शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१५ किलोमीटर रस्त्यांच्या देखभालीचा भुर्दंड आता यवतमाळ नगरपरिषदेवर

By admin | Updated: April 13, 2017 00:50 IST

महामार्गावरील वाईनबार वाचविता यावे म्हणून यवतमाळातील मद्य सम्राटांकरिता नगरपरिषदेच्या पुढाकाराने शासनाने तडजोड केली.

मद्यसम्राटांसाठी तडजोड : प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचे फलित, पालिका ठरावावर मात्र संशय यवतमाळ : महामार्गावरील वाईनबार वाचविता यावे म्हणून यवतमाळातील मद्य सम्राटांकरिता नगरपरिषदेच्या पुढाकाराने शासनाने तडजोड केली. त्यानुसार आता शहराबाहेर जाणारे नगरपरिषद हद्दीतील १५ किलोमीटर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा बोझा पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. बांधकाम खात्याच्या अंदाजानुसार, कोणत्याही प्रमुख मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचा प्रति किलोमीटर वार्षिक सरासरी खर्च १० लाख रुपये आहे. महामार्गावरील वाईनबार हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार यवतमाळ शहरातील सर्व प्रमुख बार बाद होणार होते. परंतु राजकीय इच्छाशक्तीने त्यातून पळवाट शोधली. त्यानुसार शहराबाहेर जाणारे सर्व प्रमुख मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आले. खुद्द नगरपरिषदेने त्यासाठी पुढाकार घेऊन स्वत:हूनच तसा प्रस्ताव बांधकाम खात्याला सादर केला. राजकीय दबाव असल्याने बांधकाम विभागानेही क्षणाचाही विलंब न लावता हा प्रस्ताव अमरावती मार्गे मुंबईला पाठविला. अखेर त्या प्रस्तावाला ११ एप्रिल रोजी बांधकाम खात्याने मंजुरी दिली. त्यानुसार शहरातील सुमारे १५ किलोमीटरचे रस्ते हे यापुढे नगरपरिषदेच्या देखरेखीत राहणार आहेत. त्याचा देखभाल दुरुस्ती खर्च नगरपरिषद करणार आहे. बायपास झाल्याने हे एकूण १५ किलोमीटरचे अंतर्गत रस्ते आता पालिकेच्या मालकीचे झाले आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाईनबारला जीवदान मिळाले आहे. या रस्त्यावरील नगरपरिषद हद्दीबाहेरील वाईनबार व दारू विक्री केंद्रांना एक्साईजने सील लावले आहे. आर्णी रोडवर नगरपरिषद हद्दीबाहेर असलेल्या एका बारला राजकीय आशीर्वाद असल्याने मात्र या बारमध्ये आजही मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू असल्याची माहिती आहे. एकीकडे नगरपरिषदेच्या तिजोरीत विकास कामांसाठी निधी नाही तर दुसरीकडे १५ किलोमीटरचे हे रस्ते केवळ मद्यसम्राटांच्या सोईसाठी नगरपरिषदेने आपल्याकडे घेऊन खर्चाची नवी भानगड उभी केल्याचा काही सदस्यांचा सूर आहे. या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारीही आता नगरपरिषदेवर राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) सदस्य म्हणतात, ठरावाबाबत कधी ऐकले नाही रस्ते ताब्यात घेण्याच्या या निर्णयाबाबत नगरपरिषदेचा ठराव झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक सदस्य असा कोणता ठराव झाल्याचे ऐकिवात नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या ठरावावर प्रश्नचिन्ह लागले आहे. हा ठराव आहे की नगरपरिषद प्रशासनाने आपल्या अधिकारात परस्परच बांधकाम खात्याला रस्ते ताब्यात घेण्याबाबतचे पत्र दिले याची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. कारण आर्थिक संबंध असल्याने रस्ते ताब्यात घेण्याचा हा विषय धोरणात्मक आहे. कार्यक्रम पत्रिकेत या विषयाचा ‘वेळेवर येणारे विषय’ या सदराखाली समावेश करता येत नाही. त्यामुळे नगरपरिषदेचा या रस्त्यांसंबंधीचा ठराव आणि प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.