शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

यवतमाळ नगरपालिकेच्या कम्पोस्ट खताला ब्रँड मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:20 IST

नगरपरिषदेचा सावरगड येथील कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प कधीच फायद्याचा ठरला नसला तरी आता येथील खताचे ब्रँडींग केले जाणार आहे.

तोट्यातील प्रकल्प : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी प्रमाणपत्र लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेचा सावरगड येथील कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प कधीच फायद्याचा ठरला नसला तरी आता येथील खताचे ब्रँडींग केले जाणार आहे. यवतमाळसह राज्यातील इतर पाच नगरपालिकांच्या कम्पोस्ट खताला ‘हरित कम्पोस्ट’ असा ब्रँड खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील वर्षा बंगल्यावर विशेष कार्यक्रम बुधवारी होत आहे. घनकचऱ्यातील ओला व सुका कचरा वेगळा करून सेंद्रीय खतनिर्मिती केली जाते. यवतमाळात भाजीपाला मार्केटमधून चार टन कचरा निघतो. याशिवाय इतर ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी नगरपालिकेने वर्मी कम्पोस्टचे ६० बेड तयार केले आहे. कचरा विलगीकरणासाठी मोठी यंत्रणाही डेपोवर आहे. मात्र मागील काही वर्षापासून ही यंत्रणा बंद पडून आहे. उर्मी कम्पोस्टमध्ये खतनिर्मिती केली जाते. आता नगरपरिषदेकडे २० टन खत शिल्लक आहे. त्याची खुल्या बाजारात ४ रूपये प्रती किलोप्रमाणे विक्री केली जाते. मात्र नगरपरिषदेला या प्रकल्पातून कधीच आर्थिक फायदा झाला नाही. उलट खतनिर्मिती करणाऱ्या संस्थेलाच नगरपरिषदेकडून वर्षाकाठी १० ते १५ लाख रूपये दिले जातात. पालिकेच्या कम्पोस्ट खताचा अधिक प्रचार व्हावा यासाठी त्याला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून ब्रँड दिला जात आहे. राज्यातील विटाळा (सांगली) , पाचगणी (सातारा), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), सासवड (पुणे) व यवतमाळ या पाच नगरपरिषदांच्या कम्पोस्ट खताचे ब्रँडींग ‘हरित महाशेती कम्पोस्ट’ या नावाने केले जाणार आहे. त्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाच्या उपसचिवांकडून पत्र आले आहे.ग्रीन स्पेस डेव्हलपमेंटच्या ई-भूमिपूजनाचा सोपस्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सकाळी १०.३० वाजता अमृत मिशन अंतर्गत ग्रिन स्पेस डेव्हलपमेंटचे ई-भूमिपूजन केले जाणार आहे. पालिकेच्या सभागृहात मान्यवारांच्या उपस्थितीत ई-भूमिपूजनाचा सोपस्कार पूर्ण केला जाणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी यवतमाळात येऊन व्यापारी संकुलाचे भूमिपूजन केले. दोन वर्ष लोटूनही या कामाची सुरूवातही झाली नाही. तेव्हा ई-भूमिपूजनाचे काय होईल, हा प्रश्न आहे.