शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
2
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
3
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
4
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
5
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
7
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
8
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
9
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
10
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
11
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
12
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
13
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
14
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
15
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
16
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
17
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

आनंद तरंग - अर्जुनविषादयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 03:34 IST

महाभारत युद्धासाठी समोर उभ्या ठाकलेल्या आपल्याच

शैलजा शेवडे

समोर असता, गुरुजन माझे, आप्त इष्ट भाऊ,सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?कंप सुटे हा, माझ्या शरीरा, भ्रमित मन होई,गांडीव धनु हे, हातामधुनी, बघ गळून जाई,सारी चिन्हे, विपरीत दिसती, दाह कसा शमवू,सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?ज्यांच्यासाठी वान्छितसे हे, राज्य भोग नि सुखे,तेच स्वजन रे, सिद्ध होऊनी, लढण्या समोर उभे,त्यांना मारून त्रैलोक्य नको मज, काय मही घेऊ?सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?गुरुजन, आणिक वडीलमंडळी, इतरही आप्त इथे,दुष्ट कौरवा, मारून आम्हा, सुख असे कोणते,स्वजना मारून, पापांचेच धनी आम्ही होऊ,सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?कुलक्षय होईल, अधर्म येईल, महत्पाप हे करणे,श्रेयस्कर ते प्रतिकाराविण, माझे रणी मरणे,नको नको हे युद्ध माधवा, रथ पुढे नेऊ,सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ,

महाभारत युद्धासाठी समोर उभ्या ठाकलेल्या आपल्याच आप्तस्वकीयांना बघून अर्जुन भांबावून गेला. अर्जुन अत्यंत पराक्रमी योद्धा. पण तरीही संवेदनाशील. क्षात्रधर्म एकीकडे लढ म्हणून खुणावतोय. अन्याय निपटून काढण्यासाठी, दुर्जनांना मारण्यासाठी युद्धासाठी तयार आहे. त्याचवेळी समोर शत्रुपक्षात आपल्याच लोकांना बघून बावरून गेलाय. हे युद्ध करून काय सुख मिळविणार आपण? असा संदेह त्याच्या मनात आलाय. त्याने आपले गांडीव धनुष्य खाली ठेवलंय आणि आपल्या सख्याला, सारथ्याला, कृष्णाला आपल्या मनातली खळबळ सांगतोय. सर्वसामान्य माणसालासुद्धा अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. धर्मात सांगितल्याप्रमाणे आपण सत्य बोलतो. तरीही मोठाच प्रश्न पडतो. म्हणूनच भगवद्गीतेचा अभ्यास अत्यंत उपयोगी पडतो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक