शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेत शिकूनही होता येते यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 21:50 IST

हा खूप मोठा जिल्हा आहे. कामांचा ढिगही मोठा आहे. त्याबाबतीत नियोजन करू. सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी म्हणून मी काम करणार आहे.

ठळक मुद्देराजेश देशमुख यांची यशोगाथा : सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी!

अविनाश साबापुरे/रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हा खूप मोठा जिल्हा आहे. कामांचा ढिगही मोठा आहे. त्याबाबतीत नियोजन करू. सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी म्हणून मी काम करणार आहे. कोणती हेल्पलाईन वगैरे आपण जाहीर करणार नाही. पण सर्वांसाठी मी सहज उपलब्ध राहील. आज संपर्काची वेगवेगळी साधने आहेत, जनतेने कुठल्याही साधनाद्वारे माझ्याशी संपर्क साधला तरी मी भेटेल, अशा शब्दात नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लोकाभिमुख कार्यशैलीची इच्छा बोलून दाखविली.जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते.प्रामाणिक परिश्रम हाच यशाचा मंत्रते म्हणाले, देवळालीच्या (जि. उस्मानाबाद) जिल्हा परिषद शाळेतच माझे शिक्षण झाले. आई कुसूम नगरपरिषदेच्या तर वडील भागवतराव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही मुंबईसारख्या ठिकाणी पदवीचे शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षा कोणत्याही भाषेतून देता येते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत मुलगा शिकला म्हणजे, तो मागे पडेल, असा समज ठेवू नये. प्रामाणिक प्रयत्न आणि परिश्रम केले तर यश मिळतेच.शाळांचे यश लोकांपर्यंत पोहोचवासातारामध्ये सीईओ असताना आम्ही डिजिटल व्हॅन तयार केली. त्यात ५० उत्तम शाळांचे प्रेझेंटेशन केले आणि ही व्हॅन गावोगावी फिरविली. यवतमाळ जिल्ह्यातही चांगले प्रयत्न सुरू आहेत. फक्त जिल्हा परिषद शाळांची यशोगाथा घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, असे डॉ. राजेश देशमुख म्हणाले.प्रशासन आणि वैयक्तिक जीवन ही कसरतच एकाच वेळी प्रशासन आणि कौटुंबिक जबाबदाºया पार पाडणे ही कसरतच असते. आताच माझ्या वडिलांचे कॅन्सरचे आॅपरेशन झाले. पत्नी विजया घरातील जबाबदाºया सक्षमपणे हाताळते. त्यामुळे मला प्रशासकीय जबाबदाºयांवर ‘फोकस’ ठेवणे शक्य होते. मुलगी आर्या आणि मुलगा आदित्य शिक्षणात हुशार आहेत, असे ते म्हणाले.१८ कॅन्सरग्रस्तांना दिले जीवदानसातारा येथे सीईओ म्हणून काम करताना डॉ. राजेश देशमुख यांनी कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी प्रभावी काम केले. त्याविषयी जिल्हाधिकारी म्हणाले, हा माझ्या कामाचा भाग नव्हता, पण जबाबदारी म्हणून आम्ही ते केले. अमेरिकेत असलेला आणि सध्या मुंबईत असलेल्या एका मित्रामुळे मला या कामात योगदान देता आले. तो मित्र आणि मी मुंबईत झालेल्या कर्करोग संशोधकांच्या जागतिक परिषदेत गेलो होतो. पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील कॅन्सर १०० नव्हे २०० टक्के बरा होतो, हे आम्हाला कळले. पण दुर्दैव म्हणजे, एखाद्याला कॅन्सर झाला हे जेव्हा कळते, तेव्हा तो चौथ्या टप्प्यात पोहोचलेला असतो. ही बाब टाळून रूग्णांना वाचविण्यासाठी आम्ही ‘कॅन्सर साक्षर सातारा’ हा उपक्रम राबविला. साताºयातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, एएनएम यांना खास प्रशिक्षण दिले. गावकºयांशी संपर्क वाढविण्यास सांगितले. कुणामध्ये कॅन्सरची प्राथमिक लक्षणे दिसतात का हे शोधायला लावले. अशा संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार देण्यासाठी शंभराहून अधिक शिबिरे घेतली. २०० हून अधिक रूग्ण ‘सस्पेक्टेड’ आढळले. गरजू रूग्णांना साताºयाच्या दोन विशेष रूग्णालयात आणून उपचार केले. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १० लाखांचा निधी वेगळा ठेवला. १८ रूग्णांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्या सर्वांना वाचविण्यात आम्हाला यश आले.