शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

आनंद तरंग: मनाची कोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 01:21 IST

आयुष्यातला महत्त्वाचा काळ त्यात नष्ट होतो. सत्य व कठोर कर्मनिष्ठा यातून मिळविलेले सुख त्यावर ईश्वरीशक्तीची मोहोर उमटली असते.

विजयराज बोधनकरराहुल आणि अरविंद दोघे एकाच शाळेत शिकले. राहुल जागृत होता. तो नेहमी म्हणायचा, वर्तमानाच्या तळहातावर जगण्यासाठी मोहाला व अनाठायी ईर्ष्येला मुठीत ठेवणे गरजेचे असते. कारण प्रत्येकाचं मन काचेसारखं असतं. आपल्यासोबत ज्यांनी इतरांची मने सांभाळलीत, ती मने आपोआप समृद्ध होत जातात, पण अरविंद हा भूतकाळाच्या मोहात अडकलेला एक दुर्दैवी जीव होता. बऱ्याचदा भूतकाळ हा पोकळ गोष्टीसाठी झुरवतो, ठगवतो, हे त्याला समजत नव्हते, त्यामुळे तो प्रगतीच्या मार्गापर्यंत पोहोचू शकत नव्हता. राहुल नेहमी अरविंदला सांगायचासुद्धा की, जो सतत वर्तमानाच्या दिशेने चालत राहतो, तो मागे वळून कधीच पाहात नाही. कारण मागे असतात फक्त भाविनक खड्डे. फक्त भावनेपोटी बुद्धीची भेट झाली नाही तर वर्तमानाच्या स्वागतासाठी ऊर्जा निर्माण तरी कशी होणार? धनापेक्षा मनाची कोडी जो सोडवतो तो कुठल्याही सर्वोच्च पदापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो आणि बुद्धीचा उपयोग जर शिवरायांच्या पावलांनी केला, तर रावणाला संपविणारा मोह चटणीलासुद्धा उरणारा नसतो. निसर्ग हा सतत शिकवत असतो, पण त्याच्या शाळेकडे बोटावर मोजावी इतकीच माणसे लक्ष देऊन शिकत असतात. सहजसुख सर्वांनाच हवं असतं. त्यासाठी दुबळी माणसं खूप नानातºहेचे कल्पनेतील किंवा खोटे मार्ग शोधतात. शॉर्टकटने आलेलं सुख त्याच मार्गानं निघून जातं. आयुष्यातला महत्त्वाचा काळ त्यात नष्ट होतो. सत्य व कठोर कर्मनिष्ठा यातून मिळविलेले सुख त्यावर ईश्वरीशक्तीची मोहोर उमटली असते. तीच प्रामाणिक कमाई आयुष्याला श्रीमंत करून जाते. जग त्याच्यासोबत असतं. निसर्गनियमांचे पालन करून जो सातत्याने कर्म करतो तोच अनेक निरर्थक मोहाचे पिंडदान करू शकतो व मोहातून सुटका करून घेतो. याचमुळे आंतरिक कौशल्य बाहेर येत असेल तर विजयाचा आलेख वरती नेताना कोण थांबवू शकतो?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक