शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा

By admin | Updated: January 31, 2015 23:28 IST

शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणेकरून प्रगती होईल शिवाय रोजगारही मिळेल, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले.

शिवाजीराव मोघे : आर्णी येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळाआर्णी : शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणेकरून प्रगती होईल शिवाय रोजगारही मिळेल, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. यवतमाळ जिल्हा विकास मंचद्वारा आयोजित कृषीपूरक व्यवसाय मार्गदर्शन व कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसायासाठी भरपूर संधी आहेत. जिल्हा विकास मंच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे अ‍ॅड. मोघे यांनी सांगितले.भारत राठोड यांनी प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना यशस्वी उद्योजकांकडून प्रेरणा मिळावी असे सांगितले. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय त्यांनी करावा, असे ते म्हणाले. प्रसंगी राजाभाऊ ठाकरे, जीवन पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी डी.आर. कलसाईत आदींनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात यशस्वी शेतकऱ्यांनी आपल्या यशाचे गमक सांगितले. डाळिंबाचे उत्पादक कुलदीप राऊत (मंगरूळपीर) म्हणाले, शेतीतून चांगले उत्पादन घेता येते. मात्र यात स्वत:ला झोकून देण्याची गरज आहे. शेताशी एकरूप झाल्यास शेतकरी कधीही मागे येणार नाही. शेतीच्या धुऱ्याचाही उपयोग करून उत्पादनात वाढ करता येते. आपण डाळिंबाची झाडे लावल्यापासून दिवसभरातील एकवेळचे जेवण शेतातच घेतो, असे ते म्हणाले. कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारे देवेंद्र भोयर म्हणाले, आपण व्यवसायात चढउतार पाहिले. खूप नुकसान झाले. परंतु हिम्मत सोडली नाही. दरम्यान बीपीएडही केले. बँकेने दिलेली नोकरी नाकारून त्यांच्याकडून कर्ज घेतले. यातून व्यवसाय वाढविला. चुकांमधून शिकत गेलो आणि उभारी मिळत गेली. कोंबड्यांना लागणारे खाद्य स्वत: बनविण्याचे तंत्र अवगत केले. यातून खूप फायदा झाला. परिश्रमाच्या बळावरच आज स्वत:मध्ये विश्वास निर्माण झाला. शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे निश्चितच वळले पाहिजे, असे ते म्हणाले. दुग्ध व्यावसायिक अरविंद भेंडे यांनी शेतात केलेल्या विविध प्रयोगातून सर्वांगीण प्रगती साधली आहे. भाजीपाल्यासाठी शेडनेटचा प्रयोग केला. काकडी, टोमॅटो आदी भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेतले. सोबत दुग्ध व्यवसाय सुरू केला. पॅकेजमधून मिळालेल्या जनावरांचे चांगल्या प्रकारे संगोपन करून दुग्ध उत्पादनात वाढ केली. प्रत्येक शेतकऱ्याने जोडधंदा करावा, असे मत त्यांनी मांडले. या कार्यशाळेप्रसंगी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने हजेरी होती. बहुतांश शेतकऱ्यांनी प्रदर्शनात विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते. यात बचत गटाच्या महिलांचाही सहभाग होता. कार्यशाळेप्रसंगी डॉ. प्रमोद यादगीरवार, जिल्हा विकास मंचचे भारत राठोड, महेंद्र ढवळे, राजेंद्र वानखडे, जी.जी. पिंगळे, कैलास राऊत, राजेंद्र बुटले आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)