शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Adhyatmik : तैसा करू उपदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 06:58 IST

योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे यालाच योग्य प्रशासन संबोधले जाते. ज्या व्यक्तीची योग्यता व मर्यादा संबंधित कार्यासाठी योग्य नसतील तर कार्याचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहत नाही.

 - प्रा. शिवाजीराव भुकेलेयोग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे यालाच योग्य प्रशासन संबोधले जाते. ज्या व्यक्तीची योग्यता व मर्यादा संबंधित कार्यासाठी योग्य नसतील तर कार्याचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहत नाही. गुणवत्तेच्या संकल्पनेस आपोआपच ओहोटी लागते, हे सत्य जसे व्यवहारात महत्त्वपूर्ण आहे तसे ते पारमार्थिक क्षेत्रातही महत्त्वाचे आहे. अधिकारी पुरुषाने अधिकारी साधकास त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन उपदेश केला तर स्वानंद सुखाच्या लहरी निर्माण होऊ शकतात. उपदेश देणाऱ्यांनी प्रथम आपल्या अधिकाराची जाणीव करून घ्यावी. दिव्याखाली गाडाभर अंधार अन् दुसऱ्यांना प्रकाश देण्याचा प्रयत्न करणाºयांची अवस्था लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी होते. तेव्हा उपदेश देणारा श्रोत्रीय, ब्रह्मनिष्ठ व कृपाळू असावा तर ऐकणारा विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्वाने युक्त असावा तरच ज्ञानाचे संचरण ‘ये हृदयीचे ते हृदयी’पर्यंत होऊ शकते. कठोर पाषाणावर पर्जन्य कितीही कोसळला तर त्यातून धन-धान्याची निर्मिती होऊ शकत नाही. तद्वत क्रोधी, अविश्वासी, चंचल माणसाच्या डोक्यावरून उपदेशाच्या कितीही गंगा वाहिल्या तरी त्यांचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. म्हणून तुकोबांसारख्या लोकशिक्षकाने पारमार्थिक अधिकार भेदाच्या पायºया लक्षात घेऊन सांगितले होते -अधिकार तैसा करू उपदेशसाहें ओझे त्यास तेची देऊ ।मुंगीवरी भार गंजाचे पालनघालीता ते कोण कार्यसिद्धी ।तुका म्हणे फासे वागुरा कुºहाडीप्रसंगी ते काढी पारधी तो ॥तुकोबांचा हा अभंग रोजच्या व्यवहारातील एक आदर्श आहे. आपण नेहमीच म्हणतो, ज्याला जेवढे ओझे सहन होईल तेवढाच भार त्याच्यावर टाकावा. जर त्याच्या मर्यादेपेक्षा अधिक भार टाकला, तर तो मध्येच ओझे टाकून रिकामा होतो. मुंगीवर हत्तीचा भार टाकला तर ती चिरडून मरून जाईल. फासे, जाळे, कुºहाडी, भाले, बाण अशी अनेक साधने असली तरी खरा शिकारी एकाच वेळी सर्वच साधनांचा वापर करीत नाही. जशी शिकार असेल तशा व तेवढ्याच साधनांचा वापर तो करतो. आपल्या इच्छेनुरूप शिकार करण्यात यशस्वी होतो तद्वत आपल्याकडे ज्ञानाचे अथांग भांडार आहे. शास्त्र, उपनिषदे, वेद, धर्मग्रंथांचे भांडार आपल्या डोक्यात जरी भरलेले असले तरी ऐकणाºयांच्या डोक्याचा आणि बौद्धिक मर्यादेचा विचार हे ज्ञानाचे भांडार ओतणाºयांनी करायला हवा. आज तर अनेक सत्संगाच्या महामेळाव्यात माया, ब्रह्म, मोक्ष मुक्तीचे डोस पाजले जातात, पण ऐकणाºयास मात्र ते पचत नाहीत. जर एखादी भाकरी जरी भाजायची असेल तर पाणी, अग्नी, पीठ, तवा, काठवट व कुणीतरी भाजणारे ही सर्व साधने एकत्र यावी लागतात तरच भाकरी भाजते. पारमार्थिक अधिकाराची भाकरी भाजायची असेल तर शम, दम, उपरम, तितिक्षा इ. सर्व साधने एकत्र यावी लागतात अन्यथा ‘परस्परम प्रशशंती, अहो रूपं महि ध्वनिम’ अशी अवस्था होते. सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात तरी ‘साहे ओझे त्यास तेचि देऊ’ या तत्त्वाचा जाणीवपूर्वक उपयोग झाला तर अभ्यास झेपला नाही म्हणून विद्यार्थी आत्महत्या करणार नाहीत. काम जमले नाही म्हणून कामगार निराश होणार नाहीत. व्यवसायात प्रचंड हानी झाली म्हणून व्यावसायिकाचे दिवाळे निघणार नाही, पण हे सारे तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रबोधन यात्री तुकोबांचा हा उपदेश कापडात गुंडाळून देवळात ठेवला जाणार नाही, तर शाळा, महाविद्यालयांचे घोषवाक्य आणि व्यावसायिकाचे जीवनसूत्र ठरेल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक