खराब रस्त्यांच्या विरोधात मनसेने काढली पालिकेची अंत्ययात्रा​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 06:17 PM2017-10-12T18:17:58+5:302017-10-12T18:18:15+5:30

अंबरनाथ शिवाजी चौक ते वडवली रस्त्याची झालेली दुरावस्था आणि शहरातील इतर महत्वांच्या रस्त्यांवरील खडय़ांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेने पालिका प्रशासनाची अंत्ययात्रा काढली

The MNS has concluded the end of the corporation against poor roads | खराब रस्त्यांच्या विरोधात मनसेने काढली पालिकेची अंत्ययात्रा​​​​​​​

खराब रस्त्यांच्या विरोधात मनसेने काढली पालिकेची अंत्ययात्रा​​​​​​​

Next

अंबरनाथ - अंबरनाथ शिवाजी चौक ते वडवली रस्त्याची झालेली दुरावस्था आणि शहरातील इतर महत्वांच्या रस्त्यांवरील खडय़ांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेने पालिका प्रशासनाची अंत्ययात्रा काढली. शिवाजी चौकात मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करित आंदोलन केले. 

मनसेच जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शहरात अनेक रस्त्यांची अवस्था ही बिकट झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासन ठोस उपाययोजना आखत नसल्याचे समोर आले आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पालिका दुर्लक्ष करित आहे. अनेक वर्षापासुन रखडलेल्या शिवाजी चौक ते वडवली रस्त्याचे काम अजुनही पूर्ण झालेले नाही. या रस्त्याची अवस्था ही धोकादायक झाली आहे. शिवाची चौकातील चढणीवर गाडी चालविणो ही मोठी कसरत झाली आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याने मनसेने आज अचानक पालिकेची अंत्ययात्रा काढत पालिकेचा निषेध व्यक्त केला. यावेळी शिवाजी चौकात मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करित आंदोलन केले. 

Web Title: The MNS has concluded the end of the corporation against poor roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे