शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

आनंद तरंग - प्रिय वक्तेया होवावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 06:51 IST

बा.भो. शास्त्री निसर्गाने वाणी व पाणी माणसाला फुकट दिलं. कसं वापरावं याचा विवेक पण दिला. पाण्याचा वापर नीट केला ...

बा.भो. शास्त्री

निसर्गाने वाणी व पाणी माणसाला फुकट दिलं. कसं वापरावं याचा विवेक पण दिला. पाण्याचा वापर नीट केला नाही. याचे दुष्परिणाम आपण आज भोगत आहोत. दूध व पाणी सारखा भाव झाला. गंगाजलाचं आम्ही गटार केलं. अशीच वाणीही दुश्चित केली. शब्दातून वाहणारी भावना विकारी झाली. आम्ही वाणीची स्वच्छता करायला नको? ‘‘आंधळ्याची मुलं आंधळी असतात’’ हे द्रोपदीचं सदोष वाक्य, ‘‘सुईच्या टोकावर बसेल एवढी माती देणार नाही’’ ही दुर्योधनाची वाणी म्हणजे जहाल विषच, यामुळे महाभारत घडलं. मंथरेच्या जिभेवर रामायण घडलं, वाणी विशुद्ध असावी. माधुर्य असावं. ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशी नसली तरी पाण्यासारखी निर्मळ असायला काय हरकत आहे.

‘‘प्रियवाक्य प्रदानेन सर्वे तुष्यति जंतव:तस्मात्तदेव वक्त व्यं वचने का दरिद्रता’’

पाणी बागेला दिलं तर, फुलांचा सुगंध व फळांचा रस मिळतो. पाणी उसात गेलं तर गोड होतं. कारल्यात गेलं तर कडू, मिरचीत तिखट होतं. मूळ पाण्यात मुख्य तीन गुण आहेत. त्यात नैसर्गिक स्वच्छता, माधुर्य व शीतलता आहे. हेच गुण वाणीत असले तर, शब्दात थंडावा, मधाळता व शुद्धता येते. या तीनच गुणांनी माणूस मोठा होतो. जनप्रिय होतो. विश्वासपात्र होतो. खरं तर एवढंच पुरेसं आहे. संतांच्या गावाचा परिचय करून देताना तुकोबा म्हणतात,

‘‘संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळनाही तळमळ दु:खलेशतेथे मी राहीन होऊनी याचकघालितिल भीक तेची मज’’

पाण्याच्या दुष्काळात माणसं मरतात. प्रेमाच्या दुष्काळात माणुसकी मरते. संत म्हणजे आनंदघन, त्यांच्या वाणीतून आनंदाची वर्षा होते. त्यांना कसं बोलायचं गीता शिकवते. ‘‘अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाड.यं तप उच्यते’’ या श्लोकात कसं बोलावं याची शाळाच आहे आणि तो वाग्यज्ञही आहे. श्री चक्रधर शिष्य नागदेव पुजाऱ्याला उद्वेग येईल असं रगेल आवाजात बोलला, ‘‘अगा अगा गुरवा उभा राहे’’ त्याची अभद्रवाणी स्वामींना आवडली नाही. लगेच ते म्हणाले ‘‘तू महात्मा नव्हसी?’’ ‘महात्मेनी प्रिये वक्तेया होवावे’ हाच भाव ज्ञानेश्वर महाराजांनी एका गोड ओवीत सांगितला आहे. ‘‘तैसे साच आणि मवाळ! मितले आणि रसाळ! शब्द जैसे कल्लोळ! अमृताचे’’ सूत्रात वक्तृत्वाचा गाभा सांगितला आहे. हे सूत्र म्हणजे वक्तृत्व शास्त्राचं बिज आहे. वक्त्याने श्रोत्यांच्या भाषेत बोलावं. शब्द प्रेमाने ओथंबावे. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक