शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यवतमाळात घनकचरा तुंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:01 IST

शहरातील घनकचरा संकलनाची यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून सुरळीत झाली आहे. मात्र आता कचरा डम्पिंग करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संकलित कचरा कुठे जमा करावा, यासाठी हक्काची जागा पालिकेकडे नाही. परिणामी घंटागाड्यांची यंत्रणा अनेक प्रभागात ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देडम्पिंगचा प्रश्न कायम : नगरसेवकाचा इशारा, कचरा टाकण्यासाठी जागाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील घनकचरा संकलनाची यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून सुरळीत झाली आहे. मात्र आता कचरा डम्पिंग करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संकलित कचरा कुठे जमा करावा, यासाठी हक्काची जागा पालिकेकडे नाही. परिणामी घंटागाड्यांची यंत्रणा अनेक प्रभागात ठप्प झाली आहे. शिवसेना नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्काळ व्यवस्था करण्याचा इशारा दिला आहे.नगरपरिषदेजवळ सावरगड कचरा डेपो व धामणगाव बायपासवरील डम्पिंग यार्ड या दोन जागा हक्काच्या आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी कचरा टाकण्यास स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. सावरगड कचरा डेपोत अनेक दिवसांपासून परंपरागत पद्धतीने कचरा साठविला जातो. यामुळे लगतच्या गावात दुर्गंधी येते व रोगराई पसरण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी विरोध केला आहे. मुळात दैनंदिन कचºयाचे विलगीकरण करून त्यातील विघटनशील कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून गांढूळ खत निर्मिती अथवा कंपोस्ट तयार होऊ शकते. पूर्वी असा प्रकल्प सावरगड कचरा डेपोत कार्यान्वित होता. मात्र नंतर याकडे दुर्लक्ष करत आलेला कचरा मनमानी पद्धतीने टाकण्यात येत होता. त्यातही वाहन दूर न नेताच अगदी जवळ कचरा टाकून वाहने निघून जात होती. परिणामी विस्तीर्ण परिसर असूनही काही वर्षातच सावरगड कचरा डेपो आता डम्प करण्यायोग्य राहिलेला नाही. सुरुवातीला नगरपरिषदेकडून योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन सावरगड ग्रामस्थांना देण्यात आले होते.काही दिवस येथे नियमित फवारणी व ट्रायकोडर्मासारख्या विघटकाचा वापरही होत होता. नंतर भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याने निधी हडपून थेट कचरा टाकला जात आहे. यामुळेच हा कचरा डेपो ग्रामस्थांनी बंद करण्यासाठी उग्ररूप धारण केले आहे. त्यानंतर पर्यायी जागा म्हणून धामणगाव बायपासवरील शेताची निवड केली. हे शेतसुद्धा नागरी वसाहतीला लागून आहे. येथे कचºयावर प्रक्रिया करण्याची कोणतीच प्रक्रिया नाही. मृत जनावरेसुद्धा बेमुरवतपणे फेकून दिले जातात. बºयाचदा उन्हाळ्याच्या दिवसात प्लास्टीक पन्न्या जाळण्यात येतात. यातून विषारी धूर बाहेर निघतो. आता चिखलामुळे या भागात घंटागाड्या घेऊन जाता येत नाही. त्यामुळे येथील कचरा डम्पिंग बंद आहे. कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करून घंटागाड्या प्रभागात येणे बंद केले आहे.या गंभीर प्रकारात तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते गजानन इंगोले यांनी केली आहे. अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही दिला आहे.

टॅग्स :dumpingकचरा