शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

यवतमाळची बाजारपेठ तब्बल ५० दिवसानंतर उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

२२ मार्चपासून यवतमाळ शहरात बाजारपेठेसह सर्व परिसर कडकडीत बंद होता. संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले होते. तब्बल ५० दिवसानंतर यवतमाळातील बाजारपेठ अंशत: उघडली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्वत्र चहलपहल दिसत होती. कापडासह इतरही काही दुकाने उघडल्याने नागरिक ग्रामीण भागातून खरेदीसाठी आले होते.

ठळक मुद्दे२२ मार्चनंतर पहिल्यांदाच चहलपहल : खरेदीसाठी ग्रामीण भागातूनही नागरिकांनी यवतमाळात घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. यवतमाळ शहर तर कोरोना रुग्णांमुळे थेट रेडझोनमध्ये आले. २२ मार्चपासून यवतमाळ शहरात बाजारपेठेसह सर्व परिसर कडकडीत बंद होता. संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले होते. तब्बल ५० दिवसानंतर यवतमाळातील बाजारपेठ अंशत: उघडली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्वत्र चहलपहल दिसत होती. कापडासह इतरही काही दुकाने उघडल्याने नागरिक ग्रामीण भागातून खरेदीसाठी आले होते.आतापर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. नंतर शेतीपयोगी साहित्य व बी-बियाण्यांची दुकाने उघडण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने हार्डवेअर, सिमेंट ही दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेत उघडण्याची मुभा दिली. रविवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने दुकाने उघडण्यासंदर्भात दिवस ठरवून दिले आहे. त्याचा पहिला दिवस सोमवार होता. आज कापड दुकानांसह जनरल स्टोअर्स व इतरही दुकाने उघडण्यात आली.जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेली दुकाने उघडली. नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेतली. प्रत्येकजण तोंडाला मास्क बांधून होता. शक्यतोवर गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जात होता. काही दुकानदारांनी स्वत:हून सर्कल आखून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी पुढाकार घेतला होता.शांत शहर गजबजलेएखाद्या युद्धाच्या परिस्थितीत जशी स्थिती निर्माण होते असाच काहीसा अनुभव गेल्या दीड महिन्यापासून यवतमाळकरांना आला. घराबाहेर पडले तरी कुणीच भेटत नव्हते. बाजारपेठही पूर्णत: शांत होती. चिरनिद्रेतून शहर जागे झाल्याचा आभास सोमवारी दुपारचे चित्र पाहून झाला.बाजारपेठेसह आता बँकाही सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत चालणारगत ५० दिवसांपासून यवतमाळची बाजारपेठ बंद होती. अत्यावश्यक सेवेची दुकाने १२ वाजेपर्यंत खुली होती. ही वेळ वाढवून आता दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने आणि बँकांचा व्यवहार सुरू राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे. या उपाययोजनांच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये बाजारपेठ आळीपाळीने उघडण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहेत. यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत उघडी राहणार होती. आता ही दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहणार आहे. यामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषत: बँकेसमोर होणारी गर्दी वाढलेल्या वेळेमुळे नियंत्रणात येणार आहे. यासोबतच दुकानातील गर्दीही थांबणार आहे.

टॅग्स :Marketबाजार