शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

यवतमाळची स्मशानभूमी हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:38 IST

शहरातील हिंंदू दफनभूमी हरविल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाची नगरपरिषदेत सत्ता आहे. तर हिंदूत्वाचा नारा देणाºया शिवसेनेच्या नगराध्यक्ष येथे विराजमान आहेत.

ठळक मुद्देनगरपरिषदेचे दुर्लक्ष : मोबाईलच्या टॉर्चमध्ये अंत्यसंस्कार

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील हिंंदू दफनभूमी हरविल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाची नगरपरिषदेत सत्ता आहे. तर हिंदूत्वाचा नारा देणाऱ्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष येथे विराजमान आहेत. त्यानंतरही अतिशय जिव्हाळ््याच्या व तितक्याच वेदनादायी अंत्यविधीसाठी नगरपरिषदेने कोणतीच सुविधा दिली नाही.अत्यंविधीला प्रत्येक धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तो चांगल्या व स्वच्छ वातावरणातच पार पडला जावा, जेणे करून मृताच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी, अशी सर्वमान्य धारणा आहे. माणसाचा देह पंचतत्वात विलीन होण्याची क्रिया म्हणजे दहन अथवा दफन क्रिया होय. यवतमाळकरांच्या दुर्दैवाने या क्रियेलाच येथे ग्रहण लागले आहे. शहरातील एकमेव हिंदू दफनभूमीच नामशेष झाली आहे. पाढंरकवडा मार्गावरील हिंदू स्मशानभूमीतच दफनभूमी आहे. येथील दहन क्रियेचा परिसर थोडाबहुत सुस्थितीत असून इतरत्र पाय ठेवायलाही जागा नाही. वर्चस्वाच्या आणि श्रेयाच्या राजकारणामुळे शहराचे वाटोळे सुरू आहे. पालिकेत काही केवळ स्वत:चे हित कसे जोपासता येईल इतकाच संकूचित विचार करत आहे. कंत्राट कोणतेही असो पूर्वीचा टक्केवारीचा निकष बाजूला पडला आहे. आता भागीदारीमध्ये (जॉर्इंट व्हेंचर) कामे दिली जात आहे. याचे घोर परिणाम यवतमाळकरांना सोसावे लागत आहे. पदाधिकाऱ्यांच्या चढाओढीत प्रशासन मौजेत असून शहरातील समस्यांकडे कोणीच गांभीर्याने पाहायला तयार नाही.पांढरकवडा मार्गावरच्या दफनभूमीकडेही यातूनच दुर्लक्ष झाले आहे. कधीकाळी ही स्मशानभूमी शहराचे वैभव होती. येथील स्वच्छता व सोयी सुविधांचे नियोजन पाहाण्यासाठी इतर नगरपरिषदांच्या चमू भेट देत होत्या. आता परिस्थती पूर्णत: बदलली आहे. हिंदू दफनभूमी घनदाट झाडाझुडपात हरविली आहे. रात्री येथे दिवाबत्तीची कोणतीच सोय नाही. अक्षरश: मोबाईलचा टॉर्च लावून विधी उरकावा लागत आहे. दफन करण्यासाठी येथे इंचभरही जागा शिल्लक नाही. कधीतरी या परिसराची सफाई झाली होती. त्यानंतर येथे कोणीच फिरकले नाही. विशेष म्हणजे, लहान-थोरांच्या अंत्यविधीसाठी नगरसेवकांची, अधिकाºयांची येथे वर्दळ असते. तरीही येथील समस्यांवर दुर्लक्ष आहे.सत्ताधाऱ्यांच्या पोकळ घोषणापालिकेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. तर नगराध्यक्ष शिवसेनेच्या आहेत. त्यांची विकासकामात आडकाठी येते ही आवई उठविल्या जाते. ही अडचणही राज्य शासनाने दूर केली असून नगराध्यक्षाला नामधारीच ठेवले आहे. त्यानंतरही निवडणूक काळात शहरवासीयांना दिलेल्या एकाही आश्वासनाची भाजपाने पूर्तता केली नाही. २४ तास स्वच्छ पाणी, गुळगुळीत रस्ते, देखणी उद्याने, घरकूल, स्वच्छ सुदंर परिसर हे सर्व दिवास्वप्नच ठरले आहे. उलट नगरपरिषदेची कार्यान्वित असलेली यंत्रण ठप्प झाली. मुलभूत सोयी सुविधाचा बोजवारा उडाला आहे. अपवाद सोडता घंटागाड्या बंद आहेत. पोकळ घोषणांचा समाचार घेण्यात विरोधकही कमी पडत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ