आगरी-कोळीबांधवांचा लाँग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:08 AM2018-12-20T05:08:29+5:302018-12-20T05:09:04+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन : शेतजमिनी न देण्याचा इशारा

Agra-Koli Bandh's Long March | आगरी-कोळीबांधवांचा लाँग मार्च

आगरी-कोळीबांधवांचा लाँग मार्च

ठाणे : विविध कारणांसाठी शासनाने घेतलेल्या भूमिपुत्रांच्या जमिनी परत करा, कोस्टल रोड रद्द करा, गावठाण कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित करा, अशा विविध घोषणा करून बुधवारी आगरी-कोळीबांधव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकले होते. यावेळी राबोडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा लॉँग मार्च काढून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

२० डिसेंबरच्या महासभेत महापालिका प्रशासनाने पाच भागांमध्ये क्लस्टर राबवण्याचा प्रस्ताव पटलावर ठेवला आहे. त्यात गावठाण आणि कोळीवाडे वगळल्याचाही उल्लेख केला आहे. त्यामुळेच त्याविरोधात गावठाण आणि कोळीवाड्यांनी एकत्र येऊन बुधवारी आवाज उठवला. बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, माजिवडे, राबोडी, कळवा आणि घोडबंदर भागातील शेतजमिनी औद्योगिक प्रयोजनाकरिता घेतल्या. त्यासाठी काही शेतकऱ्यांना अत्यल्प, तर काहींना मोबदलाच दिलेला नाही. आता या जमिनींचे प्रयोजन बदलून निवासी बांधकामे असे केले जात आहे. मात्र, या प्रक्रि येमुळे मूळ मालक असलेल्यांना साधी बाजू मांडण्याची संधीही दिली नसल्याचे या शेतकºयांचे म्हणणे आहे. क्लस्टर राबवत असताना गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित केलेले नाही. असे असतानाही तिचा प्रस्ताव महासभेत आलाच कसा, असा सवाल यावेळी शेतकºयांनी केला.
या आंदोलनाच्या निमित्ताने घोडबंदर भागातील कोस्टल रोडचा मुद्दाही यानिमित्ताने पुन्हा एकदा रडारवर आला. तो भूमिपुत्रांच्या दृष्टीने चुकीचा असून त्यामुळे त्यांच्या जमिनी जाणार असल्याचा दावा या शेतकºयांनी केला. यापूर्वी विविध विकासकामांसाठी घेतलेल्या जमिनींबाबत अनेकांना अजून योग्य तो मोबदला मिळालेला नाही. असे असताना पुन्हा नवनवीन प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणले आहेत. त्यामुळे प्रस्तावित कोस्टल रोडला भूमिपुत्रांचा विरोध असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय, मेट्रो कास्टिंग यार्ड प्रकल्पास नागरिकांचा विरोध असून त्यासाठी शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. खाडीकिनारी भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात असून त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. या सर्व मागण्यांकडे राज्य शासन आणि महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राबोडी पोलीस चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा लाँग मार्च काढला होता.

प्रशासनावर दबाव टाका
राष्ट्रवादीने या आगरी-कोळीबांधवांची भेट घेऊन त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. महापालिकेत सत्ता शिवसेनेची असल्याने आगरी-कोळी समाजातील शिवसेनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव टाकावा, असे आवाहन यावेळी राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. गावठाणे आणि कोळीवाड्यांचे आधी सीमांकन निश्चित करावे. बुलेट ट्रेनसाठी जाणाºया जमिनींविरोधातही आम्ही शेतकºयांसोबत असल्याचे आश्वासन यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले.

Web Title: Agra-Koli Bandh's Long March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.