शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आनंद तरंग - देवळाच्या दारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 05:58 IST

अध्यात्मिक लेख

शैलजा शेवडेटेकावे जरासे, देवळाच्या दारी,शिणला हा भारी, जीव वाटे।शब्द बापुडे हे, काथ्याकूट किती,काळ दावी भीती, कोठे जावे।हिणवती सारी, म्हणती अडाणी,वाळवंटी पाणी, कोण देई।फिटले फिटले, भ्रम सारे सारे,जोशातले नारे, आता नाही।विटले हे मन, पुरे वणवण,दावी रे चरण, पांडुरंगा।

ते समचरण बघायचेच. त्या पंढरपूरला, भूलोकीच्या वैकुंठाला जायचेच. पंढरपूरला ‘नादब्रह्म असलेले क्षेत्रही म्हणले जाते. किती सुंदर कल्पना- विठ्ठलभक्त अखंड नामसंकीर्तनात रंगलेला असतो. नादातून कीर्तन आणि कीर्तनातून भक्तिभाव प्रकट होतो. भगवंताच्या नावात आणि भगवंतात कोणतेही अंतर नाही. हरिनाम हा दिव्य ध्वनी असतो आणि पंढरपुरात तर सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर चालू असतो. जेव्हा दिंडी येते, तेव्हा लाखो वारकरी एकाच चालीवर, एकाच टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर ताल धरून श्री विठ्ठलाचे गोडवे गातात. हे नादब्रह्म म्हणजे पंढरीस सदैव चालू असलेले ‘श्रवणम, कीर्तनम, संकीर्तनम’ आहे. इथली प्रधानता नामाची आहे. वाळवंटात असो, गल्लीत सर्वत्र कीर्तन, गीत, नृत्य आणि नामाचा जयघोष सुरू असतो आणि जिथे भक्तीने भगवंताचे नाव घेतले जाते, तिथे भगवंत असतोच. छे! हा अनुभव ‘याचि देही याचि डोळा’ घेतलाच पाहिजे. आपल्या घरात राहून परमेश्वराचे चिंतन करतोच आपण, पण लाखो भक्तांच्या सान्निध्यात जेव्हा तेच परमेश्वराचे नाव त्यांच्या सुरात सूर मिसळून घेतो, तेव्हा तो अनुभव अवर्णनीय असतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक