...अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिली तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 03:48 PM2017-09-12T15:48:16+5:302017-09-12T15:48:16+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला होता.

... then be prepared to suffer the consequences, the chief minister gave to the MLAs | ...अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिली तंबी

...अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिली तंबी

Next

मुंबई, दि. 12 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला होता. या अहवालात 122 पैकी 39 आमदारांची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याचे समोर आले.  याशिवाय 23 पैकी 11 खासदारांनादेखील चांगले काम करण्यात अपयश आल्याचे अहवालातून समोर आलं आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे. 

जवळपास निम्म्या खासदारांची कामगिरीदेखील फारशी समाधानकारक नसल्याची आकडेवारी भाजपाच्या सर्वेक्षणातून पुढे आली असल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना कामगिरी सुधारण्याचा इशारा दिला आहे. कामगिरी सुधारा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचं ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.  

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर, राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रत्येक मंत्र्याचा 'केआरए' पाहून, कामगिरीची शहानिशा करूनच मुख्यमंत्री बढती-बदली-पदावनतीबाबत निर्णय घेणार असल्याचं समजतं आहे. त्याची सुरूवात म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना एक प्रश्नावली पाठवली आहे. व त्यावर उत्तरं मागविली आहेत. मंत्र्यांनी पाठविलेली उत्तरं तपासून नवरात्रीनंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार करू शकतात, असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबरला देवेंद्र सरकारला तीन वर्षं पूर्ण होत आहेत. त्यावेळी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठीही या कार्य अहवालाचा उपयोग होऊ शकतो. 

तीन वर्षांच्या कालावधीत मंत्री म्हणून काय विशेष काम केलं?  गेल्या सरकारच्या तुलनेत तुम्ही केलेलं काम श्रेष्ठ कसं ठरतं? तुमच्या कामामुळे जनतेच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला? ही संपूर्ण माहिती तुलनात्मक आकडेवारीसोबत द्या. अपूर्ण आणि चुकीची माहिती स्वीकार केली जाणार नाही. १५ सप्टेंबरनंतर येणारी माहिती स्वीकारली जाणार नाही आणि तुम्ही काहीही काम केलेलं नाही, असं मानण्यात येईल, असे काहीसे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना विचारले असल्याचं समजतं आहे. 

Web Title: ... then be prepared to suffer the consequences, the chief minister gave to the MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.