शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आनंद तरंग - जेथे कामु उपजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 06:59 IST

साधकाच्या साधन मार्गावरील वाटचालीत आडवा येणारा सर्वांत मोठा भुजंग म्हणजे ‘काम’ नावाचा विकार होय.

प्रा. शिवाजीराव भुकेलेसाधकाच्या साधन मार्गावरील वाटचालीत आडवा येणारा सर्वांत मोठा भुजंग म्हणजे ‘काम’ नावाचा विकार होय. ‘कामा’च्या प्रभावामुळे ‘इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, तर नारद चुकला चाळा भजनाचा’ असा सर्वव्यापी शत्रू म्हणजे काम विकार होय. जोपर्यंत पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये यांना साधकास जिंकता येत नाही, तोपर्यंत तो अकरावे अतिंद्रिय इंद्रिय मनास जिंकूच शकत नाही. त्यातल्या त्यात ‘काम’ हा विकार साधकाच्या जीवनात मोहाच्या सुंदर फुलबागा निर्माण करतो अन् एखाद्या बेसावध क्षणी मोहाच्या निसरड्या वाटेवरून जाता-जाता त्याचा पाय असा घसरतो की, हरिभक्तीमध्ये परायण होता-होता कधी इंद्रिय भक्त परायण होतो, याचा त्याचा त्यालाच पत्ता लागत नाही. हो! एक गोष्ट निश्चित की, जेव्हा काम हा सात्त्विक इच्छेपुरता मर्यादित राहतो, तेव्हा त्याचे पुरुषार्थामध्ये परिवर्तन होते. एखाद्या सद्गृृहस्थाने शुद्ध विचारांच्या कन्यापुत्रांना जन्म देणे, त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांना जगण्याचे बळ देता-देता त्यांच्याकरवी सत्त्वशील समाज निर्मितीचे स्वप्न पाहणे, एवढ्यापुरता काम जर मर्यादित राहिला, तर समाजात सात्त्विक विचारांचा झेंडा फडकविणाऱ्या कन्यापुत्रांचा अभिमान राष्ट्रास वाटू लागतो, परंतु हाच काम जेव्हा वासनेत रूपांतरित होतो, तेव्हा पुरुषार्थाचा विकार केव्हा झाला, हे साधकाच्याच नव्हे, तर संत, महंत, मठाधीशांच्यासुद्धा लक्षात येत नाही. जर काम-क्रोधासारख्या चोरांच्या बरोबर राहून परमार्थाचा पैलतीर गाठता येईल, असे पारमार्थिकास वाटत असेल, तर त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. हा तर कमरेला धोंडा बांधून भरलेल्या नदीत उडी मारण्याचा प्रकार झाला. म्हणून परमार्थाच्या मार्गावरील वाटसरूंना सावध करताना ज्ञानोबा माउली म्हणाले होते,

चोराचिया संगे क्रमिता पै पंथ । ठकुनिया घात करितीकाम, क्रोध, लोभ घेऊनिया संगे ।परमार्थासी रिंघे तोचि मुर्ख ।

ज्ञानोबा माउलींच्या दृष्टीने काम-क्रोधांना बरोबर घेऊन परमार्थ करणे हाच मुळात मूर्खपणा आहे आणि तोच मूर्खपणा ज्ञानदेवांनंतर ७५0 वर्षांनीसुद्धा आम्ही करीत आहोत. त्यामुळे बलात्कार, हिंसा, अनैतिकता, अत्याचार, विवेकहीन वर्तन हाच आजच्या समाजाचा शिष्टाचार होऊ पाहत आहे. षड्रिपूंच्या अतिरिक्त प्रभावामुळेच हे सारे घडत आहे. या सत्याचे निक्षूण प्रतिपादन ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा, एकोबा इ. संतानी केले. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक