शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

अभ्यंगस्नान...पवित्र अन् आरोग्यदायी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 04:17 IST

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पद्धती या शास्त्र, विज्ञानाशी निगडित आहे. अमुक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगणे केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असते.

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पद्धती या शास्त्र, विज्ञानाशी निगडित आहे. अमुक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगणे केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असते. आता पाहा ना, दिवाळीच्या नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायला आपल्या शास्त्राने सांगितले आहे. ते का? तर सकाळी सूर्योदयाच्या आधी झोपेतून उठणे आणि वातावरणात अधिकाधिक प्रमाणात असलेला प्राणवायू शरीरातील प्रत्येक धमन्यांपर्यंत श्वासाद्वारे पोहोचविणे, हे आरोग्यदायी असते, शिवाय तेलाची मालीश करणे आणि आंघोळ करताना उटणे लावणे, हेही त्वचेसाठी हितकारक असते.दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्त्व काय, या प्रश्नावर वेदशास्त्र संपन्न हरिभाऊशास्त्री जोशी सांगतात की, भागवत पुराणातील कथेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुर हा अत्याचारी दैत्य होता. त्याचा वध करण्यासाठी जेव्हा भगवान कृष्णाने प्रहार केला. तेव्हा या राक्षसाने वर मागितला. श्रीकृष्ण म्हणाले, ‘हे दैत्या, आजच्या चतुर्दशीच्या दिवशी जो कोणी पहाटे अभ्यंगस्नान करेल, त्याला नरकयातना मिळणार नाहीत, तसेच अशा यातनेतून त्याची मुक्ती होईल.’ पुराणातील भगवान कृष्णाच्या या वरदानाला शिरसावंद्य मानून भारतीय संस्कृतीत अभ्यंगस्नानाची प्रथा रूढ झाली.दिवाळीच्या काळात थंडीचे वातावरण असते. या काळात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे अंगाला तेल लावून स्नान केल्यामुळे त्वचेला तजेला येतो. शिवाय शरीरावरील सुरकुत्याही कमी होतात. तेल हे नेहमी सुगंधी असते. या सुगंधामुळे एक प्रसन्न आणि सकारात्मक मानसिकता निर्माण होते, असेही शास्त्रीजींनी सांगितले.अभ्यंगस्नान असे केले जाते...अभ्यंगस्नानाच्या पद्धती प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या असल्या, तरी बहुसंख्य घरांमध्ये खालील पद्धतीचा वापर होतो-व्यक्तीला पाटावर बसविले जातेशरीराला सुगंधी तेलाचे मालीश केले जाते.कपाळाला कुंकुमतिलक लावून ओवाळले जातेपाटावर बसवून स्नान घातले जातेस्नान घालताना सुगंधी उटणे शरीराला लावले जातेस्नान झाले की, पुन्हा दिव्याने ओवाळले जाते.उटण्यामधील मिश्रणउटणे खास पद्धतीने बनविले जाते. यामध्ये शिकेकाईचा सर्वाधिक वापर असतो. शिकेकाईच्या बियांची पावडर तयार करून, त्यामध्ये वाळा, ज्येष्ठमध, आंबेहळद, तुळशीची पाने आणि थोडासा कापूर मिसळला जातो.- रवींद्र देशमुख

टॅग्स :Diwaliदिवाळी