शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

यवतमाळकरांची जिद्द आवडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:49 IST

माझ्यासारख्या असंख्य साहित्यिकांनी या संमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच यवतमाळ पाहिले. पण हे गाव आम्हा साहित्यिकांना खूप आवडले. या संमेलनावर संकट ओढवले होते. पण यवतमाळकरांच्या जिद्दीच्या बळावर संमेलन यशस्वी झाले.

ठळक मुद्देसाहित्यिकांना पाहूणपण भावले : यवतमाळला ‘विशेष जिल्हा’ घोषित करण्याची मागणी

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : माझ्यासारख्या असंख्य साहित्यिकांनी या संमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच यवतमाळ पाहिले. पण हे गाव आम्हा साहित्यिकांना खूप आवडले. या संमेलनावर संकट ओढवले होते. पण यवतमाळकरांच्या जिद्दीच्या बळावर संमेलन यशस्वी झाले. या गावातील लोकांची जिद्द आवडली. आतिथ्यशील स्वाभावाचे गाव ही यवतमाळची ओळख घेऊन आम्ही येथून जाऊ, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी यवतमाळनगरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देशभरातील साहित्यिक गेले तीन दिवस यवतमाळात डेरेदाखल होते. रविवारी या मान्यवर साहित्यिकांनी यवतमाळवासीयांबाबत कृतज्ञता व्यक्त करत-करत या शब्दसोहळ्याची भावनिक सांगता केली. ४५ वर्षांपूर्वी येथे साहित्य संमेलन झाले होते. आता २०१९ मध्ये त्याला भव्य रुप आले. ही भावना करताना अनेकांनी प्रा. राहुल एकबोटे यांनी सादर केलेल्या ‘इवलेसे रोप लावियले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी’ या रचनेचा उल्लेख केला. खुद्द साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यवतमाळसारख्या गावात रसिकांची एवढी प्रचंड गर्दी जमू शकते हे पाहून अक्षरश: भारावून गेल्या. त्या म्हणाल्या, हे संमेलन कसे होईल याचे दडपण होतेच. पण येथील रसिकांनी पहिल्या दिवशीपासूनच जो उदंड दिला, ते पाहून मळभ दूर झाले.- पोलिसांचे साहित्यप्रेमसंमेलनस्थळी तैनात असलेल्या पोलिसांचे साहित्यप्रेम पाहून आपल्याला खूप आनंद झाल्याचे संमेलनाध्यक्ष ढेरे यांनी सांगितले. पुस्तकं विकत घेणारे पोलीस पाहायला मिळाले. स्टॉलवर जाऊन आम्हाला अमूक पुस्तक हवे, अशी यादी देणारे पोलीस पाहायला मिळाल्याचे ढेरे म्हणाल्या. तर या गावातील महिलांनी संमेलनस्थळावरील स्वच्छतेची जबाबदारी अत्यंत कुशलतेने हाताळल्याचे मत साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष विद्या देवधर यांनी नोेंदविले. तीन दिवस गोळा झालेल्या कचऱ्यातून खत निर्मिती होणार असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.यवतमाळबाबत सलग तीन तास गौरवोद्गार व्यक्त करत असतानाच कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. लोणी येथील द. तु. नंदापुरे गुरुजी आणि सेंद्रीय शेती करणारे सुभाष शर्मा यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर गौरविण्यात आले. तर माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे आत्मचरित्र मान्यवर साहित्यिक सोबत घेऊन गेले.या गावाला जादा निधी द्यासाहित्य संमेलनासाठी तीन दिवस मुक्कामी राहिलेल्या मान्यवर साहित्यिकांनी या जिल्ह्यातील माणसे कशी आहेत, याचे अवलोकन करण्याचा प्रयत्न केला. या जाणीवेतूनच समारोपीय कार्यक्रमात संमेलनाने एक महत्त्वपूर्ण ठराव मांडला. यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी, भटके विमुक्त यांची लोकसंख्या ५५ टक्के आहे. त्यामुळे या जिल्ह्याला सरकारने विशेष जिल्ह्याचा दर्जा द्यावा, हा ठराव टाळ्यांच्या गजरात वाचण्यात आला. तसेच जिल्ह्याच्या विकासाकरिता सरकारने अधिक निधी देण्याची मागणीही या ठरावात करण्यात आली. संमेलनाचे कार्यवाह प्रा. घनशाम दरणे ठरावाचे अनुमोदक तर सूचक प्रणव कोलते होते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ