शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

यवतमाळची बाजारपेठ तब्बल ५० दिवसानंतर उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

२२ मार्चपासून यवतमाळ शहरात बाजारपेठेसह सर्व परिसर कडकडीत बंद होता. संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले होते. तब्बल ५० दिवसानंतर यवतमाळातील बाजारपेठ अंशत: उघडली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्वत्र चहलपहल दिसत होती. कापडासह इतरही काही दुकाने उघडल्याने नागरिक ग्रामीण भागातून खरेदीसाठी आले होते.

ठळक मुद्दे२२ मार्चनंतर पहिल्यांदाच चहलपहल : खरेदीसाठी ग्रामीण भागातूनही नागरिकांनी यवतमाळात घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. यवतमाळ शहर तर कोरोना रुग्णांमुळे थेट रेडझोनमध्ये आले. २२ मार्चपासून यवतमाळ शहरात बाजारपेठेसह सर्व परिसर कडकडीत बंद होता. संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले होते. तब्बल ५० दिवसानंतर यवतमाळातील बाजारपेठ अंशत: उघडली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्वत्र चहलपहल दिसत होती. कापडासह इतरही काही दुकाने उघडल्याने नागरिक ग्रामीण भागातून खरेदीसाठी आले होते.आतापर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. नंतर शेतीपयोगी साहित्य व बी-बियाण्यांची दुकाने उघडण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने हार्डवेअर, सिमेंट ही दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेत उघडण्याची मुभा दिली. रविवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने दुकाने उघडण्यासंदर्भात दिवस ठरवून दिले आहे. त्याचा पहिला दिवस सोमवार होता. आज कापड दुकानांसह जनरल स्टोअर्स व इतरही दुकाने उघडण्यात आली.जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेली दुकाने उघडली. नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेतली. प्रत्येकजण तोंडाला मास्क बांधून होता. शक्यतोवर गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जात होता. काही दुकानदारांनी स्वत:हून सर्कल आखून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी पुढाकार घेतला होता.शांत शहर गजबजलेएखाद्या युद्धाच्या परिस्थितीत जशी स्थिती निर्माण होते असाच काहीसा अनुभव गेल्या दीड महिन्यापासून यवतमाळकरांना आला. घराबाहेर पडले तरी कुणीच भेटत नव्हते. बाजारपेठही पूर्णत: शांत होती. चिरनिद्रेतून शहर जागे झाल्याचा आभास सोमवारी दुपारचे चित्र पाहून झाला.बाजारपेठेसह आता बँकाही सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत चालणारगत ५० दिवसांपासून यवतमाळची बाजारपेठ बंद होती. अत्यावश्यक सेवेची दुकाने १२ वाजेपर्यंत खुली होती. ही वेळ वाढवून आता दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने आणि बँकांचा व्यवहार सुरू राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे. या उपाययोजनांच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये बाजारपेठ आळीपाळीने उघडण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहेत. यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत उघडी राहणार होती. आता ही दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहणार आहे. यामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषत: बँकेसमोर होणारी गर्दी वाढलेल्या वेळेमुळे नियंत्रणात येणार आहे. यासोबतच दुकानातील गर्दीही थांबणार आहे.

टॅग्स :Marketबाजार