शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

...पण कधीतरी त्या डोकं वर काढतातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 04:55 IST

स्वामी विवेकानंदांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत.

- शैलजा शेवडेस्वामी विवेकानंदांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामीजींचा ‘यत्र जिवो तत्र शिव:’ हा विचार, ‘उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’ हा संदेश, त्यांचा ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग. त्यांची ज्ञानोत्तर भक्ती, त्यांचा अद्वैतवाद! हा सगळा अभ्यास, चिंतन, मनन सर्व केवळ आनंददायी! त्यांनी सांगितले, ‘प्रत्येकात ईश्वर आहे. अंतर्मन आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून दैवी अंशास जागे करा.’ परकीय सत्तेच्या तडाख्याने खचून गेलेल्या, स्वत्त्वाचे तेज विसरून गेलेल्या हिंदू बांधवांना त्यांनी संघटित केले. त्यांना गती, दिशा दिली. उद्घोष केला तो शक्तीच्या, सामर्थ्याच्या उपासनेचा, शरीरबल, मनोबल आणि आत्मबलाच्या उपासनेचा! स्वामी विवेकानंदांनी सगळ्या जगाला हिंदूंच्या अद्वैत सिद्धांताची म्हणजेच वेदांताची ओळख करून दिली. उपनिषदांची ओळख करून दिली. ते सांगत, ‘उपनिषदे हे सामर्थ्याचे अक्षयकोष आहेत. सर्व विश्व गदागदा हलविल असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे. सारे विश्व त्याच्या संदेशाने चैतन्यमय होईल. सामर्थ्यमय होईल. विविध वंश, जाती, पंथ यांच्यात जे दीनदुबळे आहेत, त्यांच्यात उपनिषदांचा ललकार सामर्थ्य ओतील, त्यांना मुक्त, निर्भय करील, स्वातंत्र्य-शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य -हे उपनिषदांचे प्राणसूत्र आहे. शक्तीची उपासना हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो. हे बंधो, दुर्बल बनू नको! शक्तीची उपासना कर. आपण स्वत:ला दुबळे समजत असतो. पण एकदा स्वसामर्थ्याची ओळख झाली, की कळतं, मी दुबळा नाही. कोणी मला चिरडून टाकू शकत नाही. कबूल आहे, हातून चुका होतात. पण म्हणून स्वत:ला वाईट समजायचं कारण नाही. त्या सुधारू शकतो आपण! मानसशास्त्रज्ञ फ्रोईड म्हणतो, ‘‘माणसाचं मन समाजात दाखवायला, बाहेरून जरी सुसंस्कृत असलं, तरी तो बुरखा असतो. दुष्ट प्रवृत्ती आत कोंडून ठेवलेल्या असतात. पण कधीतरी त्या डोकं वर काढतातच.