शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

यवतमाळच्या साक्षी व सुषमाला ‘लोकमत’चा सखी सन्मान पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:04 IST

गुणवत्ता पूर्ण कार्यातून कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांना ‘लोकमत’च्या सखी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यात यवतमाळ जिल्ह्यातील साक्षी मस्के आणि सुषमा मोरे या दोन युवतींचा सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देअमरावतीत शानदार सोहळा । वेटलिफ्टर आणि एव्हरेस्टवीर युवतींचा गुणगौरव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुणवत्ता पूर्ण कार्यातून कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांना ‘लोकमत’च्या सखी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यात यवतमाळ जिल्ह्यातील साक्षी मस्के आणि सुषमा मोरे या दोन युवतींचा सन्मान करण्यात आला. बुधवारी अमरावती येथील अभियंता भवनात हा शानदार सोहळा पार पडला.लोकमत सखी मंच व आयआयडीएस यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले होते. लोकमतचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली. मेळघाटात अतुलनीय कार्य करणाºया पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना यावेळी कमलताई गवई यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबत यवतमाळ जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील (पुसद) साक्षी प्रकाशराव मस्के हिला सन्मानित करण्यात आले. साक्षीने आफ्रिका (सामोआ देश) येथे झालेल्या कॉमनवेल्थ ज्युनिअर वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. शिवाय राष्ट्रीय स्तरावर दोन सुवर्ण पदके तर राज्य स्तरावर एक सुवर्ण पदक पटकाविले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.तसेच शौर्य या वर्गवारीतून सखी सन्मान पुरस्कारासाठीही यवतमाळ जिल्ह्यातील सुषमा मोरे या युवतीची निवड करण्यात आली होती. सुषमा मोरे ही कळंब तालुक्यातील शिवपुरी गावाची रहिवासी आहे. या युवतीने महाराष्ट्र शासनाच्या मिशन शौर्य मोहिमेअंतर्गत जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. ती सध्या कीटा कापरा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ११ व्या वर्गात शिकत आहे. तिच्या धाडसाचे कौतुक म्हणून ‘लोकमत’च्यावतीने तिला सखी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.साक्षी आणि सुषमा या दोघीही यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. आपापल्या क्षेत्रात सातत्याने केलेले परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी यश मिळविले आहे. सामान्य कुटुंबात असलेल्या या दोघींनीही मिळविलेल्या यशाने यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.