शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
5
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
6
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
7
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
8
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
9
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
10
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
11
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
12
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
13
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
14
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
15
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
16
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
17
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
18
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
19
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
20
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: मनाची कोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 01:21 IST

आयुष्यातला महत्त्वाचा काळ त्यात नष्ट होतो. सत्य व कठोर कर्मनिष्ठा यातून मिळविलेले सुख त्यावर ईश्वरीशक्तीची मोहोर उमटली असते.

विजयराज बोधनकरराहुल आणि अरविंद दोघे एकाच शाळेत शिकले. राहुल जागृत होता. तो नेहमी म्हणायचा, वर्तमानाच्या तळहातावर जगण्यासाठी मोहाला व अनाठायी ईर्ष्येला मुठीत ठेवणे गरजेचे असते. कारण प्रत्येकाचं मन काचेसारखं असतं. आपल्यासोबत ज्यांनी इतरांची मने सांभाळलीत, ती मने आपोआप समृद्ध होत जातात, पण अरविंद हा भूतकाळाच्या मोहात अडकलेला एक दुर्दैवी जीव होता. बऱ्याचदा भूतकाळ हा पोकळ गोष्टीसाठी झुरवतो, ठगवतो, हे त्याला समजत नव्हते, त्यामुळे तो प्रगतीच्या मार्गापर्यंत पोहोचू शकत नव्हता. राहुल नेहमी अरविंदला सांगायचासुद्धा की, जो सतत वर्तमानाच्या दिशेने चालत राहतो, तो मागे वळून कधीच पाहात नाही. कारण मागे असतात फक्त भाविनक खड्डे. फक्त भावनेपोटी बुद्धीची भेट झाली नाही तर वर्तमानाच्या स्वागतासाठी ऊर्जा निर्माण तरी कशी होणार? धनापेक्षा मनाची कोडी जो सोडवतो तो कुठल्याही सर्वोच्च पदापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो आणि बुद्धीचा उपयोग जर शिवरायांच्या पावलांनी केला, तर रावणाला संपविणारा मोह चटणीलासुद्धा उरणारा नसतो. निसर्ग हा सतत शिकवत असतो, पण त्याच्या शाळेकडे बोटावर मोजावी इतकीच माणसे लक्ष देऊन शिकत असतात. सहजसुख सर्वांनाच हवं असतं. त्यासाठी दुबळी माणसं खूप नानातºहेचे कल्पनेतील किंवा खोटे मार्ग शोधतात. शॉर्टकटने आलेलं सुख त्याच मार्गानं निघून जातं. आयुष्यातला महत्त्वाचा काळ त्यात नष्ट होतो. सत्य व कठोर कर्मनिष्ठा यातून मिळविलेले सुख त्यावर ईश्वरीशक्तीची मोहोर उमटली असते. तीच प्रामाणिक कमाई आयुष्याला श्रीमंत करून जाते. जग त्याच्यासोबत असतं. निसर्गनियमांचे पालन करून जो सातत्याने कर्म करतो तोच अनेक निरर्थक मोहाचे पिंडदान करू शकतो व मोहातून सुटका करून घेतो. याचमुळे आंतरिक कौशल्य बाहेर येत असेल तर विजयाचा आलेख वरती नेताना कोण थांबवू शकतो?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक