शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

वणीत कोळशापासून युरिया

By admin | Updated: November 10, 2015 03:08 IST

वणी क्षेत्र दगडी कोळशाचे आगार आहे. या दगडी कोळशापासून वीज निर्माण करण्यासोबतच त्यापासून युरिया बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.

अहीर यांचे प्रतिपादन : प्रकल्पग्रस्तांना वाटले वाढीव मोबदल्याचे २५ कोटीवणी : वणी क्षेत्र दगडी कोळशाचे आगार आहे. या दगडी कोळशापासून वीज निर्माण करण्यासोबतच त्यापासून युरिया बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आता काळ्या कोळशापासून पांढरा युरिया बनविणारा प्रकल्प येत्या काही वर्षात वणी विभागात आणू, ते आपले स्वप्न असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.नव्याने सुरू होणाऱ्या जुनाड कोळसा खाणीसाठी ९३ शेतकऱ्यांची ३२० एकर जमीन वेकोलिने संपादित केली. त्या प्रकल्पग्रस्तांना आठ ते नऊ लाख रूपये प्रति एकर दराने मोबदला वेकोलिकडून देण्यात आला. त्याच्या धनादेशाचे वितरण रविवारी वेल्हाळा मंदिराच्या प्रांगणात एका कार्यक्रमात करण्यात आले. शेतकऱ्यांना ४६ लाखांपासून तर दोन लाखापर्यंतचे धनादेश यावेळी वितरीत करण्यात आले. तत्पूर्वी अहीर यांनी गोमातेचे पूजन केले. त्यानंतर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री अहीर यांनी वेकोलिकडून मंजूर झालेल्या नव्या योजनांची माहिती दिली. स्थानिक बेरोजगारांना काम देणे, अधिग्रहीत जमीन पडीत न ठेवता ती शेतमजुरांना वहितीसाठी देणे, अंध-अपंगांना नोकरीत आरक्षण देणे, या योजनांचा यात समावेश आहे. शेतकऱ्यांनी मिळणाऱ्या पैशाचा सदुपयोग करावा, अशी विनंती अहीर यांनी केली. त्यासाठी बँकांच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. चंद्रपूर येथे कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून दरवर्षी ५०० युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगितले. लवकरच तुकडेबंदी कायदा अंमलात येणार असून आता प्रकल्पग्रस्तांना दोन एकरावर एक नोकरी मिळणार असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या भव्य पाठींब्यामुळेच आपण हा लढा जिंकू शकल्याचे कबूल करीत अहीर यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले.यावेळी प्रथम राहुल सराफ यांनी वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वेकोलित प्रकल्पग्रस्तांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकऱ्या मिळाव्या. वेकोलिकडे कार्यरत खासगी कंपन्यामध्ये बेरोजगारांना रोजगार द्यावा. परिसरातील शाळा डीजिटल करण्यासाठी शाळांना दोन लाख रूपये द्यावे. नीलगिरी वनात फॉरेस्ट पार्कची निर्मिती करावी व रेल्वे सायडींग शहरापासून दूर न्यावी, अशा मागण्या वेकोलि प्रशासनाकडे केल्या.वेकोलिचे महाप्रबंधक राजीव रंजन मिश्र यांनी वेकोलिची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याचे सांगून कंपनी सतत तीन वर्षांपासून तोट्यात आहे. त्यामुळे पुढील ३६ महिन्यांत नव्या ३६ खाणी सुरू करून कंपनीला सुधारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र शेतकऱ्यांना नाराज करून वेकोलि खाण सुरू करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मंचावर वेकोलिचे तांत्रिक निदेशक एस.एस.मल्ही, कार्मिक निदेशक डॉ.संजयकुमार, मुख्य महाप्रबंधक (संचालन) आर.सी. सतोडिया, उमाशंकर सिंग, रमेश बल्लेवार, विजय पिदुरकर, राजेंद्र डांगे, सरपंच किरण कोडापे, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)