नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक, गोळीबारात 5 भारतीय नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 10:00 AM2018-03-18T10:00:54+5:302018-03-18T10:00:54+5:30

पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा आगळीक करताना मोठ्या प्रमाणावर गोळीबार करत शस्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने पुंछ विभागातील बालाकोट परिसरात सामान्य नागरिकांना लक्ष्य करून केलेल्या गोळीबारामध्ये पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

Pakistan violates ceasefire in Balakote sector | नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक, गोळीबारात 5 भारतीय नागरिकांचा मृत्यू

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक, गोळीबारात 5 भारतीय नागरिकांचा मृत्यू

Next

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा आगळीक करताना मोठ्या प्रमाणावर गोळीबार करत शस्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने पुंछ विभागातील बालाकोट परिसरात सामान्य नागरिकांना लक्ष्य करून केलेल्या गोळीबारामध्ये पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  तसेच दोन जण जखमी झाले आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या नागारिकांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. 

पुंछ विभागातील बालाकोट परिसरात नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला आहे. या गोळीबारात पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. जखमी नागरिकांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी एस.पी. वैद्य यांनी दिली आहे.  


 



 

 

 

Web Title: Pakistan violates ceasefire in Balakote sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.