शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

जोडोनिया धन उत्तम व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 17:33 IST

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सदाचारावर अनेक ठिकाणी भाष्य केले आहे. स्वार्थ आणि परमार्थ याचा अर्थ सूचक शब्दांमध्ये समजावून सांगितला आहे. 

धर्मराज हल्लाळे

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सदाचारावर अनेक ठिकाणी भाष्य केले आहे. स्वार्थ आणि परमार्थ याचा अर्थ सूचक शब्दांमध्ये समजावून सांगितला आहे. संसारात राहूनही इतरांच्या भल्याचा आणि नि:स्वार्थ वृत्तीचा विचार त्यांच्या अभंगातून पेरला गेला आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे... ही त्यांची अभंगओळ बरेच काही सांगून जाते. आज आपण नेहमी म्हणतो, माणूस पैशाच्या मागे धावू लागला आहे. वाट्टेल त्या मार्गाने पैसा मिळविणे हे त्याचे ध्येय बनले आहे. पैशातून सुख आणि सुखासाठी पैसा हे जणू सूत्रच सांगितले जाते. आश्चर्य म्हणजे त्याला आपण व्यवहार म्हणतो. असा हा सगळा खोटा व्यवहार आपल्या भोवती घडत असतो. ज्याच्यामध्ये आपणही विलिप्त झालो आहोत. याचा अर्थ प्रबोधनाचा वसा घेतलेल्यांनी धनाचा लोभ सोडून द्यावा आणि घरावर तुळशीपत्र ठेवावे हे अभिप्रेत नाही. संत तुकाराम महाराजांनीही परमार्थ सांगताना जीवनार्थ सोडून द्यायला सांगितला नाही. धन जमविलेच पाहिजे. केवळ ते उत्तम मार्गाने मिळवावे, असा उपदेश अभंगातून केला आहे. जे धन तुम्ही जोडणार आहात ते उत्तम व्यवहारातून जमविलेले असावे एवढेच सांगायचे आहे.

समाजात अगदी दोन टोकांचे विचार दिसतात. ज्यांनी संत विचार मांडला अथवा अंगिकारला, त्यांच्याकडून टोकाच्या त्यागाची अपेक्षा केली जाते. अन् जे संत विचारापासून दूर आहेत, ते जणू काही दुर्व्यवहार करायला मोकळेच आहेत. तुम्ही चांगले वागता म्हणजे तुमच्यात त्यागवृत्ती असली पाहिजे. धनाचा लोभ नसला पाहिजे. इथपर्यंत ठिक आहे. पण धन मिळवूच नये असे नाही. चरितार्थ चालविण्यासाठी धन आवश्यक आहे. अनेकांना सोबत घेऊन जाण्यासाठी अधिक धनाची आवश्यकता आहे. अर्थात हे धन सद्मार्गाने मिळवावे हा अभंगातील गर्भित अर्थ आहे.

जमेल त्या मार्गाने, वाट्टेल त्या दिशेने धनासाठी भरकटणारी माणसे उत्तम व्यवहार करीत नाहीत. त्यांचा धनसंचय हा अमान्य आहे. त्यातून अपप्रवृत्तीच जन्माला येतात. भरमसाठ धनाच्या लोभातून सुखाचा शोध घेतला जातो परंतु, प्रत्यक्षात तो दु:खाच्या मुळाशी जातो. त्याचा व्यवहार अवतीभोवतीच्या माणसांवरच नव्हे तर समाजावर विपरित परिणाम करणारा ठरतो. तो धन मिळवितो, मात्र स्वत:ची ओळख गमावतो. अखेरीस धनसंचय आवश्यक असला तरी त्याचा मार्ग कोणता यावरच त्याचे भविष्य अवलंबून असते. सद्मार्ग सोडून जोडलेले धन विनाश बुद्धीला जन्म देते. उत्तम व्यवहाराने जोडलेल्या धनामुळे माणुसकी धर्माचा उदय होतो. सद्मार्गाचे धन त्याचे, परिवाराचे आणि समाजाचेही कल्याण साधते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक