शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

जिल्हा परिषदेत नोव्हेंबरपासून २० कोटींच्या निविदा रोखल्या

By admin | Updated: January 31, 2016 02:29 IST

मजूर कामगार सहकारी संस्थांना नऊ कोटी रुपयांची कामे देता यावी, यासाठी जिल्हा परिषदेमध्ये राजकीय स्तरावरून व्युहरचना केली जात आहे.

‘डीपीसी’च्या आदेशाला फाटा : नऊ कोटींची कामे मजूर संस्थांना देण्याचा घाटयवतमाळ : मजूर कामगार सहकारी संस्थांना नऊ कोटी रुपयांची कामे देता यावी, यासाठी जिल्हा परिषदेमध्ये राजकीय स्तरावरून व्युहरचना केली जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला फाटा देत दोन महिन्यांपासून २० कोटींच्या निविदा रोखण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ आणि २ ला सन २०१५-१६ साठी जिल्हा नियोजन समितीने फेब्रुवारीमध्ये २० कोटी रुपये निधी मंजूर केला. या निधीतून रस्ते व पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. या निधीतून २० लाखांपेक्षा कमी किमतीचे काम घेऊ नये आणि कोणताही रस्ता किमान एक किलोमीटर सलग व्हावा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहे. मात्र त्यांच्या या आदेशाला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात राजकीय व तांत्रिक स्तरावर फाटा दिला जात आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून २० कोटींच्या निविदा रोखण्यात आल्या आहेत. तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्रक्रिया झालेली असतानाही या निधीतील कामाच्या निविदा काढल्या गेलेल्या नाहीत. त्यामागे ‘टक्केवारी’चे गणित असल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषदेतील राजकीय नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत २० कोटींपैकी नऊ कोटींची कामे मजूर सहकारी संस्थांना द्यायची आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी एका कामासाठी २० लाखांचे बंधन घातले आहे तर दुसरीकडे मजूर सहकारी संस्थांची एक कामाची मर्यादा जास्तीत जास्त १५ लाखांपर्यंत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच मुठमाती दिली आहे. नऊ कोटींपैकी ७५ टक्के कामांचे बजेट २० लाखांहून १५ लाखांपर्यंत खाली आणण्यात आले आहे. त्यामुळे आता मजूर सहकारी संस्थांना आपल्या मर्जीने कामे देण्याची बांधकाम खात्याची सोय होणार आहे. उर्वरित ११ कोटींच्या कामांचे वाटप ओपन टेंडर आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना केले जाणार आहे. आर्थिक तडजोडीसाठी आणखी दोन आठवडे नऊ कोटींच्या कामांच्या निविदा काढल्या जाणार नसल्याची माहिती आहे. ‘आधी अर्थकारण नंतर राजकारण’ असा नाराच जणू जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात दिला जात असल्याने या कामांना विलंब होतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)