शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

आनंद तरंग- आठवे शल्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 20:02 IST

उपद्रव्यमूल्य प्रस्थापित करणाऱ्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळणे हे आठवे शल्य नाही का?..

ठळक मुद्दे मुक्तक काव्याला खरी लोकप्रियता मिळाली ती महाकवी राजा भर्तुहरीमुळे....

-डॉ. रामचंद्र देखणे - 

संस्कृत महाकवींमध्ये राजा भर्तुहरी हा त्याच्या काव्यातील सुलभता, वास्तवता आणि सखोल विचार आशयता यामुळे आजही तो चिरतरुण कवी वाटतो. त्याने काव्याच्या अक्षरत्वाविषयी लिहिले आहे  की, सुकृती, विद्वान, आणि रससिद्ध कवीश्वर हा नित्य चिरतरुण असतो आणि त्याचे काव्यही. त्याच्या यशोमय शरीराला वार्धक्य आणि मरण याचे भय नसते. म्हणजे त्याच्या कवितेने केवळ चिरतरूणच नाही तर चिरंजीवही असतो. म्हणूनच दिक्कालाच्या मर्यादा सोडून तो पलीकडे जातो आणि कोणत्यही कालखंडातील रसिकांना तो आपला वाटतो. प्रबंधासारखे एखाद्या विषयात बंदिस्त न राहता आपले काव्य लहान लहान पदात मुक्त ठेवून संस्कृतमध्ये  मुक्तक काव्ये जन्माला आली. कालिदासाने काही मुक्तक काव्ये लिहिली परंतु मुक्तक काव्याला खरी लोकप्रियता मिळाली ती महाकवी राजा भर्तुहरीमुळे. राजा भर्तुहरीचे नीतिशतक, वैराग्यशतक आणि शृंगारशतक हा संस्कृत काव्यातील विविध विचार प्रवाहाचा एक त्रिवेणी संगम आहे. भर्तुहरीचे नीतिशतक हे व्यवहारनिती सांगणारे एक प्रभावी मुक्तक काव्य आहे. भर्तुहरी हा राजा होता. राजविलासाचा उपभोही त्याने घेतला होता. म्हणून शृंगाराची अनुभूती त्याच्या काव्यात होती. पण राजनितीचीही पूर्ण जाणीव या काव्यांमधील अनेक श्लोकांतून व्यक्त झाली आहे. या नितीशास्त्राला समाजनिती, राजनिती आणि अध्यात्मनिती याचा सुरेख समन्वय आहे. त्यातील एक श्लोक फारच बोलका आणि वास्तववादी आहे. ‘‘शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी।’’ या काव्यश्लोकाचे वामनपंडितांनी केलेले भाष्य मागच्या पिढीपर्यंत अनेकांच्या ओठावर होते.‘‘चंद्राला दिवसा प्रकाश नसणे ये कामिनीला जरा।पद्मावीण जले निरक्षरमुखी जो नेटका गोजिय।दात्याला धनलोभ नित्य वसते दारिद्र्य विद्वजानी।दुष्टांचा पगडा महीपतीगृही, ही सात शल्ये मनी।’’  भर्तुहरी सांगतो, दिवसा निस्तेज झालेला चंद्र, तारुण्य नष्ट झालेली कामिनी, कमलहीन सरोसर, निरक्षर सुंदर मुखे, द्रव्यलोभी राजा, नेहमी संकटात अडकलेला सज्जन आणि राजगृहात दुर्जनांचा प्रवेश तसेच वावर ही सात शल्ये माझ्या मनाला कायम लागून राहिली आहेत. सामाजिक आनंदाला पारख्या करणाऱ्या या सात उणिवा आहेत त्या आजच्या काळालाही सुसंगत आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे उपद्रव्यमूल्य प्रस्थापित करणाऱ्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळणे हे आठवे शल्य नाही का? आज जर भर्तुहरी असाता तर आजची शल्यही तितक्याच प्रभावीपणे मांडेले असते हे निश्चित.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकLokmatलोकमत