शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्हा परिषद शाळेत शिकूनही होता येते यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 21:50 IST

हा खूप मोठा जिल्हा आहे. कामांचा ढिगही मोठा आहे. त्याबाबतीत नियोजन करू. सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी म्हणून मी काम करणार आहे.

ठळक मुद्देराजेश देशमुख यांची यशोगाथा : सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी!

अविनाश साबापुरे/रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हा खूप मोठा जिल्हा आहे. कामांचा ढिगही मोठा आहे. त्याबाबतीत नियोजन करू. सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी म्हणून मी काम करणार आहे. कोणती हेल्पलाईन वगैरे आपण जाहीर करणार नाही. पण सर्वांसाठी मी सहज उपलब्ध राहील. आज संपर्काची वेगवेगळी साधने आहेत, जनतेने कुठल्याही साधनाद्वारे माझ्याशी संपर्क साधला तरी मी भेटेल, अशा शब्दात नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लोकाभिमुख कार्यशैलीची इच्छा बोलून दाखविली.जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते.प्रामाणिक परिश्रम हाच यशाचा मंत्रते म्हणाले, देवळालीच्या (जि. उस्मानाबाद) जिल्हा परिषद शाळेतच माझे शिक्षण झाले. आई कुसूम नगरपरिषदेच्या तर वडील भागवतराव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही मुंबईसारख्या ठिकाणी पदवीचे शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षा कोणत्याही भाषेतून देता येते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत मुलगा शिकला म्हणजे, तो मागे पडेल, असा समज ठेवू नये. प्रामाणिक प्रयत्न आणि परिश्रम केले तर यश मिळतेच.शाळांचे यश लोकांपर्यंत पोहोचवासातारामध्ये सीईओ असताना आम्ही डिजिटल व्हॅन तयार केली. त्यात ५० उत्तम शाळांचे प्रेझेंटेशन केले आणि ही व्हॅन गावोगावी फिरविली. यवतमाळ जिल्ह्यातही चांगले प्रयत्न सुरू आहेत. फक्त जिल्हा परिषद शाळांची यशोगाथा घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, असे डॉ. राजेश देशमुख म्हणाले.प्रशासन आणि वैयक्तिक जीवन ही कसरतच एकाच वेळी प्रशासन आणि कौटुंबिक जबाबदाºया पार पाडणे ही कसरतच असते. आताच माझ्या वडिलांचे कॅन्सरचे आॅपरेशन झाले. पत्नी विजया घरातील जबाबदाºया सक्षमपणे हाताळते. त्यामुळे मला प्रशासकीय जबाबदाºयांवर ‘फोकस’ ठेवणे शक्य होते. मुलगी आर्या आणि मुलगा आदित्य शिक्षणात हुशार आहेत, असे ते म्हणाले.१८ कॅन्सरग्रस्तांना दिले जीवदानसातारा येथे सीईओ म्हणून काम करताना डॉ. राजेश देशमुख यांनी कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी प्रभावी काम केले. त्याविषयी जिल्हाधिकारी म्हणाले, हा माझ्या कामाचा भाग नव्हता, पण जबाबदारी म्हणून आम्ही ते केले. अमेरिकेत असलेला आणि सध्या मुंबईत असलेल्या एका मित्रामुळे मला या कामात योगदान देता आले. तो मित्र आणि मी मुंबईत झालेल्या कर्करोग संशोधकांच्या जागतिक परिषदेत गेलो होतो. पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील कॅन्सर १०० नव्हे २०० टक्के बरा होतो, हे आम्हाला कळले. पण दुर्दैव म्हणजे, एखाद्याला कॅन्सर झाला हे जेव्हा कळते, तेव्हा तो चौथ्या टप्प्यात पोहोचलेला असतो. ही बाब टाळून रूग्णांना वाचविण्यासाठी आम्ही ‘कॅन्सर साक्षर सातारा’ हा उपक्रम राबविला. साताºयातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, एएनएम यांना खास प्रशिक्षण दिले. गावकºयांशी संपर्क वाढविण्यास सांगितले. कुणामध्ये कॅन्सरची प्राथमिक लक्षणे दिसतात का हे शोधायला लावले. अशा संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार देण्यासाठी शंभराहून अधिक शिबिरे घेतली. २०० हून अधिक रूग्ण ‘सस्पेक्टेड’ आढळले. गरजू रूग्णांना साताºयाच्या दोन विशेष रूग्णालयात आणून उपचार केले. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १० लाखांचा निधी वेगळा ठेवला. १८ रूग्णांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्या सर्वांना वाचविण्यात आम्हाला यश आले.