शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

यवतमाळात तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर तिघांचे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:15 IST

यवतमाळात बोगस आणि उगवण क्षमता नसलेले सोयाबीनचे बियाणे विकणाऱ्या तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर बनावट खत प्रकरणात तीन कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला.

ठळक मुद्देबोगस सोयाबीन, बनावट खत विक्रीचा ठपकाएका कृषी केंद्राला ताकीद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस आणि उगवण क्षमता नसलेले सोयाबीनचे बियाणे विकणाऱ्या तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर बनावट खत प्रकरणात तीन कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला.परवाना निलंबित झालेल्यांमध्ये यवतमाळ शहराच्या दत्त चौक परिसरातील बबलू गुप्ता यांचे कृषी कल्पतरु, संजय कोषटवार यांचे सुदर्शन कृषी केंद्र व राम जाजू यांचे जाजू कृषी केंद्र यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे सोयाबीन बियाणे जिल्ह्याबाहेर कोपरगाव-शिर्डी पर्यंत नेऊन विकल्याचा ठपका गुप्ता यांच्या कृषी कल्पतरु केंद्रावर आहे. त्यामुळे त्यांचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. तर सुदर्शन व जाजू यांचा परवाना एक ते दोन महिन्यांसाठी निलंबित केला गेल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून ‘लोकमत’ला सांगण्यात आले.

याशिवाय तीन कृषी केंद्रांचे परवाने थेट रद्द करण्यात आले. महागाव तालुक्याच्या काळीदौलत येथील गौरी शंकर कृषी केंद्रावर बोगस सोयाबीन बियाणे विक्रीचा ठपका ठेवण्यात आला. नेर तालुक्याच्या मांगलादेवी येथील कृहनिका कृषी केंद्र आणि दिग्रस तालुक्याच्या तिवरा येथील बावणे कृषी केंद्राचा परवाना बनावट रासायनिक खत विकल्याप्रकरणी रद्द करण्यात आला आहे.

कृषी प्रगती केंद्रात अनेक त्रुट्यायवतमाळातील विलास बोगावार यांच्या कृषी प्रगती केंद्राला सक्त ताकीद देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या तपासणीत तेथे अनेक त्रुट्या आढळून आल्या होत्या. मात्र त्या सौम्य स्वरूपाच्या होत्या. त्यातील बहुतांश त्रुट्यांची त्यांनी पूर्तता केली, साठा रजिस्टर भरले. त्यामुळे त्यांना केवळ ताकीद देण्यात आली.जिल्हाभर बोगस सोयाबीन बियाणे विकले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. यवतमाळातील ठोक विक्रेत्यांकडून हे बियाणे विकले गेले. काहींनी कृत्रिम टंचाई करून जादा दराने बियाणे विकले तर कुणी जिल्ह्याबाहेर कंपनीतून परस्पर बियाणे विक्रीसाठी पाठविले. या वृत्ताची दखल घेऊन कृषी विभागाने शहरात ठोक बियाणे विक्रेत्यांच्या दुकान व गोदामांची तपासणी केली होती.परवाना रद्द व निलंबन केलेल्या प्रकरणात कृषी विभागाच्या तपासणीत अनेक गंभीरबाबी आढळून आल्या. साठा रजिस्टर न मिळणे, कागदपत्रे अपडेट नसणे, बियाणे खरेदी केल्याची कागदपत्रे उपलब्ध नसणे, जिल्ह्याबाहेर माल विकणे, उगवण क्षमता नसलेले बियाणे शेतकºयांच्या माथी मारणे आदी गैरप्रकार आढळून आले.

बनावट रासायनिक खताचा भंडाफोडकृषी विभागाने दिग्रस येथे बनावट रासायनिक खताची विक्री सुरू असल्याचा भंडाफोड केला होता. हे खत एसटी महामंडळाच्या पार्सल गाडीने गडचिरोली जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात आणले जात होते व नामांकित खत म्हणून जादा दरात शेतकºयांच्या माथी मारले जात होते. हे खत विकणारे दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले.यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक तक्रारीयवतमाळ व आर्णीतील ठोक बियाणे विक्रेत्यांकडून जिल्ह्याच्या सोळाही तालुक्यात बियाण्यांची विक्री केली गेली. जयस्वाल कृषी केंद्रातून यवतमाळ तालुका व परिसरात बियाणे विकले गेले. तेथूनच बियाणे न उगविल्याच्या सर्वाधिक तक्रारी शेतकºयांनी नोंदविल्या.आर्णीतून बियाणे थेट उमरखेड व परिसरापर्यंत आर्णीच्या कृषी वैभव केंद्रातून उमरखेड व परिसरात सर्वाधिक बियाणे विक्री झाली व तक्रारीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

मीडियाच्या एन्ट्रीने दत्त चौकातून पथक माघारीया तपासणीसाठी कृषी विभागाचे तत्कालीन मोहिम अधिकारी व दक्षता अधिकाऱ्यांचे पथक दत्त चौकातील जयस्वाल कृषी केंद्रावरही धडकले होते. मात्र त्याच वेळी तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियाची चमू धडकल्याने कृषी विभागाने ही तपासणी नंतर करू असे म्हणून त्यावेळी कारवाई टाळली. परंतु नंतर या दुकानाची तपासणी झालीच नाही.

‘बीगबजेट’ पार्ट्याच तपासणीतून सुटल्या !अशाच पद्धतीने आर्णी येथील कृषी वैभव या ठोक बियाणे विक्रेत्याचीही तपासणी केली गेली नाही. ‘बीग बजेट’ पार्ट्याच कृषी विभागाच्या तपासणीतून सुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. या केंद्रांना अभय देण्यामागील ‘रहस्य’ गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :agricultureशेती