शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

...पण कधीतरी त्या डोकं वर काढतातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 04:55 IST

स्वामी विवेकानंदांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत.

- शैलजा शेवडेस्वामी विवेकानंदांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामीजींचा ‘यत्र जिवो तत्र शिव:’ हा विचार, ‘उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’ हा संदेश, त्यांचा ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग. त्यांची ज्ञानोत्तर भक्ती, त्यांचा अद्वैतवाद! हा सगळा अभ्यास, चिंतन, मनन सर्व केवळ आनंददायी! त्यांनी सांगितले, ‘प्रत्येकात ईश्वर आहे. अंतर्मन आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून दैवी अंशास जागे करा.’ परकीय सत्तेच्या तडाख्याने खचून गेलेल्या, स्वत्त्वाचे तेज विसरून गेलेल्या हिंदू बांधवांना त्यांनी संघटित केले. त्यांना गती, दिशा दिली. उद्घोष केला तो शक्तीच्या, सामर्थ्याच्या उपासनेचा, शरीरबल, मनोबल आणि आत्मबलाच्या उपासनेचा! स्वामी विवेकानंदांनी सगळ्या जगाला हिंदूंच्या अद्वैत सिद्धांताची म्हणजेच वेदांताची ओळख करून दिली. उपनिषदांची ओळख करून दिली. ते सांगत, ‘उपनिषदे हे सामर्थ्याचे अक्षयकोष आहेत. सर्व विश्व गदागदा हलविल असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे. सारे विश्व त्याच्या संदेशाने चैतन्यमय होईल. सामर्थ्यमय होईल. विविध वंश, जाती, पंथ यांच्यात जे दीनदुबळे आहेत, त्यांच्यात उपनिषदांचा ललकार सामर्थ्य ओतील, त्यांना मुक्त, निर्भय करील, स्वातंत्र्य-शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य -हे उपनिषदांचे प्राणसूत्र आहे. शक्तीची उपासना हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो. हे बंधो, दुर्बल बनू नको! शक्तीची उपासना कर. आपण स्वत:ला दुबळे समजत असतो. पण एकदा स्वसामर्थ्याची ओळख झाली, की कळतं, मी दुबळा नाही. कोणी मला चिरडून टाकू शकत नाही. कबूल आहे, हातून चुका होतात. पण म्हणून स्वत:ला वाईट समजायचं कारण नाही. त्या सुधारू शकतो आपण! मानसशास्त्रज्ञ फ्रोईड म्हणतो, ‘‘माणसाचं मन समाजात दाखवायला, बाहेरून जरी सुसंस्कृत असलं, तरी तो बुरखा असतो. दुष्ट प्रवृत्ती आत कोंडून ठेवलेल्या असतात. पण कधीतरी त्या डोकं वर काढतातच.