शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

...पण कधीतरी त्या डोकं वर काढतातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 04:55 IST

स्वामी विवेकानंदांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत.

- शैलजा शेवडेस्वामी विवेकानंदांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामीजींचा ‘यत्र जिवो तत्र शिव:’ हा विचार, ‘उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’ हा संदेश, त्यांचा ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग. त्यांची ज्ञानोत्तर भक्ती, त्यांचा अद्वैतवाद! हा सगळा अभ्यास, चिंतन, मनन सर्व केवळ आनंददायी! त्यांनी सांगितले, ‘प्रत्येकात ईश्वर आहे. अंतर्मन आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून दैवी अंशास जागे करा.’ परकीय सत्तेच्या तडाख्याने खचून गेलेल्या, स्वत्त्वाचे तेज विसरून गेलेल्या हिंदू बांधवांना त्यांनी संघटित केले. त्यांना गती, दिशा दिली. उद्घोष केला तो शक्तीच्या, सामर्थ्याच्या उपासनेचा, शरीरबल, मनोबल आणि आत्मबलाच्या उपासनेचा! स्वामी विवेकानंदांनी सगळ्या जगाला हिंदूंच्या अद्वैत सिद्धांताची म्हणजेच वेदांताची ओळख करून दिली. उपनिषदांची ओळख करून दिली. ते सांगत, ‘उपनिषदे हे सामर्थ्याचे अक्षयकोष आहेत. सर्व विश्व गदागदा हलविल असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे. सारे विश्व त्याच्या संदेशाने चैतन्यमय होईल. सामर्थ्यमय होईल. विविध वंश, जाती, पंथ यांच्यात जे दीनदुबळे आहेत, त्यांच्यात उपनिषदांचा ललकार सामर्थ्य ओतील, त्यांना मुक्त, निर्भय करील, स्वातंत्र्य-शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य -हे उपनिषदांचे प्राणसूत्र आहे. शक्तीची उपासना हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो. हे बंधो, दुर्बल बनू नको! शक्तीची उपासना कर. आपण स्वत:ला दुबळे समजत असतो. पण एकदा स्वसामर्थ्याची ओळख झाली, की कळतं, मी दुबळा नाही. कोणी मला चिरडून टाकू शकत नाही. कबूल आहे, हातून चुका होतात. पण म्हणून स्वत:ला वाईट समजायचं कारण नाही. त्या सुधारू शकतो आपण! मानसशास्त्रज्ञ फ्रोईड म्हणतो, ‘‘माणसाचं मन समाजात दाखवायला, बाहेरून जरी सुसंस्कृत असलं, तरी तो बुरखा असतो. दुष्ट प्रवृत्ती आत कोंडून ठेवलेल्या असतात. पण कधीतरी त्या डोकं वर काढतातच.