शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आनंद तरंग - दुरितांचे तिमिर जावो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 07:43 IST

साने गुरुजींनी जेव्हा पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य बहुजनास प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला तेव्हा गुरुजी पांडुरंगास उद्देशून म्हणाले होते.

प्रा. शिवाजीराव भुकेलेसाने गुरुजींनी जेव्हा पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य बहुजनास प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला तेव्हा गुरुजी पांडुरंगास उद्देशून म्हणाले होते. ‘‘विठ्ठला! गोऱ्या-गुबगुबीत मुलाला कुणीही जवळ घेईल आणि त्याला कुरवाळू लागेल, पण त्या मुलास जवळ घेण्याची गरज आहे, ज्याचे जगात कुणीच नाही, अन्नपाण्याविना जे तळमळत आहेत. तुझी ही सारी लेकरे अशीच आहेत. त्यांना प्रथम जवळ घेण्याचे काम कर. त्यांना तुझे खरे स्वरूप दर्शन दे आणि तू खरंच लेकुरवाळा आहेस हे तुझ्या कृतीने सिद्ध कर.’’ साने गुरुजींची ही हाक पांडुरंगाने ऐकली असावी. त्यामुळे तो समतावादी देवाधिदेव झाला. गुरुजींच्या या प्रार्थनेचे बीजांकुर संत ज्ञानदेवांच्यादुरितांचे तिमिर जावों। विश्व स्वधर्म सूर्य पाहों।जो-जे वांछील। तो ते लाहों प्राणीजात।

या पसायदानातील ओवीत प्रतिबिंबित झालेले दिसते. ज्ञानदेवांच्या कालखंडात सहस्रावधी स्त्री-पुरुष धर्म-कर्माच्या काल्पनिक बंधनांनी करकचून आवळले गेले होते. मनुष्य मनुष्याला उराउरी भेटू शकत नव्हता. तेथे जाती-धर्माबरोबरच ज्ञानी-अज्ञानीपणाची कुंपणे आडवी येत होती. देवत्वाची जाणीव व स्वस्वरूपाचे ज्ञान यापासून तळागाळातला माणूस शेकडो योजने दूर होता. आध्यात्मिक क्षेत्रात तर त्याच्यावर आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण एवढेच म्हणायची वेळ आली होती. ज्ञानेश्वरासारख्या बहिष्कृताने समाजातील नाहीरे वर्गाचे पारमार्थिक संघटन केले आणि ज्ञानापासून दुरावलेल्या मंडळींच्या जीवनात ज्ञानेच्छा निर्माण करण्याचे अद्वितीय कार्य केले. वास्तविक पाहता ब्रह्म, माया, मोक्ष, मुक्तीच्या गप्पा मारल्याने ‘स्व’ला जाणून घेण्याचे ज्ञान होत नाही. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक