शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
4
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
5
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
6
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
7
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
8
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
9
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
10
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
11
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
12
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
13
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
14
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
15
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
16
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
17
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
18
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
19
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
20
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला

यवतमाळ नगरपरिषद आता २८ प्रभागांची

By admin | Updated: May 14, 2016 02:17 IST

आठ ग्रामपंचायतीच्या हद्दवाढीनंतर यवतमाळ नगर परिषद क्षेत्रातील लोकसंख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे.

डिसेंबरमध्ये निवडणुका : अनेकांना नगराध्यक्ष पदाचे डोहाळेयवतमाळ : आठ ग्रामपंचायतीच्या हद्दवाढीनंतर यवतमाळ नगर परिषद क्षेत्रातील लोकसंख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे. मतदार संख्येच्या तुलनेत यवतमाळात आता २८ प्रभाग राहणार आहे. दरम्यान जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने अनेक दिग्गजांना त्याचे डोहाळे लागले आहे. यवतमाळ नगर परिषद क्षेत्राची नुकतीच हद्दवाढ झाली. या नगरपरिषदेत शहरालगतच्या वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, भोसा, मोहा, उमरसरा, डोळंबा या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे शहराची लोकसंख्या २ लाख ५२ हजार एवढी झाली आहे. आता यवतमाळात नव्या प्रभाग रचनेनुसार २८ प्रभाग राहणार आहे. तर २ लाख ५२ हजार लोकसंख्येतून नगराध्यक्षाला निवडून द्यावयाचे आहे. शहरात ग्रामीण भागात समाविष्ठ झाल्याने नवीन राजकीय समीकरण उदयास आले आहे. अशा स्थितीत सत्ताधारी भाजपा, राष्ट्रवादी आणि विरोधी बाकावर असलेले काँग्रेस, बसपा व शिवसेना या प्रमुख पक्षांचा उमेदवार कोण हे महत्वाचे ठरणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या थेट निवडणुकीबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षाचा राहणार, आरक्षण कोणते निघणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र थेट निवडणूक लढविणाऱ्यांची अचानक वाढलेली सक्रियता सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे. आयोगाने निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत जून महिन्यांपासून प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात करण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र आता राज्य सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रभाग रचना प्रक्रियेतही फेरबदल करण्यात येणार की जुन्याच चक्राकार पद्धतीने प्रभाग रचना होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. प्रभाग पद्धतीत पूर्वी सदस्य संख्या चार होती. त्यात दोन महिला आणि दोन पुरुष अशी विभागणी करण्यात आली होती. आता दोनच सदस्यांचा एकच प्रभाग असल्याने नगर परिषदांमध्ये प्रभागांची संख्या दुपटीने वाढणार आहे. अनेकांना ही पद्धत राजकीय पक्षांसाठी सोईची वाटत आहे. तर काहींचा सूर यामुळे पुन्हा अपक्षांना वाव मिळेल, असा आहे. एका प्रभागात एक जागा आरक्षित व दुसरी जागा सर्वसाधारण ठेवण्यात येईल, असाही कयास आहे.नगरसेवकातून नगराध्यक्षांची निवड केवळ अडीच वर्षासाठी केली जात होती. त्यानंतर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण बदलविले जात होते. आता नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार असल्याने त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा राहणार हे गुलदस्त्यात आहे. अडीच वर्षासाठी काढण्यात आलेले नगराध्यक्षांचे आरक्षण कायम ठेवले जात की फेरबदल होतो याकडे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)