शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

Adhyatmik : तैसा करू उपदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 06:58 IST

योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे यालाच योग्य प्रशासन संबोधले जाते. ज्या व्यक्तीची योग्यता व मर्यादा संबंधित कार्यासाठी योग्य नसतील तर कार्याचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहत नाही.

 - प्रा. शिवाजीराव भुकेलेयोग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे यालाच योग्य प्रशासन संबोधले जाते. ज्या व्यक्तीची योग्यता व मर्यादा संबंधित कार्यासाठी योग्य नसतील तर कार्याचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहत नाही. गुणवत्तेच्या संकल्पनेस आपोआपच ओहोटी लागते, हे सत्य जसे व्यवहारात महत्त्वपूर्ण आहे तसे ते पारमार्थिक क्षेत्रातही महत्त्वाचे आहे. अधिकारी पुरुषाने अधिकारी साधकास त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन उपदेश केला तर स्वानंद सुखाच्या लहरी निर्माण होऊ शकतात. उपदेश देणाऱ्यांनी प्रथम आपल्या अधिकाराची जाणीव करून घ्यावी. दिव्याखाली गाडाभर अंधार अन् दुसऱ्यांना प्रकाश देण्याचा प्रयत्न करणाºयांची अवस्था लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी होते. तेव्हा उपदेश देणारा श्रोत्रीय, ब्रह्मनिष्ठ व कृपाळू असावा तर ऐकणारा विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्वाने युक्त असावा तरच ज्ञानाचे संचरण ‘ये हृदयीचे ते हृदयी’पर्यंत होऊ शकते. कठोर पाषाणावर पर्जन्य कितीही कोसळला तर त्यातून धन-धान्याची निर्मिती होऊ शकत नाही. तद्वत क्रोधी, अविश्वासी, चंचल माणसाच्या डोक्यावरून उपदेशाच्या कितीही गंगा वाहिल्या तरी त्यांचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. म्हणून तुकोबांसारख्या लोकशिक्षकाने पारमार्थिक अधिकार भेदाच्या पायºया लक्षात घेऊन सांगितले होते -अधिकार तैसा करू उपदेशसाहें ओझे त्यास तेची देऊ ।मुंगीवरी भार गंजाचे पालनघालीता ते कोण कार्यसिद्धी ।तुका म्हणे फासे वागुरा कुºहाडीप्रसंगी ते काढी पारधी तो ॥तुकोबांचा हा अभंग रोजच्या व्यवहारातील एक आदर्श आहे. आपण नेहमीच म्हणतो, ज्याला जेवढे ओझे सहन होईल तेवढाच भार त्याच्यावर टाकावा. जर त्याच्या मर्यादेपेक्षा अधिक भार टाकला, तर तो मध्येच ओझे टाकून रिकामा होतो. मुंगीवर हत्तीचा भार टाकला तर ती चिरडून मरून जाईल. फासे, जाळे, कुºहाडी, भाले, बाण अशी अनेक साधने असली तरी खरा शिकारी एकाच वेळी सर्वच साधनांचा वापर करीत नाही. जशी शिकार असेल तशा व तेवढ्याच साधनांचा वापर तो करतो. आपल्या इच्छेनुरूप शिकार करण्यात यशस्वी होतो तद्वत आपल्याकडे ज्ञानाचे अथांग भांडार आहे. शास्त्र, उपनिषदे, वेद, धर्मग्रंथांचे भांडार आपल्या डोक्यात जरी भरलेले असले तरी ऐकणाºयांच्या डोक्याचा आणि बौद्धिक मर्यादेचा विचार हे ज्ञानाचे भांडार ओतणाºयांनी करायला हवा. आज तर अनेक सत्संगाच्या महामेळाव्यात माया, ब्रह्म, मोक्ष मुक्तीचे डोस पाजले जातात, पण ऐकणाºयास मात्र ते पचत नाहीत. जर एखादी भाकरी जरी भाजायची असेल तर पाणी, अग्नी, पीठ, तवा, काठवट व कुणीतरी भाजणारे ही सर्व साधने एकत्र यावी लागतात तरच भाकरी भाजते. पारमार्थिक अधिकाराची भाकरी भाजायची असेल तर शम, दम, उपरम, तितिक्षा इ. सर्व साधने एकत्र यावी लागतात अन्यथा ‘परस्परम प्रशशंती, अहो रूपं महि ध्वनिम’ अशी अवस्था होते. सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात तरी ‘साहे ओझे त्यास तेचि देऊ’ या तत्त्वाचा जाणीवपूर्वक उपयोग झाला तर अभ्यास झेपला नाही म्हणून विद्यार्थी आत्महत्या करणार नाहीत. काम जमले नाही म्हणून कामगार निराश होणार नाहीत. व्यवसायात प्रचंड हानी झाली म्हणून व्यावसायिकाचे दिवाळे निघणार नाही, पण हे सारे तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रबोधन यात्री तुकोबांचा हा उपदेश कापडात गुंडाळून देवळात ठेवला जाणार नाही, तर शाळा, महाविद्यालयांचे घोषवाक्य आणि व्यावसायिकाचे जीवनसूत्र ठरेल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक