शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

यवतमाळ बाजार समितीत ‘परिवर्तन’

By admin | Updated: October 11, 2016 02:43 IST

सहकार क्षेत्रात सलग दहा वर्ष निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या गाडे पाटील गटाला यवतमाळ बाजार

गाडे पाटलांचा धुव्वा : मांगुळकर गटाला सर्व जागा यवतमाळ : सहकार क्षेत्रात सलग दहा वर्ष निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या गाडे पाटील गटाला यवतमाळ बाजार समितीत प्रचंड हादरा बसला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांच्या नेतृत्वातील काँग्रेस- शिवसेना- राष्ट्रवादीच्या परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागांवर विजय मिळविला आहे. सत्ताधारी गाडे पाटील गटाला एकही जागा मिळविता आली नाही. परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारात सहकारी संस्था मतदारसंघात रवींद्र ढोक (२६१), गजानन डोमाळे (२५८), किशोर इंगळे (२५६), वसंत भेंडेकर (२५४), गुणवंत डोळे (२५१), राजेंद्र गिरी (२४८), सुरेश पात्रीकर (२३५) सर्वसाधारण प्रवर्गातून विजयी झाले. याच मतदारसंघातील महिला राखीव प्रवर्गातून छाया शिर्के (२८०), ललिता जयस्वाल (२६६), इतर मागासवर्गीयातून श्रीकांत डंभारे (२५५), विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातून संजय राठोड (२६३) विजयी झाले. ग्रामपंचात मतदारसंघात रमेश भिसनकर (३२८), सत्यभामा चव्हाण (३२९), सुनिल डिवरे (३३२), प्रकाश राठोड (३०६) विजयी झाले. हमाल मापारी मतदारसंघातून किशोर बडे (९८), व्यापारी अडते मतदारसंघातून विजय मुंधडा (६६), राजेंद्र निमोदिया (६५) विजयी झाले. परिवर्तन पॅनलच्या विजयाची सुरूवातच ही पणन प्रक्रिया मतदारसंघातून झाली. राजेशकुमार फुलचंद अग्रवाल अविरोध निवडून आले. गाडे पाटील गटाच्या शेतकरी विकास आघाडीला एकही जागा राखता आली नाही. विद्यमान सभापती डॉ. सूर्यकांत गाडे पाटील यांचा सहकारी संस्था मतदार संघात दणदणीत पराभव झाला. ग्रामपंचायत मतदारसंघात परिवर्तनच्या उमेदवारांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. मात्र सहकारी संस्था मतदारसंघात गाडे पाटील गटाच्या उमेदवारांनी चिवट झुंज दिली. मात्र विजयाचा आकडा गाठता आला नाही. येथील गुरुदेव मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढून जल्लोष केला. (कार्यालय प्रतिनिधी) सभापती काँग्रेसचा, उपसभापती शिवसेनेचा ४बाजार समितीत कॉंग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी समर्थित परिवर्तन पॅनलकडून सत्ता स्थापन केली जाणार आहे. यामध्ये निवडणुकीपूर्वी ठरलेल्या फॉर्म्यूल्यानुसार सभापती पद काँग्रेकडे आणि उपसभापती पद शिवसेनेकडे राहणार आहे. त्यांची निवड प्रक्रिया केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ४यवतमाळ बाजार समिती जिल्हात सर्वात मोठी असून मुख्यालयी असल्याने इथे सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपाची सहकारात बांधणीच नाही. केवळ गाडे पाटील गटामुळे भाजपाची सहकार क्षेत्रात एंट्री झाली. मात्र तिथेही त्यांना पराभवच स्वीकारावा लागला. राज्यमंत्री असतानासुध्दा सहकार क्षेत्रातील बांधणी भाजपाने केलेली नाही. त्यामुळेच भाजपाची सहकारातील एंट्री फसल्याचे राजकीय जाणाकारांकडून बोलले जात आहे.