शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - दुरितांचे तिमिर जावो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 07:43 IST

साने गुरुजींनी जेव्हा पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य बहुजनास प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला तेव्हा गुरुजी पांडुरंगास उद्देशून म्हणाले होते.

प्रा. शिवाजीराव भुकेलेसाने गुरुजींनी जेव्हा पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य बहुजनास प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला तेव्हा गुरुजी पांडुरंगास उद्देशून म्हणाले होते. ‘‘विठ्ठला! गोऱ्या-गुबगुबीत मुलाला कुणीही जवळ घेईल आणि त्याला कुरवाळू लागेल, पण त्या मुलास जवळ घेण्याची गरज आहे, ज्याचे जगात कुणीच नाही, अन्नपाण्याविना जे तळमळत आहेत. तुझी ही सारी लेकरे अशीच आहेत. त्यांना प्रथम जवळ घेण्याचे काम कर. त्यांना तुझे खरे स्वरूप दर्शन दे आणि तू खरंच लेकुरवाळा आहेस हे तुझ्या कृतीने सिद्ध कर.’’ साने गुरुजींची ही हाक पांडुरंगाने ऐकली असावी. त्यामुळे तो समतावादी देवाधिदेव झाला. गुरुजींच्या या प्रार्थनेचे बीजांकुर संत ज्ञानदेवांच्यादुरितांचे तिमिर जावों। विश्व स्वधर्म सूर्य पाहों।जो-जे वांछील। तो ते लाहों प्राणीजात।

या पसायदानातील ओवीत प्रतिबिंबित झालेले दिसते. ज्ञानदेवांच्या कालखंडात सहस्रावधी स्त्री-पुरुष धर्म-कर्माच्या काल्पनिक बंधनांनी करकचून आवळले गेले होते. मनुष्य मनुष्याला उराउरी भेटू शकत नव्हता. तेथे जाती-धर्माबरोबरच ज्ञानी-अज्ञानीपणाची कुंपणे आडवी येत होती. देवत्वाची जाणीव व स्वस्वरूपाचे ज्ञान यापासून तळागाळातला माणूस शेकडो योजने दूर होता. आध्यात्मिक क्षेत्रात तर त्याच्यावर आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण एवढेच म्हणायची वेळ आली होती. ज्ञानेश्वरासारख्या बहिष्कृताने समाजातील नाहीरे वर्गाचे पारमार्थिक संघटन केले आणि ज्ञानापासून दुरावलेल्या मंडळींच्या जीवनात ज्ञानेच्छा निर्माण करण्याचे अद्वितीय कार्य केले. वास्तविक पाहता ब्रह्म, माया, मोक्ष, मुक्तीच्या गप्पा मारल्याने ‘स्व’ला जाणून घेण्याचे ज्ञान होत नाही. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक