शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

जिल्हा परिषद शाळेत शिकूनही होता येते यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 21:50 IST

हा खूप मोठा जिल्हा आहे. कामांचा ढिगही मोठा आहे. त्याबाबतीत नियोजन करू. सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी म्हणून मी काम करणार आहे.

ठळक मुद्देराजेश देशमुख यांची यशोगाथा : सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी!

अविनाश साबापुरे/रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हा खूप मोठा जिल्हा आहे. कामांचा ढिगही मोठा आहे. त्याबाबतीत नियोजन करू. सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी म्हणून मी काम करणार आहे. कोणती हेल्पलाईन वगैरे आपण जाहीर करणार नाही. पण सर्वांसाठी मी सहज उपलब्ध राहील. आज संपर्काची वेगवेगळी साधने आहेत, जनतेने कुठल्याही साधनाद्वारे माझ्याशी संपर्क साधला तरी मी भेटेल, अशा शब्दात नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लोकाभिमुख कार्यशैलीची इच्छा बोलून दाखविली.जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते.प्रामाणिक परिश्रम हाच यशाचा मंत्रते म्हणाले, देवळालीच्या (जि. उस्मानाबाद) जिल्हा परिषद शाळेतच माझे शिक्षण झाले. आई कुसूम नगरपरिषदेच्या तर वडील भागवतराव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही मुंबईसारख्या ठिकाणी पदवीचे शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षा कोणत्याही भाषेतून देता येते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत मुलगा शिकला म्हणजे, तो मागे पडेल, असा समज ठेवू नये. प्रामाणिक प्रयत्न आणि परिश्रम केले तर यश मिळतेच.शाळांचे यश लोकांपर्यंत पोहोचवासातारामध्ये सीईओ असताना आम्ही डिजिटल व्हॅन तयार केली. त्यात ५० उत्तम शाळांचे प्रेझेंटेशन केले आणि ही व्हॅन गावोगावी फिरविली. यवतमाळ जिल्ह्यातही चांगले प्रयत्न सुरू आहेत. फक्त जिल्हा परिषद शाळांची यशोगाथा घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, असे डॉ. राजेश देशमुख म्हणाले.प्रशासन आणि वैयक्तिक जीवन ही कसरतच एकाच वेळी प्रशासन आणि कौटुंबिक जबाबदाºया पार पाडणे ही कसरतच असते. आताच माझ्या वडिलांचे कॅन्सरचे आॅपरेशन झाले. पत्नी विजया घरातील जबाबदाºया सक्षमपणे हाताळते. त्यामुळे मला प्रशासकीय जबाबदाºयांवर ‘फोकस’ ठेवणे शक्य होते. मुलगी आर्या आणि मुलगा आदित्य शिक्षणात हुशार आहेत, असे ते म्हणाले.१८ कॅन्सरग्रस्तांना दिले जीवदानसातारा येथे सीईओ म्हणून काम करताना डॉ. राजेश देशमुख यांनी कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी प्रभावी काम केले. त्याविषयी जिल्हाधिकारी म्हणाले, हा माझ्या कामाचा भाग नव्हता, पण जबाबदारी म्हणून आम्ही ते केले. अमेरिकेत असलेला आणि सध्या मुंबईत असलेल्या एका मित्रामुळे मला या कामात योगदान देता आले. तो मित्र आणि मी मुंबईत झालेल्या कर्करोग संशोधकांच्या जागतिक परिषदेत गेलो होतो. पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील कॅन्सर १०० नव्हे २०० टक्के बरा होतो, हे आम्हाला कळले. पण दुर्दैव म्हणजे, एखाद्याला कॅन्सर झाला हे जेव्हा कळते, तेव्हा तो चौथ्या टप्प्यात पोहोचलेला असतो. ही बाब टाळून रूग्णांना वाचविण्यासाठी आम्ही ‘कॅन्सर साक्षर सातारा’ हा उपक्रम राबविला. साताºयातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, एएनएम यांना खास प्रशिक्षण दिले. गावकºयांशी संपर्क वाढविण्यास सांगितले. कुणामध्ये कॅन्सरची प्राथमिक लक्षणे दिसतात का हे शोधायला लावले. अशा संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार देण्यासाठी शंभराहून अधिक शिबिरे घेतली. २०० हून अधिक रूग्ण ‘सस्पेक्टेड’ आढळले. गरजू रूग्णांना साताºयाच्या दोन विशेष रूग्णालयात आणून उपचार केले. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १० लाखांचा निधी वेगळा ठेवला. १८ रूग्णांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्या सर्वांना वाचविण्यात आम्हाला यश आले.