शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्हा परिषदेत खदखद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:54 IST

महिनाभरापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतरच्या घडामोडींची जिल्हा परिषदेत खदखद कायम आहे.

ठळक मुद्देबदलीची तयारी : पदाधिकारी-अधिकारी वाद, नेतृत्व करणारा अधिकारी कार्यमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिनाभरापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतरच्या घडामोडींची जिल्हा परिषदेत खदखद कायम आहे. याच खदखदीतून अधिकाºयांचे नेतृत्व करणाºया अधिकाºयालाच कार्यमुक्त करण्यात आले आहे.सर्वसाधारण सभेनंतर लोकप्रतिनिधी विरूद्ध अधिकारी, असा संघर्ष शिगेला पोहोचला. अधिकाºयांना एकत्रित करून तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रथम अध्यक्ष व नंतर थेट विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करून सदस्यांविरूद्ध एल्गार पुकारला. सदस्यांकडून अधिकाºयांचा मानभंग होत असल्याचा आरोप अधिकाºयांनी केला होता. यातून सदस्य विरूद्ध प्रशासन असा सामना रंगला. दरम्यान, अधिकाºयांची मोट बांधून सदस्यांविरूद्ध दंड थोपटणाºया त्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांनाच तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले.नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आठवडाभर रजेवर गेले. तेसुद्धा बदली करून घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली. जिल्हाधिकाºयांच्या पदोन्नतीवरील बदलीनंतर आता सीईओ बदलीच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. अनेक कर्मचारीच या चर्चेला खतपाणी घालत आहे. दरम्यान, सीईओंच्या अनुपस्थितीतीच स्थायी समितीची सभा घेण्यात आली. त्यामुळे सदस्य व अधिकाºयांमधील खदखद कायम असल्याचे बोलले जाते. प्रभारींच्या नेतृत्वात स्थायी समितीची सभा घेण्यात आल्याने या चर्चेला दुजोरा मिळतो.सध्या जिल्हा परिषदेत शांतता आहे. मात्र ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे सांगितले जाते. सीईओ रजेवरून परतले आहे. पुन्हा ते नव्या जोमाने कामाला लागले. मात्र अलिकडे त्यांचे मन जिल्हा परिषदेत रमत नसल्याची आवई उठली आहे. याच आवईतून ते बदलीच्या मानसिकेतेत असल्याच्या चर्चेने जोर पकडला. यातील सत्य मात्र केवळ सीईओंनाच माहिती आहे. एकंदरित जिल्हा परिषदेची ही खदखद कशी संपणार याकडे लक्ष लागले आहे.बाह्य हस्तक्षेपामुळे प्रशासनाच्या नाकीनऊजिल्हा परिषदेत चार महिला पदाधिकारी आहे. यापैकी एक वगळता उर्वरित महिला पदाधिकाºयांमुळे प्रशासनात बाह्यहस्तक्षेप वाढल्याची चर्चा अधिकारी, कर्मचाºयांमध्ये रंगत आहे. काही महिला सदस्यांचे नातेवाईकही प्रशासनाच्या कामात लुडबूड करतात. यामुळे प्रशासनाला ६१ सदस्य आणि त्यातील किमान निम्म्या सदस्यांच्या नातेवाईकांना सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या बाह्यहस्तक्षेपामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या नाकीनऊ आल्याची चर्चा आहे.