शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तुम्ही जगा की मरा, पण धान्यवाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST

शहरातून आता ग्रामीण भागातील घराघरांत कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहे. अशा स्थितीत शासन व प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य ...

शहरातून आता ग्रामीण भागातील घराघरांत कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहे. अशा स्थितीत शासन व प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य पार पाडणारी यंत्रणा म्हणजे गावागावांतील प्रत्येक घरातील लोकांपर्यंत धान्य पोहचविणारी अन्न व नागरी पुरवठा यंत्रणा होय. या यंत्रणेच्या माध्यमातून घराघरांतील प्रत्येकाला स्वस्त भावात धान्य घरपोच देण्यात येते. या यंत्रणेमध्ये पुरवठा अधिकारी, पुरवठा कर्मचारी, गोडाऊन किपर, हमाल, धान्य पुरवठा ठेकेदार, ट्रकचालक-मालक ते रास्त भाव धान्य दुकानदार ही साखळी गावातील प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी अन्नधान्य वितरण करीत असते. परंतु, कोरोनाच्या महामारीत हीच अन्नधान्य वितरण करणारी साखळी अडचणीत सापडली आहे. त्यांच्या जीवनाची हमी राहिली नाही. रास्त भाव धान्य दुकानदारांना तर जगा की मरा, पण धान्य वितरण करा, असा एक प्रकारे अलिखित आदेशच दिला गेला आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानदार अडचणीत सापडले आहे.

कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी आहे. मात्र, कुणी उपाशी राहू नये म्हणून महिन्यातून दोनदा धान्य पुरवठा करण्याचे आदेश आहे. मात्र, दुकानदारांना कोणतीही सुविधा नाही. गावागावांत कोरोना रुग्ण आढळत असताना, रास्त भाव धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीनच्या साहाय्याने धान्य पुरवठा करावा लागतो. त्यांच्या संपर्कात गावातील प्रत्येक कार्डधारक येतो. त्यात एखादा जर कोरोना संक्रमित असेल, तर संपूर्ण गाव कोरोना संक्रमित झाल्याशिवाय राहणार नाही. धान्य दुकानदार आपला जीव धोक्यात घालून धान्य वितरण करीत असल्याने तालुक्यातील अनेक दुकानदारच कोरोना संक्रमित झाले आहेत.

बॉक्स

सुरक्षेसाठी ठोस पावले उचला

तालुक्यातील महाळुंगी येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. सध्या तालुक्यातील १० ते १२ दुकानदार कोरोनाशी सामना करीत आहेत. अशा अवस्थेत धान्य वितरण करणे जोखमीचे आहे. दुकानदारांच्या सुरक्षेकरिता काही ठोस पावले उचलावीत, असा सूर रास्त भाव धान्य दुकानदारांच्या गोटातून व्यक्त होत आहे.