धरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 04:31 PM2018-05-25T16:31:17+5:302018-05-25T16:33:37+5:30

मुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारी अनेक धरणं आहेत. (सर्व छायाचित्रं - विशाल हळदे)

शहापूर तालुक्यातील भातसा धरणातूनही अशाच प्रकारे मुंबईकरांना पाणीपुरवठा होतो.

याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.

धरण शेजारी असूनही इथल्या लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.

मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातान्हात या गावांमध्ये येणा-या टँकरचे पाणी मिळवण्यासाठी महिलांसह चिल्ल्यापिल्ल्यांचीही गर्दी होते.

घसा कोरडा पडलेल्या विहिरींतील पाषाणात एखादा पाझर फुटेल, या आशेने खोदकाम सुरूच असते.

एखाद्या विहिरीत ओंजळभर पाणी दिसले तरी विहिरीत उतरण्याची कसरत दिसते.