शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
4
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
5
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
6
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
7
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
8
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
9
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
10
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
11
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
12
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
13
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
14
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
15
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
16
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
17
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
18
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
19
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - देवळाच्या दारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 05:58 IST

अध्यात्मिक लेख

शैलजा शेवडेटेकावे जरासे, देवळाच्या दारी,शिणला हा भारी, जीव वाटे।शब्द बापुडे हे, काथ्याकूट किती,काळ दावी भीती, कोठे जावे।हिणवती सारी, म्हणती अडाणी,वाळवंटी पाणी, कोण देई।फिटले फिटले, भ्रम सारे सारे,जोशातले नारे, आता नाही।विटले हे मन, पुरे वणवण,दावी रे चरण, पांडुरंगा।

ते समचरण बघायचेच. त्या पंढरपूरला, भूलोकीच्या वैकुंठाला जायचेच. पंढरपूरला ‘नादब्रह्म असलेले क्षेत्रही म्हणले जाते. किती सुंदर कल्पना- विठ्ठलभक्त अखंड नामसंकीर्तनात रंगलेला असतो. नादातून कीर्तन आणि कीर्तनातून भक्तिभाव प्रकट होतो. भगवंताच्या नावात आणि भगवंतात कोणतेही अंतर नाही. हरिनाम हा दिव्य ध्वनी असतो आणि पंढरपुरात तर सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर चालू असतो. जेव्हा दिंडी येते, तेव्हा लाखो वारकरी एकाच चालीवर, एकाच टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर ताल धरून श्री विठ्ठलाचे गोडवे गातात. हे नादब्रह्म म्हणजे पंढरीस सदैव चालू असलेले ‘श्रवणम, कीर्तनम, संकीर्तनम’ आहे. इथली प्रधानता नामाची आहे. वाळवंटात असो, गल्लीत सर्वत्र कीर्तन, गीत, नृत्य आणि नामाचा जयघोष सुरू असतो आणि जिथे भक्तीने भगवंताचे नाव घेतले जाते, तिथे भगवंत असतोच. छे! हा अनुभव ‘याचि देही याचि डोळा’ घेतलाच पाहिजे. आपल्या घरात राहून परमेश्वराचे चिंतन करतोच आपण, पण लाखो भक्तांच्या सान्निध्यात जेव्हा तेच परमेश्वराचे नाव त्यांच्या सुरात सूर मिसळून घेतो, तेव्हा तो अनुभव अवर्णनीय असतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक