शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्हा परिषद प्रशासन गतिमान झाले हो..!

By admin | Updated: August 10, 2016 01:17 IST

जिल्हा परिषद प्रशासन काही कामांमध्ये भलतेच गतीमान झाल्याचे दिसत आहे. हीच गतीमानता सर्वच कामांत....

त्वरेने निलंबन : नियुक्तीही दिली जाते त्वरेने, प्रस्ताव दाखल होताच उमटविली जाते मोहोर यवतमाळ : जिल्हा परिषद प्रशासन काही कामांमध्ये भलतेच गतीमान झाल्याचे दिसत आहे. हीच गतीमानता सर्वच कामांत दिसून आल्यास खरोखरच या गतीमानतचे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांकडून स्वागत होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदांसाठी राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता पुरस्कार स्पर्धा सुरू केली आहे. यात गतीमान प्रशासन राविण्याऱ्या राज्यातील जिल्हा परिषदेला दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविले जाते. अद्याप हा पुरस्कार यवतमाळ जिल्हा परिषदेला प्रात झाला नाही. मात्र गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींवरून येथील जिल्हा परिषद प्रशासन अत्यंत गतीमान झाल्याचे दिसून येत आहे. एका साधन व्यक्तीची त्वरेने नियुक्ती आणि एका कृषी अधिकाऱ्याचे झालेले निलंबन, यावरून ही बाब अधोरेखीत झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बाभूळगाव पंचायत समितीमधील एका साधन व्यक्ती महिलेचे आजाराने निधन झाले. ज्या दिवशी त्यांचे निधन झाले, अगदी त्याच्या दुसऱ्या दिवशीच जिल्हा परिषदेने बाभूळगाव पंचायत समितीत वाशीम जिल्ह्यातून बदलून आलेल्या साधन व्यक्तीच्या नियुक्तीचे आदेश काढले. विशेष म्हणजे तोपर्यंत मृत साधन व्यक्तीवर अंत्यसंस्कारही झाले नव्हते. एवढेच नव्हे, तर बाभूळगाव पंचायत समितीने याबाबत कोणतीही टीपणी जिल्हा परिषदेला पाठविली नव्हती. अर्थात ती साधन व्यक्ती मृत होण्याचीच प्रतीक्षा तर जिल्हा परिषदेला नव्हती ना, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. गेल्या ४ आॅगस्टला एका कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश पारित झाले. या प्रकरणातही प्रशासनाची गतीमानता दिसून आली. संबंधित अधिकारी रजेवर होते. त्याचवेळी जिल्हा परिषदेत त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू होती. ते पुन्हा रूजू होण्यापूर्वीच त्यांच्या निलंबनाचे सर्व सोपस्कार आटोपले होते. संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव दाखल झाल्यानंतर सीईओंनी केवळ त्यावर निलंबनाची मोहोर उमटविली. विशेष म्हणजे त्या कृषी अधिकाऱ्यांचे बहुतांश गोपनीय अहवाल ए-प्लस असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना, असा ठपका ठेवण्यात आला. ते वरिष्ठच ३१ जुलैपर्यंत रजेवर होते, हे सुद्धा विशेष. (शहर प्रतिनिधी)