शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

जिल्हा परिषदेत ‘देशी पव्वे’

By admin | Updated: July 16, 2016 02:33 IST

जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यप्रवण करून जनताभिमुख

बाटल्यांचा खच : पाणीपुरवठा विभागाजवळच साधला जातो कार्यभाग रवींद्र चांदेकर यवतमाळ जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यप्रवण करून जनताभिमुख करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. मात्र त्यांच्याच कक्षाच्या वर असलेल्या पाणी पुरवठा विभागाजवळील पुरूषांच्या प्रसाधनगृहात देशी दारूचे रिकामे पव्वे पडून असल्याचे दिसून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी नुकताच सर्व कर्मचाऱ्यांना ‘ड्रेस कोड’ लागू केला. आता सर्वच कर्मचारी एकाच गणवेशात दिसू लागले आहेत. परिणामी जिल्हा परिषदेत शाळा भरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिंगला यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. याप्रमाणेच सिंगला यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जनतेची कामे तातडीने करण्याची तंबी दिली आहे. प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी कंबर बसली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एकीकडे प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यांच्याच कक्षाच्या वरच्या माळ्यावर असलेल्या पाणी पुरवठा विभागाजवळ सावळागोंधळ दिसून येत आहे. पाणी पुरवठा विभागाला लागूनच पुरूषांचे प्रसाधनगृह आहे. या प्रसाधनगृहाच्या एका बाजूच्या संरक्षक भिंतीवर चक्क देशी दारूचे काही रिकामे पव्वे आडवे पडून आहेत. ते तेथे नेमके कसे आले, याचे गूढ मात्र गुलदस्त्यातच आहे. शुक्रवारी हे रिकामे पव्वे आढळले. या माळ्यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय आहे. लगतच कार्यकारी अभियंत्यांचा कक्ष आहे. ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना येथूनच कार्यान्वीत होतात. पाणी हेच जीवन आहे. तेच पाणी दारूतही टाकण्यात येते. नेमक्या त्याच पाणी पुरवठा विभागाजवळील प्रसाधनगृहात देशी दारूचे रिकामे पव्वे आढळून आल्याचे नेमके इंगित काय असा प्रश्न आता पुढे आला आहे. दारूचे पव्वे नेमके कुठून आले, त्याचा शोध घेणेही महत्वाचे आहे. इतर कार्यालयातही अशीच अवस्था यवतमाळ शहरात विविध शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयातील प्रसाधनगृहात शिरल्यास तेथेही जिल्हा परिषदेसारखेच दृश्य दिसून येते. अनेकदा बाहेरुन येणारे नागरिकही आपला डाव साधतात. मात्र त्याचे खापर कर्मचाऱ्यांच्या माथी फोडले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित विभाग प्रमुखाने कार्यालयीन स्वच्छतेसोबतच प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेकडे आणि सुरक्षेकडेही लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जिल्हा परिषदे सारखे त्यांच्या कार्यालयाच्या प्रसाधनगृहाजवळ देशीचे पव्वे आढळू शकतात. जबाबदारी कुणाची ? यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा केली असता ही जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची असल्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठाकडे विचारणा केली असता त्यांनी बांधकाम विभागाची जबाबदारी असल्याचे सांगितले. त्यामुळे नेमकी जबाबदारी कुणाची असा प्रश्न आहे.