शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे कर्मचारी एकस्तरपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:53 IST

आदिवासी, नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा तत्काळ लाभ देण्याचे निर्देश ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिले आहे.

ठळक मुद्देग्रामविकास विभागाचे पत्र : न्यायालयाचे आदेश पाळण्याचे निर्देश

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : आदिवासी, नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा तत्काळ लाभ देण्याचे निर्देश ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिले आहे. जिल्हा परिषदेचे शेकडो कर्मचारी अद्याप एकस्तरपासून वंचित आहे.राज्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाºयांना शासनाने ६ आॅगस्ट २००२ पासून एकस्तर वेतनश्रेणी लागू केली. मात्र तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अचानक ही वेतनश्रेणी बंद केली. त्यामुळे काही कर्मचारी व संघटनांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने ४ जुलै २०१७ रोजी निर्णय देत आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाºयांना एकस्तर वेतनश्रेणी तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिले. सोबतच त्यांच्या वेतन निश्चितीची कारवाई दोन महिन्यांच्या आता पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.उच्च न्यायालयाने निर्णय देऊन आता जवळपास आठ महिने लोटले आहे. मात्र अद्यापही यवतमाळच नव्हे, तर राज्यातील इतरही काही जिल्ह्यातील हजारो कर्मचारी एकस्तर वेतनश्रेणीपासून वंचित आहेत. जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांनाही या वेतनश्रेणीचा लाभ मिळाला नाही. आता ग्रामविकास व जलसंधारण विभागाने सर्व विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र पाठविले आहे. त्यातून आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकस्तर व वरिष्ठ वेतणश्रेणीचा लाभ मंजूर करण्याचे आदेश दिले आहे.हा तर न्यायालयाचा अवमानउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४ जून २०१७ रोजी निर्णय देऊन दोन महिन्यांच्या आत कारवाईचे आदेश दिले. मात्र आठ महिने लोटूनही अनेक कर्मचाºयांचा या वेतनश्रेणीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे एकप्रकारे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे कर्मचाºयांकडून बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिकाही दाखल केली होती. मात्र ग्रामविकास सचिवांनी न्यायालयापुढे हजर होऊन त्वरित लाभ देण्याची ग्वाही दिल्याने ही याचिका मागे घेण्यात आली होती. तरीही शेकडो कर्मचारी या वेतनश्रेणीपासून वंचितच आहे.