शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

यवतमाळची स्मशानभूमी हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:38 IST

शहरातील हिंंदू दफनभूमी हरविल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाची नगरपरिषदेत सत्ता आहे. तर हिंदूत्वाचा नारा देणाºया शिवसेनेच्या नगराध्यक्ष येथे विराजमान आहेत.

ठळक मुद्देनगरपरिषदेचे दुर्लक्ष : मोबाईलच्या टॉर्चमध्ये अंत्यसंस्कार

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील हिंंदू दफनभूमी हरविल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाची नगरपरिषदेत सत्ता आहे. तर हिंदूत्वाचा नारा देणाऱ्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष येथे विराजमान आहेत. त्यानंतरही अतिशय जिव्हाळ््याच्या व तितक्याच वेदनादायी अंत्यविधीसाठी नगरपरिषदेने कोणतीच सुविधा दिली नाही.अत्यंविधीला प्रत्येक धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तो चांगल्या व स्वच्छ वातावरणातच पार पडला जावा, जेणे करून मृताच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी, अशी सर्वमान्य धारणा आहे. माणसाचा देह पंचतत्वात विलीन होण्याची क्रिया म्हणजे दहन अथवा दफन क्रिया होय. यवतमाळकरांच्या दुर्दैवाने या क्रियेलाच येथे ग्रहण लागले आहे. शहरातील एकमेव हिंदू दफनभूमीच नामशेष झाली आहे. पाढंरकवडा मार्गावरील हिंदू स्मशानभूमीतच दफनभूमी आहे. येथील दहन क्रियेचा परिसर थोडाबहुत सुस्थितीत असून इतरत्र पाय ठेवायलाही जागा नाही. वर्चस्वाच्या आणि श्रेयाच्या राजकारणामुळे शहराचे वाटोळे सुरू आहे. पालिकेत काही केवळ स्वत:चे हित कसे जोपासता येईल इतकाच संकूचित विचार करत आहे. कंत्राट कोणतेही असो पूर्वीचा टक्केवारीचा निकष बाजूला पडला आहे. आता भागीदारीमध्ये (जॉर्इंट व्हेंचर) कामे दिली जात आहे. याचे घोर परिणाम यवतमाळकरांना सोसावे लागत आहे. पदाधिकाऱ्यांच्या चढाओढीत प्रशासन मौजेत असून शहरातील समस्यांकडे कोणीच गांभीर्याने पाहायला तयार नाही.पांढरकवडा मार्गावरच्या दफनभूमीकडेही यातूनच दुर्लक्ष झाले आहे. कधीकाळी ही स्मशानभूमी शहराचे वैभव होती. येथील स्वच्छता व सोयी सुविधांचे नियोजन पाहाण्यासाठी इतर नगरपरिषदांच्या चमू भेट देत होत्या. आता परिस्थती पूर्णत: बदलली आहे. हिंदू दफनभूमी घनदाट झाडाझुडपात हरविली आहे. रात्री येथे दिवाबत्तीची कोणतीच सोय नाही. अक्षरश: मोबाईलचा टॉर्च लावून विधी उरकावा लागत आहे. दफन करण्यासाठी येथे इंचभरही जागा शिल्लक नाही. कधीतरी या परिसराची सफाई झाली होती. त्यानंतर येथे कोणीच फिरकले नाही. विशेष म्हणजे, लहान-थोरांच्या अंत्यविधीसाठी नगरसेवकांची, अधिकाºयांची येथे वर्दळ असते. तरीही येथील समस्यांवर दुर्लक्ष आहे.सत्ताधाऱ्यांच्या पोकळ घोषणापालिकेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. तर नगराध्यक्ष शिवसेनेच्या आहेत. त्यांची विकासकामात आडकाठी येते ही आवई उठविल्या जाते. ही अडचणही राज्य शासनाने दूर केली असून नगराध्यक्षाला नामधारीच ठेवले आहे. त्यानंतरही निवडणूक काळात शहरवासीयांना दिलेल्या एकाही आश्वासनाची भाजपाने पूर्तता केली नाही. २४ तास स्वच्छ पाणी, गुळगुळीत रस्ते, देखणी उद्याने, घरकूल, स्वच्छ सुदंर परिसर हे सर्व दिवास्वप्नच ठरले आहे. उलट नगरपरिषदेची कार्यान्वित असलेली यंत्रण ठप्प झाली. मुलभूत सोयी सुविधाचा बोजवारा उडाला आहे. अपवाद सोडता घंटागाड्या बंद आहेत. पोकळ घोषणांचा समाचार घेण्यात विरोधकही कमी पडत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ