शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे साडेपाच हजार शिक्षक बदलीपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:11 IST

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल साडेपाच हजारांच्यावरील शिक्षक बदलीपात्र ठरले आहे. या शिक्षकांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी येत्या ३१ मार्चपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदांना ३१ मेपूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांनी आपल्यास्तरावर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषदेने ...

ठळक मुद्दे३१ मेची डेडलाईन : २० मार्चपर्यंत अंतिम यादी

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल साडेपाच हजारांच्यावरील शिक्षक बदलीपात्र ठरले आहे. या शिक्षकांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी येत्या ३१ मार्चपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदांना ३१ मेपूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांनी आपल्यास्तरावर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषदेने पंचायत समितीस्तरावर बदलीपात्र शिक्षकांची यादी प्रकाशित करून त्यावर दावे व हरकती मागितल्या होत्या. ही प्रक्रिया नुकतीच संपल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी पप्पू भोयर यांनी सांगितले. आता जिल्हास्तरावरील अंतिम सेवा ज्येष्ठता यादीकडे बदलीपात्र शिक्षकांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेत जवळपास आठ हजारांच्यावर शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या बदल्या झाल्या नाही. त्यामुळे काही संघटनांनी बदल्या करण्याची मागणी रेटली होती. तथापि काही संघटनांचे पदाधिकारी मात्र विविध कारणांनी बदली प्रक्रियेत खोडा घालतात. त्यामुळे गेली तीन वर्षे ही प्रक्रिया रखडल्याचे दिसून येत आहे. सामान्य शिक्षकांना बदली व्हावीच, अशी अपेक्षा आहे. शासनाने त्यादृष्टीने यावर्षी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे.येत्या २० मार्चपूर्वी जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. या यादीवर शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आक्षेप, हरकती, दुरुस्तीबाबत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यावर सीईओंच्या निकालानंतर अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार शिक्षकांच्या आॅनलाईन पद्धतीने बदल्या होणार असल्याचे सांगितले जाते.बदल्या होणार असल्याने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आॅनलाईन बदल्यामुळे घोडाबाजारात ब्रेक लागणार आहे. प्रशासन कशा पद्धतीने पारदर्शक बदल्या करतात आणि योग्य न्याय देतात याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.सामान्य शिक्षकांना हवी बदलीकाही शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यवतमाळ शहरालगतच्या शाळा मिळविण्यासाठी नेहमी बदली प्रक्रियेत खोडा घालतात. त्यामुळे इतर हजारो शिक्षकांवर अन्याय होतो. अनेक शिक्षक गेल्या काही वर्षांपासून दुर्गम भागात सेवा देत आहे. त्यांना आता बदलीची प्रतीक्षा आहे. सामान्य शिक्षक कोणत्याही स्थितीत बदल्या व्हाव्याच या मानसिकतेत दिसून येत आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा