शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ नगरपालिकेच्या कम्पोस्ट खताला ब्रँड मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:20 IST

नगरपरिषदेचा सावरगड येथील कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प कधीच फायद्याचा ठरला नसला तरी आता येथील खताचे ब्रँडींग केले जाणार आहे.

तोट्यातील प्रकल्प : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी प्रमाणपत्र लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेचा सावरगड येथील कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प कधीच फायद्याचा ठरला नसला तरी आता येथील खताचे ब्रँडींग केले जाणार आहे. यवतमाळसह राज्यातील इतर पाच नगरपालिकांच्या कम्पोस्ट खताला ‘हरित कम्पोस्ट’ असा ब्रँड खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील वर्षा बंगल्यावर विशेष कार्यक्रम बुधवारी होत आहे. घनकचऱ्यातील ओला व सुका कचरा वेगळा करून सेंद्रीय खतनिर्मिती केली जाते. यवतमाळात भाजीपाला मार्केटमधून चार टन कचरा निघतो. याशिवाय इतर ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी नगरपालिकेने वर्मी कम्पोस्टचे ६० बेड तयार केले आहे. कचरा विलगीकरणासाठी मोठी यंत्रणाही डेपोवर आहे. मात्र मागील काही वर्षापासून ही यंत्रणा बंद पडून आहे. उर्मी कम्पोस्टमध्ये खतनिर्मिती केली जाते. आता नगरपरिषदेकडे २० टन खत शिल्लक आहे. त्याची खुल्या बाजारात ४ रूपये प्रती किलोप्रमाणे विक्री केली जाते. मात्र नगरपरिषदेला या प्रकल्पातून कधीच आर्थिक फायदा झाला नाही. उलट खतनिर्मिती करणाऱ्या संस्थेलाच नगरपरिषदेकडून वर्षाकाठी १० ते १५ लाख रूपये दिले जातात. पालिकेच्या कम्पोस्ट खताचा अधिक प्रचार व्हावा यासाठी त्याला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून ब्रँड दिला जात आहे. राज्यातील विटाळा (सांगली) , पाचगणी (सातारा), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), सासवड (पुणे) व यवतमाळ या पाच नगरपरिषदांच्या कम्पोस्ट खताचे ब्रँडींग ‘हरित महाशेती कम्पोस्ट’ या नावाने केले जाणार आहे. त्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाच्या उपसचिवांकडून पत्र आले आहे.ग्रीन स्पेस डेव्हलपमेंटच्या ई-भूमिपूजनाचा सोपस्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सकाळी १०.३० वाजता अमृत मिशन अंतर्गत ग्रिन स्पेस डेव्हलपमेंटचे ई-भूमिपूजन केले जाणार आहे. पालिकेच्या सभागृहात मान्यवारांच्या उपस्थितीत ई-भूमिपूजनाचा सोपस्कार पूर्ण केला जाणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी यवतमाळात येऊन व्यापारी संकुलाचे भूमिपूजन केले. दोन वर्ष लोटूनही या कामाची सुरूवातही झाली नाही. तेव्हा ई-भूमिपूजनाचे काय होईल, हा प्रश्न आहे.