शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

ऐक चतुरा सोड फुगारा उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 14:53 IST

.... म्हणून हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवनमुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानवा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल.

भज गोविन्दम - ८

यावत्पनो निवासति गेहे तावतपृच्छति कुशलं गेहेगतवती वायौ देहापाये, भार्या बिभ्यति तस्मिन कायेभज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुढमते...॥ध्रु॥

या श्लोकात जीवनातील वास्तव प्रतिपादन केले आहे. जोपर्यंत या देहात प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंतच तुमची घरातील लोक विचारपूस करतात. एकदा का तुमच्या शरीरातील प्राण, श्वास निघून गेला की मग या देहाला घरात कोणी ठेवीत नाहीत. लवकरात लवकर घराबाहेर काढतात व स्मशानात नेवून त्याचे दहन करतात. जीवनभर कितीही तुमच्यावर प्रेम केलेले असू द्या, प्रेतरूप शरीराला घरात ठेवीत नाहीत़ इतकेच काय तर जी पत्नी आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करते ती सुद्धा त्या प्रेताला हात लावीत नाही. उलट ती घाबरते. आणि समजा ठेवले तरी त्यामध्ये चैतन्य येत नाही. ते प्रेत जिवंत होत नाही. हजारो वर्षापूर्वी इजिप्तमध्ये पिऱ्यामिडमध्ये राजे लोकांचे देह ठेवण्याची प्रथा होती व त्याबरोबर दाग दागिने ठेवायचे़ त्याच्या आवडत्या वस्तू ठेवायचे. पण आता संशोधन झाले आणि ते पिऱ्यामिड खोदून बघितले तर त्या ममी म्हणजे जतन केलेले प्रेत तसेच होते. ते काही जिवंत झालेले दिसले नाही. तात्पर्य जोपर्यंत शरीरात प्राण आहे. तोपर्यंतच लोक या देहाला जपतात़ नंतर कोणी विचारीत नाही, हे वास्तव आहे. पण याचा कोणी विचार करीत नाही. एके ठिकाणी फार छान सांगितले आहे, ‘ऐक चतुरा सोड फुगारा उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपल कोणी नाही.’ या मायेच्या बाजारात आपले कोणी नाही फक्त आपले आहेत असे भासते.संत ज्ञानोबाराय म्हणतात,

माता-पिता, बंधु-बहिणी कोणी न पवती निर्वाणी।इष्टमित्रस्वजनसखे हे तो सुखाची मांडणी।एकला मी दु: ख भोगी कुंभपाक जाचणी।तेथे कोणी सोडविना एका सद्गुरुवांचुनी।धर्म जागो सदैवाचा जे बा परोपकारी॥

अंतकाळी कोणीही वाचवू शकत नाही़ फक्त एक सद्गुरूच वाचवितात़ म्हणजे ते काही जिवंत करीत नाहीत़ पण मृत्य सुकर करतात व या देहाचे मिथ्यत्व पटवून देतात. त्यामुळे देह सोडताना सुद्धा दुख: होत नाही़ उलट हा देह माझा नाही हे कळते. देह पंचमहाभूतांचा आहे. देह कोणाचाच या इहलोकात राहू शकत नाही. श्री ज्ञानोबारायांनी मदालसा नावाच्या सुंदर प्रकरणातील अभंगात देहाचे मिथ्यात्व प्रतिपादन केले आहे़ ते म्हणतात,

‘हा देह नाशिवंत मळमुत्रांचा बांधावरी चर्म घातलें रे कर्म कीटकांचा सांदारवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधास्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा॥५॥या देहाचा भरवसा पुत्रा न धरावा ऐसामाझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसाबहुत ठकियेले मृगजळाच्या आशातृष्णा सांडूनिया योगी गेले वनवासा ॥६॥

मदालसाने आपल्या मुलांना पाळण्यातच हा उपदेश केला आणि विशेष म्हणजे तिचे पुत्र हा उपदेश ऐकून संन्यासी झाले. म्हणून देहाचे नश्वरत्व कळावे आणि आता तर सध्या कोरोनाची साथ सुरु आहे. जगातील सर्व लोकांना कळून चुकले की मानवी जीवन हे किती पराधीन आहे़ पैसा, धन द्रव्य काहीही उपयोगाला येत नाही. कोरोना झालाय एव्हडे जरी कळाले तरी कोणीही जवळ येत नाही आणि कदाचित जर माणूस कोरोनाने मेला तर त्याच्या प्रेताला सुद्धा हातही लावीत नाही. कुठलेही धार्मिक संस्कार होत नाहीत. लगेच उचलतात आणि स्मशानात नेवून चितेवर ठेवतात.

नको नको मना गुंतू माया जाळी। काळ हा आला जवळी ग्रासावया॥१॥काळाची ही उडी पडेल बा जेव्हा। सोडविना तेव्हा माय बाप॥२॥सोडविना राजा देशीचा रे चौधरी। आणिक सोयरी भली भली॥३॥तुका म्हणे तुला सोडविणा कुणी। एका चक्रपाणी वाचुनी॥४॥

म्हणून हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवनमुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानवा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल. 

-भागवाताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिलेगुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी (पाटील), ता. नगरमो. ९४२२२२०६०३

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर