बेळगावजवळ अपघातात औरंगाबादचे पाच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 08:46 PM2019-06-02T20:46:43+5:302019-06-02T21:13:16+5:30

महामार्गावर भरधाव निघालेल्या कारचा टायर फुटला.

Five dead in Aurangabad accident near Belgaum | बेळगावजवळ अपघातात औरंगाबादचे पाच ठार

बेळगावजवळ अपघातात औरंगाबादचे पाच ठार

Next

बेळगाव : महामार्गावर भरधाव निघालेल्या कारचा टायर फुटला. त्यामुळे कारवरील चालकाचे  नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला गेली. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकची व कारची धडक होऊन कारमधील पाचजण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बेळगाव जवळील  महामार्गावर श्रीनगर गार्डन जवळ हा अपघात घडला. सर्व मृत औरंगाबाद येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
औरंगाबादहून कारमधून सहा जण बंगळुरूला निघाले होते. कार श्रीनगर गार्डनजवळ आली तेव्हा समोरील टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजककावरून पलीकडील रस्त्यावर गेली.

यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. धडक जबरदस्त असल्याने  कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच जणांचा मृत्यू व सहावा गंभीर जखमी असल्याने मृतांची नावे  पोलिसांना मिळू शकली नाहीत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त बीएस लोकेश कुमार, वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगोडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत ही घटना येते.

Web Title: Five dead in Aurangabad accident near Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.