शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग- आठवे शल्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 20:02 IST

उपद्रव्यमूल्य प्रस्थापित करणाऱ्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळणे हे आठवे शल्य नाही का?..

ठळक मुद्दे मुक्तक काव्याला खरी लोकप्रियता मिळाली ती महाकवी राजा भर्तुहरीमुळे....

-डॉ. रामचंद्र देखणे - 

संस्कृत महाकवींमध्ये राजा भर्तुहरी हा त्याच्या काव्यातील सुलभता, वास्तवता आणि सखोल विचार आशयता यामुळे आजही तो चिरतरुण कवी वाटतो. त्याने काव्याच्या अक्षरत्वाविषयी लिहिले आहे  की, सुकृती, विद्वान, आणि रससिद्ध कवीश्वर हा नित्य चिरतरुण असतो आणि त्याचे काव्यही. त्याच्या यशोमय शरीराला वार्धक्य आणि मरण याचे भय नसते. म्हणजे त्याच्या कवितेने केवळ चिरतरूणच नाही तर चिरंजीवही असतो. म्हणूनच दिक्कालाच्या मर्यादा सोडून तो पलीकडे जातो आणि कोणत्यही कालखंडातील रसिकांना तो आपला वाटतो. प्रबंधासारखे एखाद्या विषयात बंदिस्त न राहता आपले काव्य लहान लहान पदात मुक्त ठेवून संस्कृतमध्ये  मुक्तक काव्ये जन्माला आली. कालिदासाने काही मुक्तक काव्ये लिहिली परंतु मुक्तक काव्याला खरी लोकप्रियता मिळाली ती महाकवी राजा भर्तुहरीमुळे. राजा भर्तुहरीचे नीतिशतक, वैराग्यशतक आणि शृंगारशतक हा संस्कृत काव्यातील विविध विचार प्रवाहाचा एक त्रिवेणी संगम आहे. भर्तुहरीचे नीतिशतक हे व्यवहारनिती सांगणारे एक प्रभावी मुक्तक काव्य आहे. भर्तुहरी हा राजा होता. राजविलासाचा उपभोही त्याने घेतला होता. म्हणून शृंगाराची अनुभूती त्याच्या काव्यात होती. पण राजनितीचीही पूर्ण जाणीव या काव्यांमधील अनेक श्लोकांतून व्यक्त झाली आहे. या नितीशास्त्राला समाजनिती, राजनिती आणि अध्यात्मनिती याचा सुरेख समन्वय आहे. त्यातील एक श्लोक फारच बोलका आणि वास्तववादी आहे. ‘‘शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी।’’ या काव्यश्लोकाचे वामनपंडितांनी केलेले भाष्य मागच्या पिढीपर्यंत अनेकांच्या ओठावर होते.‘‘चंद्राला दिवसा प्रकाश नसणे ये कामिनीला जरा।पद्मावीण जले निरक्षरमुखी जो नेटका गोजिय।दात्याला धनलोभ नित्य वसते दारिद्र्य विद्वजानी।दुष्टांचा पगडा महीपतीगृही, ही सात शल्ये मनी।’’  भर्तुहरी सांगतो, दिवसा निस्तेज झालेला चंद्र, तारुण्य नष्ट झालेली कामिनी, कमलहीन सरोसर, निरक्षर सुंदर मुखे, द्रव्यलोभी राजा, नेहमी संकटात अडकलेला सज्जन आणि राजगृहात दुर्जनांचा प्रवेश तसेच वावर ही सात शल्ये माझ्या मनाला कायम लागून राहिली आहेत. सामाजिक आनंदाला पारख्या करणाऱ्या या सात उणिवा आहेत त्या आजच्या काळालाही सुसंगत आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे उपद्रव्यमूल्य प्रस्थापित करणाऱ्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळणे हे आठवे शल्य नाही का? आज जर भर्तुहरी असाता तर आजची शल्यही तितक्याच प्रभावीपणे मांडेले असते हे निश्चित.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकLokmatलोकमत