शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

मेळघाटातील वंचितांसाठी यवतमाळकर सरसावले

By admin | Updated: September 28, 2015 02:43 IST

आपल्या घरात समृद्धी असताना दुसऱ्यांचे दु:ख पाहणे संवेदनशील माणसांना अशक्य होते. यवतमाळ जिल्ह्यात संवेदना जपणाऱ्यांची कमतरता नाही.

यवतमाळ : आपल्या घरात समृद्धी असताना दुसऱ्यांचे दु:ख पाहणे संवेदनशील माणसांना अशक्य होते. यवतमाळ जिल्ह्यात संवेदना जपणाऱ्यांची कमतरता नाही. म्हणूनच मेळघाटातील रहिवाशांकरिता येथील निवृत्त अभियंता मंडळाने आगळा उपक्रम हाती घेतला आहे. कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू गोळा करून त्या वंचितांना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, येत्या दिवाळीत ही ‘सस्नेह भेट’ देण्यात येणार आहे.मेळघाटात वास्तव्याला असणाऱ्या आदिवासी बांधवांना दिवाळीपूर्वी कपडे मिळावे म्हणून निवृत्त अभियंता मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यात त्यांना यश मिळाले आहे. एक हजार कपडे गोळा झाले आहे. दिवाळीपूर्वीच हे कपडे आदिवासी बांधवांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. वंचित बांधवांना दिवाळीच्या पर्वावर कपडे मिळावे आणि त्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उदात्त हेतूने निवृत्त अभियंता मंडळाने कपडे गोळा करण्याच्या कामाला सुरवात केली आहे. नवे अथवा कुटुंबातील जुने कपडे ही मंडळी स्वीकारत आहे. यासोबतच चप्पल, बुट आणि भांडेही गोळा करण्यात आले आहे. जमा करण्यात आलेले साहित्य १० आॅक्टोबरनंतर मेळघाटात पाठविले जाणार आहे. नागरवाडीच्या ग्रामस्थांना साहित्य वितरित केले जाणार आहे. निवृत्त अभियंता मंडळाच्या कार्यालयात सायंकाळी ६ ते ८ च्या सुमारास हे कपडे गोळा केले जातात. मंडळाचे अध्यक्ष गोपाळ भास्करवार, प्रकल्प प्रमुख लालसिंग अणे, शत्रुघ्न हनवते यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते कपडे, भांडे, आणि चप्पल बुट गोळा करण्याचे काम करीत आहे. (शहर वार्ताहर)