसधर्म माणसाला शिकवला. त्याला हा माणूसधर्म जगण्याचा मार्ग दाखविला. प्रयत्नवाद हे दोघांचेही व्रत होते! कोणतेही राष्ट्र उभे करायचे असेल, प्रगत व्हायचे असेल तर सामान्य माणूस घडवला गेला पाहिजे. समर्थांनी धर्माची व्याख्या फार सुंदर केली आहे. ते म्हणाले :सकळ धर्मामधे धर्म। स्वरूपी रहाणे हा स्वधर्म। परोपकारार्थ देह झिजविला पाहिजे. झिजण्यावाचून कीर्ती कैची। मना चंदनाचे परी त्वा झिजावे। परी अंतरी सज्जना निववावे।व्यक्तिगत जीवन चिमण्या- कावळेही जगतात; पण व्यक्तिगत जीवन जगून ते दुसऱ्याच्या परोपकारार्थ झिजविता आले पाहिजे. श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद या भूतलावर निर्माण झाले आणि समाजातील मरगळ दूर सारून देव, देश आणि धर्माची शिकवण त्यांनी समाजाला दिली. मन आणि मनगट सशक्त असेल, तर आपल्यावर चालून आलेली शक्ती निर्बल पाहायला मिळेल. म्हणून धर्माधिष्ठित राज्य हेच खरे रामराज्य असेल!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक