शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा

By admin | Updated: January 31, 2015 23:28 IST

शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणेकरून प्रगती होईल शिवाय रोजगारही मिळेल, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले.

शिवाजीराव मोघे : आर्णी येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळाआर्णी : शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणेकरून प्रगती होईल शिवाय रोजगारही मिळेल, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. यवतमाळ जिल्हा विकास मंचद्वारा आयोजित कृषीपूरक व्यवसाय मार्गदर्शन व कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसायासाठी भरपूर संधी आहेत. जिल्हा विकास मंच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे अ‍ॅड. मोघे यांनी सांगितले.भारत राठोड यांनी प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना यशस्वी उद्योजकांकडून प्रेरणा मिळावी असे सांगितले. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय त्यांनी करावा, असे ते म्हणाले. प्रसंगी राजाभाऊ ठाकरे, जीवन पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी डी.आर. कलसाईत आदींनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात यशस्वी शेतकऱ्यांनी आपल्या यशाचे गमक सांगितले. डाळिंबाचे उत्पादक कुलदीप राऊत (मंगरूळपीर) म्हणाले, शेतीतून चांगले उत्पादन घेता येते. मात्र यात स्वत:ला झोकून देण्याची गरज आहे. शेताशी एकरूप झाल्यास शेतकरी कधीही मागे येणार नाही. शेतीच्या धुऱ्याचाही उपयोग करून उत्पादनात वाढ करता येते. आपण डाळिंबाची झाडे लावल्यापासून दिवसभरातील एकवेळचे जेवण शेतातच घेतो, असे ते म्हणाले. कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारे देवेंद्र भोयर म्हणाले, आपण व्यवसायात चढउतार पाहिले. खूप नुकसान झाले. परंतु हिम्मत सोडली नाही. दरम्यान बीपीएडही केले. बँकेने दिलेली नोकरी नाकारून त्यांच्याकडून कर्ज घेतले. यातून व्यवसाय वाढविला. चुकांमधून शिकत गेलो आणि उभारी मिळत गेली. कोंबड्यांना लागणारे खाद्य स्वत: बनविण्याचे तंत्र अवगत केले. यातून खूप फायदा झाला. परिश्रमाच्या बळावरच आज स्वत:मध्ये विश्वास निर्माण झाला. शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे निश्चितच वळले पाहिजे, असे ते म्हणाले. दुग्ध व्यावसायिक अरविंद भेंडे यांनी शेतात केलेल्या विविध प्रयोगातून सर्वांगीण प्रगती साधली आहे. भाजीपाल्यासाठी शेडनेटचा प्रयोग केला. काकडी, टोमॅटो आदी भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेतले. सोबत दुग्ध व्यवसाय सुरू केला. पॅकेजमधून मिळालेल्या जनावरांचे चांगल्या प्रकारे संगोपन करून दुग्ध उत्पादनात वाढ केली. प्रत्येक शेतकऱ्याने जोडधंदा करावा, असे मत त्यांनी मांडले. या कार्यशाळेप्रसंगी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने हजेरी होती. बहुतांश शेतकऱ्यांनी प्रदर्शनात विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते. यात बचत गटाच्या महिलांचाही सहभाग होता. कार्यशाळेप्रसंगी डॉ. प्रमोद यादगीरवार, जिल्हा विकास मंचचे भारत राठोड, महेंद्र ढवळे, राजेंद्र वानखडे, जी.जी. पिंगळे, कैलास राऊत, राजेंद्र बुटले आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)