शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा

By admin | Updated: January 31, 2015 23:28 IST

शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणेकरून प्रगती होईल शिवाय रोजगारही मिळेल, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले.

शिवाजीराव मोघे : आर्णी येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळाआर्णी : शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणेकरून प्रगती होईल शिवाय रोजगारही मिळेल, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. यवतमाळ जिल्हा विकास मंचद्वारा आयोजित कृषीपूरक व्यवसाय मार्गदर्शन व कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसायासाठी भरपूर संधी आहेत. जिल्हा विकास मंच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे अ‍ॅड. मोघे यांनी सांगितले.भारत राठोड यांनी प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना यशस्वी उद्योजकांकडून प्रेरणा मिळावी असे सांगितले. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय त्यांनी करावा, असे ते म्हणाले. प्रसंगी राजाभाऊ ठाकरे, जीवन पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी डी.आर. कलसाईत आदींनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात यशस्वी शेतकऱ्यांनी आपल्या यशाचे गमक सांगितले. डाळिंबाचे उत्पादक कुलदीप राऊत (मंगरूळपीर) म्हणाले, शेतीतून चांगले उत्पादन घेता येते. मात्र यात स्वत:ला झोकून देण्याची गरज आहे. शेताशी एकरूप झाल्यास शेतकरी कधीही मागे येणार नाही. शेतीच्या धुऱ्याचाही उपयोग करून उत्पादनात वाढ करता येते. आपण डाळिंबाची झाडे लावल्यापासून दिवसभरातील एकवेळचे जेवण शेतातच घेतो, असे ते म्हणाले. कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारे देवेंद्र भोयर म्हणाले, आपण व्यवसायात चढउतार पाहिले. खूप नुकसान झाले. परंतु हिम्मत सोडली नाही. दरम्यान बीपीएडही केले. बँकेने दिलेली नोकरी नाकारून त्यांच्याकडून कर्ज घेतले. यातून व्यवसाय वाढविला. चुकांमधून शिकत गेलो आणि उभारी मिळत गेली. कोंबड्यांना लागणारे खाद्य स्वत: बनविण्याचे तंत्र अवगत केले. यातून खूप फायदा झाला. परिश्रमाच्या बळावरच आज स्वत:मध्ये विश्वास निर्माण झाला. शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे निश्चितच वळले पाहिजे, असे ते म्हणाले. दुग्ध व्यावसायिक अरविंद भेंडे यांनी शेतात केलेल्या विविध प्रयोगातून सर्वांगीण प्रगती साधली आहे. भाजीपाल्यासाठी शेडनेटचा प्रयोग केला. काकडी, टोमॅटो आदी भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेतले. सोबत दुग्ध व्यवसाय सुरू केला. पॅकेजमधून मिळालेल्या जनावरांचे चांगल्या प्रकारे संगोपन करून दुग्ध उत्पादनात वाढ केली. प्रत्येक शेतकऱ्याने जोडधंदा करावा, असे मत त्यांनी मांडले. या कार्यशाळेप्रसंगी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने हजेरी होती. बहुतांश शेतकऱ्यांनी प्रदर्शनात विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते. यात बचत गटाच्या महिलांचाही सहभाग होता. कार्यशाळेप्रसंगी डॉ. प्रमोद यादगीरवार, जिल्हा विकास मंचचे भारत राठोड, महेंद्र ढवळे, राजेंद्र वानखडे, जी.जी. पिंगळे, कैलास राऊत, राजेंद्र बुटले आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)