राज्यसभा निवडणूक- दोन आमदारांची मते रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 07:02 PM2017-08-08T19:02:37+5:302017-08-08T19:04:37+5:30

कॉंग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी आपल्या मतपत्रिका भाजपाच्या पोलिंग एजंट आणि अमित शहा दाखवल्याचा आरोप करत कॉंग्रेसने त्यांची मते रद्द करण्याची मागणी केली

Rajya Sabha Election - Demand for the removal of votes of two MLAs | राज्यसभा निवडणूक- दोन आमदारांची मते रद्द करण्याची मागणी

राज्यसभा निवडणूक- दोन आमदारांची मते रद्द करण्याची मागणी

Next

अहमदाबाद, दि. 8- गुजरातमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी चाललेल्या निवडणुकीत सतत नव्या घडमोडी घडत आहेत. आज सकाळपासून बलवंतसिंग राजपूत आणि अहमद पटेल लढवत असलेल्या जागेसाठी गुजरातच्या आमदारांनी मतदान केले. मात्र कॉंग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी आपल्या मतपत्रिका भाजपाच्या पोलिंग एजंटला व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना दाखवल्याचा आरोप करत कॉंग्रेसने त्यांची मते रद्द करण्याची मागणी केली.

भोलाभाई आणि राघवजीभाई या दोघांनी आपल्या मतपत्रिका भाजपाच्या पोलिंग एजंटला दाखवल्याचे कॉंग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहील यांनी सांगितले आणि त्यांची मते रद्द करावीत अशी मागणी केली. तसेच त्यांनी मतपत्रिका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनाही दाखवल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी ही दोन मते रद्द व्हावीत अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आज दिवसभरामध्ये 176 आमदारांनी मतदान केले. आपला विजय निश्चित होईल असा विश्वास अहमद पटेल यांनी व्यक्त केला आहे. मात्र तरिही निकाल जाहीर होईपर्यंत काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे राजकीय विश्लेशकांनी मत मांडले आहे. कॉंग्रेसचे आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातून अहमद पटेल हे कॉंग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात असल्याने ही निवडणूक कॉंग्रेससाठी अधिक प्रतिष्ठेची झाली.

अहमद पटेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात त्यांनी 1976 साली प्रवेश केला. 1977 पासून तीन टर्म ते लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर प्रदेश कॉंग्रेस आणि केंद्र पातळीवर त्यांना विविध जबाबदाऱ्या मिळत गेल्या. जवाहर भवन ट्रस्टची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली. सरदार सरोवर प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यानंतर 1993-99, 1999-2005, 2005-2011, 2011-2017 अशा सलग चार टर्म ते राज्यसभेत आहेत. संपुआ सरकारच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Web Title: Rajya Sabha Election - Demand for the removal of votes of two MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.