शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - ...आणि ग्रंथोपजिवीये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 04:16 IST

परमार्थ हा कृतीचा, कर्माचा, योगाचा, ज्ञानाचा, कर्मकांडाचा, भक्तीचा की विचाराचा असावा

प्रा. शिवाजीराव भुकेलेपरमार्थ हा कृतीचा, कर्माचा, योगाचा, ज्ञानाचा, कर्मकांडाचा, भक्तीचा की विचाराचा असावा, या बाबतीत कथा-कीर्तनाचे फड उभे करणाऱ्या मंडळींमध्येच एकमत झालेले नाही. यातील अनेकांची अवस्था ‘हत्ती’ पाहायला गेलेल्या सहा आंधळ्यांसारखी झाली आहे. ज्याच्या हाती जे लागते, तो तेच अंतिम सत्य म्हणून प्रतिपादन करू लागला आहे. या साºया गदारोळावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे परमार्थ. हा विचाराचा असावा आणि विचारनिर्मितीचे ऊर्जाकेंद्रे संताच्या वाङ्मय मूर्ती अर्थात ग्रंथ आहेत. नदीच्या विस्तारापेक्षा तिच्या खोलीला महत्त्व आहे. आतून ‘तळ’ उथळ होऊन नदी विस्तारत गेली की, पहिल्याच महापुरात गावागावांत शिरून गावकऱ्यांना जीवन नकोसे करते. या निसर्ग नियमाप्रमाणेच परमार्थाचा एक नियम आहे, ज्याच्या परमार्थ मार्गास वैचारिक अधिष्ठान नाही, तो आपल्यासहीत इतरांचे जीवन दु:खी करतो. याउलट वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालेला परमार्थिक ‘सर्वसुखी’ समाजाची संकल्पना सत्यात उतरण्यासाठी धडपडतो आणि वैचारिक अधिष्ठान निर्माण करणारी निष्काम माउली म्हणजे ग्रंथ होत. ज्यांचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माउली म्हणते,अहिता पासून काठीती। हित देऊन वाढविती।नाही गा श्रृति परौती। माउली जगा।

माणसाला शेकडो आपत्तीपासून वाचवून त्याची इष्टापत्तीकडे वाटचाल व्हावी, म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी श्रृती माउली म्हणजे ग्रंथ होत. ग्रंथाचे वाचन मनातील स्वस्वरूपाच्या अंधाराला नष्ट करून त्याला उजेडाची स्वप्ने दाखवितात. म्हणून माणसाच्या माणुसकीची व पारमार्थिक विचारांची आणि सामाजिक विचारांची उंची त्याच्या धन संचयातून आणि धनातून मिळणाºया मानातून समजत नाही, तर त्यांच्या ग्रंथ संपदेवरून व ग्रंथवाचनावरून समजते. पुस्तके-मस्तके समृद्ध करतात, हे वाक्य आपण वारंवार ऐकत आलो आहोत, पण ते मस्तकातच घुसायला तयार नाहीत. कारण आज अनेक उच्चशिक्षित मंडळींनीच वाचन संस्कृती आणि ग्रंथोपजिवीचे समाज निर्मितीचा पराभव केला आहे. परमार्थाच्या क्षेत्रात तर ग्रंथवाचनातून ‘विवेकाची कास’ धरण्यापेक्षा नमस्कार, चमत्कार, जारण, मारण, वशीटन, ऋद्धी, सिद्धी इ. बाह्य सोंगा-ढोंगांना खूपच महत्त्व दिले जात आहे. म्हणून मस्तकावर कुठल्याही धर्म पंथाचा टिळा नसला तरी चालेल, पण मस्तकाच्या आत त्या धर्म सांप्रदायाने निर्माण केलेला सुविचार असला पाहिजे आणि या सुविचाराची पेरणी उत्तमोत्तम, ग्रंथाचे ‘वाचनच’ निर्माण करू शकते.

ग्रंथ जगण्याला अर्थ देतात. आत्म्याचे भान जागे करतात अन् निद्रिस्त समाज जीवनास खडबडून जागे करतात, म्हणून ज्ञानदेव कळायचे असतील, तर ज्ञानेश्वरी कळावी लागेल, तुकोबा कळायचे असतील, तर ‘गाथा’ कळावी लागेल अन् कृष्ण कळायचे असतील, तर ‘गीता’ कळावी लागेल व अस्था ग्रंथोपजीवी समाजासच ग्रंथ दृश्य व अदृश्य फळ देतात, ज्याचे वर्णन करताना ज्ञानदेव माउली म्हणतात,आणि ग्रंथेपजीविये । विशेषे लोकी इये।दृष्टा-दृष्टविजयें। होआवें जी।।

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक