शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

आनंद तरंग - जेथे कामु उपजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 06:59 IST

साधकाच्या साधन मार्गावरील वाटचालीत आडवा येणारा सर्वांत मोठा भुजंग म्हणजे ‘काम’ नावाचा विकार होय.

प्रा. शिवाजीराव भुकेलेसाधकाच्या साधन मार्गावरील वाटचालीत आडवा येणारा सर्वांत मोठा भुजंग म्हणजे ‘काम’ नावाचा विकार होय. ‘कामा’च्या प्रभावामुळे ‘इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, तर नारद चुकला चाळा भजनाचा’ असा सर्वव्यापी शत्रू म्हणजे काम विकार होय. जोपर्यंत पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये यांना साधकास जिंकता येत नाही, तोपर्यंत तो अकरावे अतिंद्रिय इंद्रिय मनास जिंकूच शकत नाही. त्यातल्या त्यात ‘काम’ हा विकार साधकाच्या जीवनात मोहाच्या सुंदर फुलबागा निर्माण करतो अन् एखाद्या बेसावध क्षणी मोहाच्या निसरड्या वाटेवरून जाता-जाता त्याचा पाय असा घसरतो की, हरिभक्तीमध्ये परायण होता-होता कधी इंद्रिय भक्त परायण होतो, याचा त्याचा त्यालाच पत्ता लागत नाही. हो! एक गोष्ट निश्चित की, जेव्हा काम हा सात्त्विक इच्छेपुरता मर्यादित राहतो, तेव्हा त्याचे पुरुषार्थामध्ये परिवर्तन होते. एखाद्या सद्गृृहस्थाने शुद्ध विचारांच्या कन्यापुत्रांना जन्म देणे, त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांना जगण्याचे बळ देता-देता त्यांच्याकरवी सत्त्वशील समाज निर्मितीचे स्वप्न पाहणे, एवढ्यापुरता काम जर मर्यादित राहिला, तर समाजात सात्त्विक विचारांचा झेंडा फडकविणाऱ्या कन्यापुत्रांचा अभिमान राष्ट्रास वाटू लागतो, परंतु हाच काम जेव्हा वासनेत रूपांतरित होतो, तेव्हा पुरुषार्थाचा विकार केव्हा झाला, हे साधकाच्याच नव्हे, तर संत, महंत, मठाधीशांच्यासुद्धा लक्षात येत नाही. जर काम-क्रोधासारख्या चोरांच्या बरोबर राहून परमार्थाचा पैलतीर गाठता येईल, असे पारमार्थिकास वाटत असेल, तर त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. हा तर कमरेला धोंडा बांधून भरलेल्या नदीत उडी मारण्याचा प्रकार झाला. म्हणून परमार्थाच्या मार्गावरील वाटसरूंना सावध करताना ज्ञानोबा माउली म्हणाले होते,

चोराचिया संगे क्रमिता पै पंथ । ठकुनिया घात करितीकाम, क्रोध, लोभ घेऊनिया संगे ।परमार्थासी रिंघे तोचि मुर्ख ।

ज्ञानोबा माउलींच्या दृष्टीने काम-क्रोधांना बरोबर घेऊन परमार्थ करणे हाच मुळात मूर्खपणा आहे आणि तोच मूर्खपणा ज्ञानदेवांनंतर ७५0 वर्षांनीसुद्धा आम्ही करीत आहोत. त्यामुळे बलात्कार, हिंसा, अनैतिकता, अत्याचार, विवेकहीन वर्तन हाच आजच्या समाजाचा शिष्टाचार होऊ पाहत आहे. षड्रिपूंच्या अतिरिक्त प्रभावामुळेच हे सारे घडत आहे. या सत्याचे निक्षूण प्रतिपादन ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा, एकोबा इ. संतानी केले. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक